रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

 🕉️महाशिवरात्री संदेश🕉️


प्रत्येक मनुष्याने प्रत्येक पवित्र उत्सवाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे परंतु सर्व सणांमध्ये महाशिवरात्र हा सण विशेष का मानला जातो?

या दिवशी परमेश्वर तुमच्या अत्यंत जवळ असतो. माघ शुक्ल चतुर्दशीच्या मध्यरात्री दैवी स्पंदने मानवाच्या भोवती, अत्यंत समीप असतात. आपण हा दिवस अत्यंत पवित्र भावनेने व्यतीत केला तर दैवी शक्ती आपल्याला आकर्षित करते.

या जगात दैवी तत्त्वाइतके जवळचे काहीही नाही. कधी कधी आईदेखील काहीशी दूर असू शकते पण दैवी तत्त्व सदैव आपल्या जवळ असते. 

शिवरात्री म्हणजे रुद्रांवर विजय मिळवण्याची रात्र

‘रुद्र’ म्हणजे भयानक. अकरा रुद्रांची रूपं भयप्रद आहेत. ही भयप्रद तत्त्वं मानवामध्ये प्रवेश करून सर्व दुःख, क्लेश आणि चिंता यांस कारणीभूत ठरतात. या रुद्रांना वश करण्यासाठी महाशिवरात्रीची योजना करण्यात आली आहे.

रुद्रांवर नियंत्रण म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. इंद्रिय निग्रह सोपा नाही. आंतरिक आसक्तीमुळे मनुष्य स्वतःच्या दुःखाला स्वतःच कारणीभूत ठरतो.

जर रुद्रांच्या बाह्य प्रभावांवर नियंत्रण ठेवले नाही, तर अंतर्गत रुद्रांच्या प्रभावांवरही नियंत्रण ठेवता येत नाही. ही अंतर्गत प्रवृत्तीच सर्व क्लेशांचे कारण ठरते. म्हणून इंद्रिय निग्रह साधणे अत्यंत कठीण आहे.

३६५ दिवसांपैकी किमान एक दिवस तरी मनुष्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्या एका दिवसातील निग्रहामुळे मानसिक शांती प्राप्त होते आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न सुलभ होतात कारण एका दिवसाचेही इंद्रियसंयमन मनुष्याला मुक्तीच्या साम्राज्याकडे नेऊ शकते. म्हणूनच महाशिवरात्रीची योजना करण्यात आली आहे.

म्हणूनच, जेव्हा आपण संपूर्ण रात्र प्रभूचे नामस्मरण करतो, तेव्हा आपली दृष्टी, श्रवण, वाणी आणि सर्व इंद्रिये परमेश्वरामध्ये लीन होतात.

— सत्य साई बाबांनी ११ मार्च १९९४ दिवशी महाशिवरात्री निमित्त दिलेल्या दिव्य सत्संगातून....

  

 जय साईराम 



    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७८
       
             जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धारण करणारा अर्जुन आहे तेथेच श्री, विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
              कान्हा! तू आणि मी जेथे कुठे एकत्र (बरोबर) असू तिथे उत्कर्ष, विजयश्री, नावलौकिक आणि सदाचरण राहील. तू ये, येऊन माझ्या मनात रहा. गोविंदा, काळोखे मन प्रकाशित होऊ दे. आदिनारायणा, अनंतशयना! भगवान वासुदेवा! कान्हा! प्रभू! या निराधाराने केवळ तुझा आसरा शोधला, आदर करून आशीर्वाद दे. कान्हा! कान्हा! शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७७
       
           हे राजन! श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही पुन्हा पुन्हा आठवण माझ्या मनाला अत्यंत विस्मय वाटतो आहे आणि मी अत्यंत आनंदित होत आहे आणि पुलकित होत आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
             कान्हा! तुझ्या प्रचंड, अतिअद्भुत रूपाचा विचार करकरून हा दिन अति आश्चर्यचकित होईल असे कर. पुन्हा पुन्हा चक्कीत होईल असे कर. श्रीनिवासा! जगदीशा! दिनरक्षका! दयाळा! दयासिंधू प्रभू! या निराधाराचा तू आधार. शरणो शरणम्. कान्हा, कमलनयना तुझ्या  सुवर्णचरणांवर या दुबळ्याला धडकन घालून आशीर्वाद दे. सदा सर्वकाळ केवळ तुझाच विचार करायला लाव. कान्हा! केशवा!

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

 


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            स्वामी म्हणाले," ते स्वतःच दुर्गेला मंगळसूत्र समर्पित करतील." आज ते खरं ठरलं आहे रात्रीतून सर्व तयारी करण्यात आली.

७ फेब्रुवारी २००१ पहाटे ४ वा.

            घड्याळाचा गजर झाला.' ॐ साई श्री साई जय जय साई.' ध्यान व अभिषेक झाल्यानंतर मी, स्वामींनी कुंकवाने आशीर्वादित केलेले त्यांचे पदक घातले. नवीन साडी व नवीन जोडवी घातली. मी माझ्या तिन्ही मुलांना व सुनांना आज घडणाऱ्या घटनेचा संदर्भात सांगितले. संन्यास घेण्यासाठी त्यांनी मला मुक्त करावे असेही मी त्यांना म्हणाले. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. ते म्हणाले," नाही आम्ही तुलाही नाही करू देणार. " ते रडत होते, माझी अर्ज करत होते माझी सून, मनो म्हणाली," तुम्हाला जे हवे ते तुम्ही करा, परंतु मंगळसूत्र काढू नका." मी म्हणाले," ही परमेश्वराची आज्ञा आहे मला ती शिरंसावंद्य मानलीच पाहिजे. केवळ तुम्ही माझी मुले नसून समस्त विश्वातील लोकं माझी मुलं आहेत. इथून पुढे मला त्यांच्यासाठी जगले पाहिजे. तुम्हाला माहित आहे दररोज मला त्यासाठी असंख्य फोन व पत्रे येतात. अनेक लोकं माझा शोध घेत येथे येतात. मला त्या सर्वांसाठी प्रार्थना करायला नको का? मी त्यांना मदत केली पाहिजे. भगवान तुम्हाला मंगल आशीर्वाद देतील जग तुमच्या त्यागाची प्रशंसा करेल. संन्यास घेण्यासाठी मला मनापासून व आनंदाने निरोप द्या.
             एस. व्ही.नी जमलेल्या सर्व लोकांना आजच्या घटने विषयी थोडक्यात सांगितले ते म्हणाले," जगाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णक्षराने लिहिला जाईल. आम्हा संन्यास घेत आहेत. आजचा दिवस विशेष आहे. आज पौर्णिमेचा पवित्र दिन आहे. अम्मांबरोबर बरोबर श्री मनोहरनही संन्यास घेत आहेत. याला आत्मसंन्यास म्हणतात. आत्मसंन्यास म्हणजे जंगलात जाणे व भगवी वस्त्र धारण करणे नव्हे. स्वामींनी त्या दोघांना पती पत्नीच्या वैवाहिक नात्याचा त्याग करण्यास सांगितला आहे. अम्मा त्यांचे मंगळसूत्र काढतील व श्री मनोहर अन ते दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करतील. जगामध्ये असे कधीही घडले नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७५
       
           श्री व्यासांच्या कृपेने हे परमगृह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
             कान्हा, योगेश्वरा मला योगी बनव, संन्यासी बनव. तुझा भक्त बनव. मुमुक्षू बनव. माझ्या हातून केवळ तुझीच कर्म घडू देत. तू मला कर्मसंन्यासी बनव. या पाप्याला पवित्र कर. मला तुझ्या चरणकमलांशी घेऊन जा. मला सदैव तुझ्या गीतामृताचे रसपान करू दे, तुझा उपदेशाचे अमृतपान करू दे. माझ्यामध्ये सद्गुण जोपासले जाऊ देत. हे पद्मनाभा, शेषशयना, माझा आश्रय. शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २७ 
       
           यज्ञ तप आणि ज्ञान यामध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत् असे म्हटले जाते आणि परब्रम्हाच्या संतुष्टी प्रीत्यर्थ केलेल्या कर्मानाही सत् असे म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
              
           कान्हा! या हीनाला यज्ञ, तप आणि दान यामध्ये दृढश्चित्त कर. तुझ्यासाठी सत्कर्म करायला लाव. वैकुंठवासुदेवा! वराहवतारा! वामना! याला तुझ्या चरणी स्वीकारून त्याची कल्याण कर. कान्हा! तूच आधार प्रभू! शरणो शरणम्. नीचाला त्वरेने तुझ्या चरणी घे. प्रभू! शरणम्

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २९ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २६ 
       
           'सत्' परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्थ! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! या निरुपायी जीवाला तुझा उत्तम गीतोपदेश असा 'सत्' हा शब्द तसेच त्यातील सत्य आणि चांगलं ह्यांच्या अर्थाची जाणीव करून दे.  माझ्याकडून प्रशंसनीय कृत्ये करून घेऊन मला सत् नाम प्राप्त करून दे. वासुदेवा! ये नं! माझ्या मनात येऊन राहा. माझी काळोखे मन उजळू दे. कान्हा! ईसा! ये, येऊन मला तुझ्या चरणी स्वीकारून माझा उद्धार कर. तूच स्वामी! प्रभू!

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम