गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

       " प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वरी लीला या दृष्टीकोनातून पाहिल्यास तुम्हाला दिव्यानंदाची अनुभूती होईल. "

वसंतामृतमाला  
पुष्प ४४ 

गुरु चरणम् 


                  आज स्वामींनी एक कागद दिला. त्यावर लिहिले होते -
ॐ श्री साई राम 
जगद् जननीस माझे विनम्र अभिवादन 
ॐ श्री साई जय जय साई 
जय जय राम कृष्ण हरी 
जय जय राम 
जय जय साई 
जय जय राम कृष्ण हरी 
मानस भज रे गुरु चरणम्   
दुस्तर भवसागर तरणम्  
अर्थ - मनामध्ये तुम्ही तुमच्या गुरूंच्या चरणकमलांचे ध्यान करा. केवळ तेच तुम्हाला भवसागरातून पार करतील. 
*  *  *
                हे त्या कागदावर लिहिले होते. गीताच्या डाव्या बाजूला एक कमळ होते, व त्याचे पान हृदयाच्या आकाराचे. उजव्या बाजूला एक पंचकोनी चांदणी होती. चांदणीच्या मध्यावर एक नेकलेस घातलेला चेहरा होता. तो एका स्त्रीचा चेहरा असावा असे दिसत होते. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात..... 

जय साईराम 

रविवार, १५ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

      " जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याचा क्रोध परमेश्वराचा क्रोध आहे असे मानून आनंद घ्या."  

पुष्प ४३ पुढे सुरु 

                    स्वामींनी दिलेल्या फुलपाखराला ४ पंख असून ते चमकदार हिरव्या रंगाचे आहे. मागील दोन पंखांवर प्रत्येकी ५ काळे खडे जडवले आहेत तर पुढील दोन पंखांवर प्रत्येकी ५ सोनेरी खडे, त्यांच्या दोन बाजूना दोन काळे खडे आहेत. सगळे मिळून एकूण २४ खडे आहेत, हे मानवी देहातील २४ तत्वांचा निर्देश करतात. चारी पंखांच्या ४ कोपऱ्यात पिवळे गोल खडे आहेत. मागच्या पंखांवर दोन्ही बाजूना तीन तीन पांढरे खडे आहेत तर पुढे एकेक पांढरा खडा आहे. फुलपाखराच्या अर्ध्याभागावर एकूण १८ खडे आहेत, हे खडे स्तूपाचे १८ योग दर्शवितात. सर्वजण आपल्या जीवनात स्तूपाच्या १८ योगांचा अंगिकार करून जीवन मुक्त होतील. फुलपाखराच्या देहाचा मध्यभागी आत्म्याचे प्रतिक आहे. आत्मा २४ तत्वांसह देहास कार्यप्रवण करतो. 
                   साधना करा ! जागृत व्हा ! परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करा. तुमच्या अंतरातील साई तुमच्यावर कृपावर्षाव करतील. फुलपाखरांच्या देहावर पांढऱ्या रंगात S व V ही अक्षरे आहेत. १०००वर्षांसाठी सर्वांना साई आणि वसंता या गोंदणाचा लाभ होईल असे ही अक्षरे सुचवितात. यानंतर पुन्हा कलियुग सुरु होईल. 


जय साईराम 

व्ही. एस.  

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

         " सज्जन असो वा दुर्जन परमेश्वर प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करतो."

पुष्प ४३ पुढे सुरु 

                   पाठीच्या कण्याच्या तळाशी मूलाधार चक्र असते. तेथून इडा व पिंगला ह्या सर्पासारख्या नाड्या उर्ध्वगामी होतात. त्यांच्या मध्यभागी सुषुम्ना नाडी असते. या सर्व नाड्यांचा संयोग आज्ञा चक्रात होतो. ह्याच्या वर महस्त्रार असते. येथूनच तारका स्पंदनानद्वारे अखिल विश्वात अमृत स्त्रवते. ही तारका स्पंदने सर्वांमध्ये प्रवेश करत त्यांना जीवनमुक्त अवस्था प्रदान करतात. चार निळे ढग, स्वामी लवकरच येतील असे सुचित करतात. 
८ जून २०१३ 
                  आज स्वामींनी एक मोठे फुलपाखरू दिले. चमकदार हिरव्यागार फुलपाखरावर सर्वत्र खडे जडविले होते. 
९ जून २०१३: प्रातर्ध्यान 
वसंता - स्वामी, ह्या फुलपाखराचा अर्थ काय ? 
स्वामी - समस्त विश्व हिरवेगार झालं आहे; आणि सर्वजण फुलपाखरांसारखे मुक्त भरारी घेत आहेत. 
ध्यान समाप्त 
                    आता आपण पाहू या. कलियुगात सर्वजण त्यांच्या गतजन्मातील कारागृहात बंदीवान आहेत. कोषातील अळीसारखे ते कार्मिक तुरुंगवास भोगत आहेत. ही जन्मानुजन्मांची संचित कर्मे आहेत. स्वामींनी व मी त्यांची कर्मे घेतल्यामुळे ते सर्व फुलपाखरांसारखे झाले. सत्ययुगातील निर्मिती सदाहरित आहे. सर्वजण जणू आनंदाच्या अवकाशात मुक्तपणे विहरणारी फुलपाखरेच. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम  

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंत साई साय नमः 

दिपावलीचा संदेश 



       अहंकाराचे उच्चाटन साजरे करण्यासाठी परमेश्वराने दिपावली या सणाची योजना केली आहे. मनुष्य अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडतो आहे. त्याची विवेक बुद्धी नष्ट झाली आहे.  त्यामुळे त्याला नित्य व अनित्य यातील भेद जाणता येत नाही. दिव्यत्वाच्या तेजाची अनुभूती घेतल्यानंतर व दिव्यज्ञानाच्या तेजाने, अहंकारामुळे निर्माण झालेला अज्ञानाचा अंधःकार नाहीसा होतो. 
बाबा 
( १९९१ च्या दिवाळी प्रवचनामधून )

जय साईराम  




रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" तो केवळ एकच आहे, जो एकातून अनेक झाला आहे."

पुष्प ४३ पुढे सुरु 

                      ह्या जगात अनेक गुरु-शिष्य आहेत. गुरु शिष्याला मार्गदर्शन करतात, उपदेश देतात. तथापि कोणताही गुरु शिष्याला ध्येयाप्रत नेण्यासाठी उचलून घेतो कां ? गुरु शिष्याला पाठीवर घालून परमेश्वराप्रत नेतो असे स्वप्नातही कोणी पाहिले नसेल. क्षुधिताला त्याची भूक भागविण्यासाठी स्वतः खावे लागते;  दुसऱ्याने खाऊन चालणार नाही. ही गोष्ट अध्यात्मातही लागू आहे. प्रत्येकाला वैयक्तिक साधना करावी लागते. प्रत्येकाने साधना करत प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. सरत्या काळाची जाणीव ठेऊन साधना करा. सर्वांना आपल्या छोट्या मोठ्या कर्मांच्या परिणामांना सामोरे जावेच लागते. तथापि पुण्यकर्मांचे फळ वेदनाशामक इंजेक्शन सारखे कार्य करू शकते. या कायद्यापासून कोणाचीही सुटका नाही. अवतारही त्यांच्या जीवनांद्वारे हेच दर्शवितात. ह्या अवतार काळात केलेल्या कर्मांची अनुभूती ते पुढील अवतारात घेतील. परमेश्वराने मानवरूप धारण करून आदर्श जीवन कसे जगावे हे दाखवून दिले. ह्या कारणासाठीच ते भूतलावर अवतरले. 
                     आता आपण त्या चित्राविषयी पाहू. मध्यावरील पणती स्तूपाचे ध्योतक आहे. तिच्या एका बाजूला स्वामींचे तर दुसऱ्या बाजूला माझे नाव आहे. स्वामींचे व माझे भाव स्तूपामधून तारका स्पंदनांद्वारे विश्वव्याप्त होतात. स्वामींनी चितारलेल्या या दिव्याभोवतीचा प्रकाश एकमेकांत गुंतलेल्या इडा व पिंगला या सर्पसदृश नाड्यांचे प्रतीकात्मक स्वरूप आहे. या नाड्यांच्या योग आज्ञाचक्रामध्ये होतो. त्यांच्या मध्यभागी असलेल्या नाडीला सुषुम्ना नाडी म्हणतात. येथूनच तारका स्पंदने बाह्यगामी होतात. षटकोनी पणती स्तूपाचा जो पाया लाल कमळ त्याचे प्रतिनिधित्व करते. याची उत्पत्ती परमेश्वराच्या सहा गुणांपासून होते. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

         " प्रत्येक गोष्टीकडे आपण ईश्वरलिला या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. हे विश्व म्हणजे त्या सर्व श्रेष्ठ परमेश्वराचे नाट्य आहे."

पुष्प ४३ पुढे सुरु

                     विष्णू म्हणजे पालनकर्ता. जो मनुष्य भौतिकते कडून अध्यात्माकडे वळतो, जन्म व दुःखाचे मूळ कारण शोधून काढतो आणि स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणतो तो विष्णू बनतो. यानंतर त्याचे मन केवळ अध्यात्मात निमग्न राहते. 
                    स्वतःमधील दुर्गुणांचा संहार केल्याने तो महेश्वर; संहारकर्ता शिव होतो. असे हे त्रिदेव तसेच ब्रम्ह्लोक, कैलास व विष्णूलोक प्रत्येकाच्या अंतरातच आहेत. परमेश्वराचे चिंतनकरून ध्यान केल्यास मानवाला ह्या तिन्ही लोकांचे ज्ञान प्राप्त होते. आपला हृदयस्थ आत्माराम गुरु बनून आपले मार्गदर्शन करतो. ह्या काळात सद्गुरु दुर्मिळ आहेत. एकलव्याने एकट्याने साधना करून परमेश्वर प्राप्ती केली, त्याप्रमाणे आपणही परमेश्वरालाच गुरु मानले पाहिजे, त्यासारखी एकाग्र साधना करायला हवी.   
ध्यान: ८ जून २०१३ ध्यान 
वसंता - स्वामी, काहीजण तुमच्या समीप असूनही त्यांना दुःख भोगावे लागते. असे का बरे ? 
स्वामी - सर्वांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्याचे परिणाम भोगावेच लागतात. 
वसंता - स्वामी, असे आहे तर परमेश्वरी कृपा त्यांच्यासाठी काहीच करत नाही कां ? 
स्वामी - नाही. त्यांनी केलेल्या दुष्कर्मांना त्यांना तोंड द्यावेच लागते. तथापि त्यांची दुष्यकर्मे, सत् कृत्ये त्यांचे फल त्यांच्यासाठी वेदनाशामक उतारा ठरते. त्यांना वेदना जाणवत नाही. सर्वांना त्यांनी केलेल्या कर्मांच्या परिणामांना सामोरे जावेच लागते. 
वसंता - स्वामी, आपण ' गुरुचरण मानवाला भवसागरातून तारतात ' असे लिहलेत. 
स्वामी - गुरु मार्गदर्शन करतो, उपदेश करतो. परंतु यासाठी सर्वांनी स्वतः प्रयत्न करणे अनिवार्य आहे. भूकेल्याने स्वतः खायला हवे, त्याच्या क्षुधाशांतीसाठी दुसरा कोणीही खाऊ शकत नाही. 
वसंता - ठीक आहे स्वामी. मी याविषयी लिहीन.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

             " प्रथम साधना करून आपण मोक्ष प्राप्त केला पाहिजे आणि नंतर स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले पाहिजे."

वसंतामृतमाला 

पुष्प ४३ 
गुरु कोण ?

                    ४ जून २०१३ रोजी स्वामींनी एक कागद दिला; त्यावर काही चित्रे रेखाटली होती. मध्यभागी लाल रंगी ज्योत असलेली तेलाची पणती होती. पणती भोवती पिवळे वलय होते, आणि वरच्या बाजूला एका पिवळ्या वर्तुळात पंचकोनी चांदणी होती . चांदणीच्या आत शिरोभागी मंगळसूत्र होते तर दोन्ही बाजूंना दोन दोन असे एकुण चार निळे ढग होते. पणतीच्या एका बाजूला साई लिहिले होते व दुसऱ्या बाजूला वसंता. आणिक् पणतीच्या खाली …. 
           ' गुरु तिन्ही लोकांचा स्वामी आहे. तो ब्रम्हा, विष्णू व महेश्वर आहे. ' असे लिहिले होते. 
                 आता आपण पाहू. गुरू तिन्ही लोकांचा स्वामी आहे. तो ब्रम्हा, विष्णू व महेश म्हणून ओळखला जातो. आपल्या प्रत्येकाच्या अंतरात ह्या त्रिमूर्ती विद्यमान असतात. मी पूर्वी या विषयावर एक अध्याय लिहिला आहे. मानव त्याची कर्मे व इच्छांपुढे स्वतःचे जीवन घडवत असतो, तो स्वतः त्याच्या प्रत्येक जन्माचा निर्माता असतो. प्रत्येकाच्या अंतरात ब्रम्हदेव विद्यमान आहे, याचा हा अर्थ. माणसाचा प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार संस्कार रूपाने त्याच्या मनावर बिंबतो, आणि हाच त्याच्या पुढील जन्माचा आराखडा बनतो. मृत्यूनंतर ही त्याची निर्मिती होते.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम