गुरुवार, २३ एप्रिल, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            लहानपणापासून मला कृष्णाची विवाह करायचा होता. आता ६३ व्या वर्षी माझे नातेवाईक माझी मुले आणि पती या सर्वांनी मला साईकृष्णाला देऊन टाकले. ही घटना मी विसरू शकत नाही खरोखर एक अजब चमत्कार! केवळ परमेश्वरालाच त्याच्या लीला ठाऊक! स्वामींनी कसे मला सर्व बंधना मधून मुक्त केले व केवळ त्यांचाच एक बंधन आहे हे दर्शविले. हा काही संन्यास समारंभ नसून विवाह समारंभ आहे! तरुण असताना मी स्वतः अंडाळ असल्याची कल्पना करून मी तिच्या ' वारनम अयिराम ' . हा श्लोक पुन्हा पुन्हा गाऊन आनंद घेत असे. ह्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाशी झालेल्या तिच्या स्वप्न विवाहाचे वर्णन करते. आज हे सत्यात उतरले आहे. अखिल विश्व या विवाह समारंभाचे साक्षी आहे. " यद् भावम् तद् भवति " तुम्ही ज्याचा विचार करता ते बनता. मी कथिलेला कृष्णाची विवाहाचा प्रसंग आता वास्तवात उतरला आहे वा वास्तव बनला आहे. मी ४० वर्षे गृहस्थाश्रमी संन्यासी होऊन जीवन जगले. आता संन्यासी बनून मी कृष्णाबरोबर गृहस्थ जीवन जगत आहे! ज्या चमत्काराने माझी मनोकामना पूर्ण केली त्या चमत्काराचे कोणालाही आकलन होणार नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             सत्यवान- सावित्रीची गोष्ट सर्वांना माहीत आहे. तरीही महान संत अरविंदांचे लिखाण वेगळे आहे. ते दुसरी कथा सांगत होते. ते त्रिकाळ ज्ञानी आहेत. त्यांना भूतकाळ, वर्तमान व भविष्याचे ज्ञान आहे. ते त्या सत्यवानसंबंधी लिहीत नव्हते; तर भविष्यात होणारा अवतार भगवान श्री सत्यसाईबाबांबद्दल लिहीत होते. त्यांनी अवतार व त्याची शक्ती, यांच्या अवतार कार्याबाबत लिहिले. स्वामींचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ ला झाला. दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबर, १९२६ ला अरविंद यांनी घोषित केले, "आज कृष्ण स्थूल रूपात अवतरला." या घोषणेनंतर ते एकांतात गेले व क्वचितच दृष्टीस पडले.
             अशारीतीने स्वामींनी सावित्री पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित केले व मला माझ्या जीवनाशी त्या भागांची तुलना करावयास सांगितले. आता आपण पाणी १०६ पाहू.
             .....तुझ्या अंतरंगातील धगधगणाऱ्या मार्गदर्शकाशिवाय इतर कोणाची तुला गरज नाही. तुझा होऊ घातलेला जीवनसाथी व सोबती तुझी वाट पाहत आहे.




संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १९ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             स्वामींनी १९९८ मध्ये माझ्या उदरात विश्व ठेवले. मी मातृभावामुळे विश्वपरिवर्तन घडविले. कलियुगात या भूतलावर खरा आनंद कुणालाही माहित नाही. फसव्या आनंदाच्या शोधा ते इकडून तिकडे भरकटत आहेत. सर्व जन्ममृत्यूच्या चक्रात अडकले आहेत. खरे तर निखळ आनंद केवळ परमेश्वरापासून प्राप्त होऊ शकतो.

             'मी व माझे' यावरील ममत्वाचा त्याग केला तरच निखळ आनंद निर्माण होतो. जगास याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मी इथे आले. जागतिक कर्मे स्वीकारून मी यातना भोगत आहे. हे माझ्या मातृभावामुळे साध्य होते. स्वामींनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             हे माझ्याशी तंतोतंत जुळते. वसंता म्हणजे वसंत ऋतुचे आगमन-  माझा जन्म. पूर्वी स्वामींनी मला 'वैश्विक स्फोट' ही कविता दिली. त्यात माझा जन्म व जीवनाचे वर्णन आहे. हा अध्याय त्या पूर्ण कवितेने संपतो.

अवसेच्या अंधाऱ्या रात्री वडकंपट्टी ग्रामी
जाहला पुनवेचा जन्म

           त्यांनी माझ्या माता-पित्यांबद्दलही लिहिले. पुढे स्वामींनी घोषित केले की, ते व मी आम्ही दोघं,'असूनही एक झालो दोन' अशा रीतीने त्यांनी आमची अवस्था जगासमोर उघड केली, होय. मी विश्वमाता आहे. अखिल विश्व मी माझ्या उदरात वहावे, माझ्यापासून सर्व जन्माला यावेत यासाठी स्वामींकडे अश्रू ढाळले. ' उपनिषदांच्या पलीकडे' या पुस्तकात मी हे लिहिले आहे.
 

संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १२ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

२८ सप्टेंबर २०१३ मध्यान्ह ध्यान 

वसंता : स्वामी मी सावित्री वर लिहू का?
स्वामी : होय, तू लिही. अरविंदांनी तुझ्या जीवनाबद्दलच लिहिले आहे.
वसंता : आता मला समजलं स्वामी, मी लिहीन.
ध्यान समाप्त.
          स्वामींनी श्री अरविंद यांच्या 'सावित्री' या पुस्तकातील अध्यायांमधील काही भाग सुचित केले. मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले की ते सर्व माझ्या जीवनाशी निगडित होते. सावित्रीच्या व माझ्या जीवनशैलीमध्ये आमच्या जन्मापासूनच साधर्म्य आहे. तिच्या जन्माबाबत १०१ पानावर स्वामींनी काय अधोरेखित केले ते आपण पाहू,
           ....वसंत ऋतु बहरला. अशाच एका बहराच्या अत्युच्च क्षणी, सृष्टीच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करत असता, सत् चित् आनंदासाठी तिने दिलेल्या हाकेला ओ देत एक दैवी आत्मा पृथ्वीवर अवतरला. सावित्री जन्मली. अपूर्ण काय हाती घेण्यास आदिमाता भूतलावर परत आली.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ९ एप्रिल, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            प्रथम गणेश होम, नवग्रह होऊन आणि लक्ष्मीनारायण सुदर्शन होऊन झाले. अखेरी संन्यास होऊन करण्यात आला. ह्या होमाच्या अगोदर माझे मंगळसूत्र काढले व ते फुले फळे व इतर पूजा साहित्य बरोबर एका तबकात ठेवण्यात आले. त्यानंतर ते माझ्या यजमानांनी दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केले. इथून पुढे त्यांना माझे यजमान म्हणणे उचित ठरणार नाही. आता माझी आणि त्यांचे नाते मित्रत्वाचे आहे. असा मित्र जो परमेश्वराचे कार्य करण्यासाठी मला सहाय्य करतो.  श्री मनोहरननी स्वतःच्या हातानी मी काढलेले मंगळसूत्र  दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केलेले पाहून सर्वांचे डोळे पाणावले. माझ्या आयुष्यात अशी घटना घडेल असे कोणालाही वाटले नव्हते. स्वामी म्हणाले की अशी घटना कोणाच्याही जीवनात घडलेली नाही. कोणतीही स्त्री आपले मंगळसूत्र काढण्यास व आपल्या पतीकडून ते परमेश्वरास अर्पण करण्यास राजी होणार नाही. मी दीर्घकाळ गृहस्थाश्रमात असूनही संन्यासी होते व आता मी पूर्णपणे शास्त्रसंमत संन्यासी आहे. मंगळसूत्र काढण्याच्या घटनेने मला रामकृष्ण परमहंस आणि पवित्र धागा तोडल्याची आठवण करून दिली. पवित्र अग्नीमध्ये पूर्ण होती देताना मी म्हणाले, "भगवान आम्ही आमचे जीवन आपणास समर्पित करतो."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
            इथे माझी पृथ्वीवरील अवतरण सूचित केले आहे. पूर्वी एकदा स्वामी म्हणाली की कलियुगाच्या लोकांचे रुदन ऐकून व त्यांच्या यातना पाहून महालक्ष्मी धरतीवर अवतरली. मी अशी अवतरले. मी कलियुग तोडून प्रकृतीचे विधीलिखित बदलण्यासाठी आले. कलीचा कायदा म्हणजे कर्मकायदा. हा कायदा तोडून मी प्रकृतीचा अधःपात थांबविते. हा विनाश प्रकृतीचे विधीलिखित आहे मी स्वामींपासून नियुक्त झाल्यामुळे, माझ्यापाशी असलेल्या सर्व शक्तीनिशी मी हे करते. "त्या"ने मला वेगळ्या रूपात आणले मी "त्या"ची शक्ती आहे.
            स्वामी व मी इथे आलो. कलियुगाला मुक्त करण्यासाठी अखिल विश्वाची कर्मे आमच्या देहांवर घेतली. या आपत्काली मृत्यूघटकेच्या वेळी मी अश्वत्थ वृक्ष परत विश्वात आणून पृथ्वीवर-  मानवी मातीवर त्याचे आरोपण करते. या जगात मी स्वामींना परत आणि असा याचा अर्थ आहे. "त्या"च्या संसार वृक्षाचे पृथ्वीवर रोपण झाले. मी पृथ्वीचे वैकुंठात परिवर्तन करते, तिला स्वर्गाची शाखा करते. प्रकृती सर्वांना मुक्ती बहाल करते. ती स्वतः झेप घेऊन मानवाला अमृतवाकडे घेऊन जाईल.
 



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम