रविवार, २८ डिसेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १७
       
            या दोघांव्यतिरिक्त एक परमपुरुष आहे त्याला परमात्मा म्हटले जाते. तो अविनाशी पुरुष तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, तू अविनाशी आहेस.  या नाशवंताच्या देहामध्ये प्रवेश कर आणि त्याची पोषण कर. तुझ्या दयेला अंत ना पार. हे करुणामूर्ती कमलनयना तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्. या पाप्याला पावन बनव आणि तुझ्या दिव्य चरणांशी घेऊन जा. हे जगद् रक्षका, त्रिलोकनाथा, त्रिमूर्तींच्या प्रमुखा, श्रीमन् नारायणा, तू मला आश्रय दे. मी तुला शरण आलो आहे.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २१ डिसेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १६
       
            या विश्वात नाशवंत आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे ही नाशवंत आणि जीवात्मा अविनाशी असे म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, यः कश्चित जिवाला अक्षर पुरुष होऊ दे. तुझा भक्त कर. गुणातीत बनव. स्थितप्रज्ञ कर. मुमुक्षू बनव, भगवत् कार्य करणारा बनव. श्रीमन् नारायणा! तूच आसरा! प्रभू, शरणो शरणम्. भगवंता, तुझ्या पादपुष्पांवर स्वीकारून आशीर्वादित कर. कान्हा तूच माझा आश्रय, कान्हा !

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

 

 

 

 

 

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १५
       
            मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती (अपोहन) होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. वेदान्ताचा कर्ता आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! तूच माझा आधार, सर्वांच्या अंतरात प्रवेश करून राहतोस. या चाकराच्या अंतरात मात्र का नाही? माझ्या भगवंता! अवमानांनी क्षीण झालेला या शरीरात या क्षणी येऊन राहा! सर्व गुणसंपन्ना! तुझ्यामुळे ह्याचे अंतर शुद्ध होऊ दे. चांगल्याचे स्मरण राहू देत आणि वाईटाचे विस्मरण होऊ देत. ज्ञान देऊन आशीर्वादित कर. जाणिवेच्या पलीकडे असलेल्या तुला जाणून घेऊ दे. माझ्या नाथा, प्रभू!

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १४
       
            मीच सर्व प्राण्यांच्या देहात प्राण आणि अपान वायूंशी संयुक्त वैश्वानर अग्नीरूप होऊन चार प्रकारचे अन्नपचवतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! करुणासागर! गौरमणा! वेणुगोपाला! या निरुपयोगी देहात येऊन वास कर. वैश्वानर होऊन चार प्रकारच्या अन्नाचे पचन कर. जिभेच्या चवीवर माझा ताबा राहू दे. नारायणनाम उच्चारण करायला लाव. प्राणायाम करण्यास प्रवृत्त कर. प्रल्हादास सहाय्य करणाऱ्या, याला तुझ्या चरणी घेऊन आशीर्वाद दे. तूच माझा निवारा! 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ७ डिसेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १३
       
            मीच पृथ्वीत (ग्रहलोकात) शिरून आपल्या शक्तिने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           वण्णमुडीया* ! वरगुण* मंगौ नेसा! वानवरकरसे कण्णा (स्वर्गधिपती कृष्णा )  या अगतिकाची तूच गती. शरणो शरणम्.  वीरराघवा, या वाईटातील वाईट निरुपयोगी जिवाचे रक्षण करून आशीर्वाद दे. सोमसुंदरा! सोमरस होऊन तू वनस्पतींचे रक्षण करतोस. या आळशाला तुझा चाकर बनवून तुझी सेवा करायला लाव. श्रीमन् नारायणा! तूच माझी गती ! शरणो शरणम्. 

*टीप :  वण्णमुडीया आणि वरगुण तमिळनाडूतील तीर्थे  

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम