गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १४
       
            मीच सर्व प्राण्यांच्या देहात प्राण आणि अपान वायूंशी संयुक्त वैश्वानर अग्नीरूप होऊन चार प्रकारचे अन्नपचवतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! करुणासागर! गौरमणा! वेणुगोपाला! या निरुपयोगी देहात येऊन वास कर. वैश्वानर होऊन चार प्रकारच्या अन्नाचे पचन कर. जिभेच्या चवीवर माझा ताबा राहू दे. नारायणनाम उच्चारण करायला लाव. प्राणायाम करण्यास प्रवृत्त कर. प्रल्हादास सहाय्य करणाऱ्या, याला तुझ्या चरणी घेऊन आशीर्वाद दे. तूच माझा निवारा! 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा