गुरुवार, ९ एप्रिल, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            प्रथम गणेश होम, नवग्रह होऊन आणि लक्ष्मीनारायण सुदर्शन होऊन झाले. अखेरी संन्यास होऊन करण्यात आला. ह्या होमाच्या अगोदर माझे मंगळसूत्र काढले व ते फुले फळे व इतर पूजा साहित्य बरोबर एका तबकात ठेवण्यात आले. त्यानंतर ते माझ्या यजमानांनी दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केले. इथून पुढे त्यांना माझे यजमान म्हणणे उचित ठरणार नाही. आता माझी आणि त्यांचे नाते मित्रत्वाचे आहे. असा मित्र जो परमेश्वराचे कार्य करण्यासाठी मला सहाय्य करतो.  श्री मनोहरननी स्वतःच्या हातानी मी काढलेले मंगळसूत्र  दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केलेले पाहून सर्वांचे डोळे पाणावले. माझ्या आयुष्यात अशी घटना घडेल असे कोणालाही वाटले नव्हते. स्वामी म्हणाले की अशी घटना कोणाच्याही जीवनात घडलेली नाही. कोणतीही स्त्री आपले मंगळसूत्र काढण्यास व आपल्या पतीकडून ते परमेश्वरास अर्पण करण्यास राजी होणार नाही. मी दीर्घकाळ गृहस्थाश्रमात असूनही संन्यासी होते व आता मी पूर्णपणे शास्त्रसंमत संन्यासी आहे. मंगळसूत्र काढण्याच्या घटनेने मला रामकृष्ण परमहंस आणि पवित्र धागा तोडल्याची आठवण करून दिली. पवित्र अग्नीमध्ये पूर्ण होती देताना मी म्हणाले, "भगवान आम्ही आमचे जीवन आपणास समर्पित करतो."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
            इथे माझी पृथ्वीवरील अवतरण सूचित केले आहे. पूर्वी एकदा स्वामी म्हणाली की कलियुगाच्या लोकांचे रुदन ऐकून व त्यांच्या यातना पाहून महालक्ष्मी धरतीवर अवतरली. मी अशी अवतरले. मी कलियुग तोडून प्रकृतीचे विधीलिखित बदलण्यासाठी आले. कलीचा कायदा म्हणजे कर्मकायदा. हा कायदा तोडून मी प्रकृतीचा अधःपात थांबविते. हा विनाश प्रकृतीचे विधीलिखित आहे मी स्वामींपासून नियुक्त झाल्यामुळे, माझ्यापाशी असलेल्या सर्व शक्तीनिशी मी हे करते. "त्या"ने मला वेगळ्या रूपात आणले मी "त्या"ची शक्ती आहे.
            स्वामी व मी इथे आलो. कलियुगाला मुक्त करण्यासाठी अखिल विश्वाची कर्मे आमच्या देहांवर घेतली. या आपत्काली मृत्यूघटकेच्या वेळी मी अश्वत्थ वृक्ष परत विश्वात आणून पृथ्वीवर-  मानवी मातीवर त्याचे आरोपण करते. या जगात मी स्वामींना परत आणि असा याचा अर्थ आहे. "त्या"च्या संसार वृक्षाचे पृथ्वीवर रोपण झाले. मी पृथ्वीचे वैकुंठात परिवर्तन करते, तिला स्वर्गाची शाखा करते. प्रकृती सर्वांना मुक्ती बहाल करते. ती स्वतः झेप घेऊन मानवाला अमृतवाकडे घेऊन जाईल.
 



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ५ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
            स्वामींनी सर्वप्रथम ९७ पानावरील उतारा निर्देशित केला. या पानावर स्वामींनी खालील वाक्य अधोरेखित केले,
           पृथ्वीवर स्वर्गाचे पदार्पण होईल.....
           या ओळीच्या बाजूला समासात स्वामींनी लिहिले,"वैकुंठ!" त्याच पानावर स्वामींनी खालील उतारा उद्घृत केला.
            मी तुझा आक्रोश ऐकला आहे. होय! आत्मिक शक्तीने कलिचा कायदा तोडून प्रकृतिचा अधःपत थांबविणारा अवतरणार आहे. मृत्युच्या महाभयंकर घटकेच्या वेळी बीजारोपण होईल. स्वर्गाच्या शाखेचे मानवी मातीवर आरोपण होईल. प्रकृती तिच्या मरते पायरीवरून (अमृतत्वाकडे) झेप घेईल.




संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
प्रस्तावना 

             एकेक चक्र पार करत गेल्यानेच मनुष्य परमेश्वर प्राप्ती करू शकतो. एक व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत भगवान प्राप्ती कशी करते. सत्यवान् - सावित्री कथेमधून शब्दबद्ध केले आहे. आणि अमृतत्वास कशी प्राप्त होते हे श्री. अरविंद सत्यवान्- सावित्री या कहाणी मधून दर्शवितात. अरविंदांनी या पुस्तकात जे काही लिहिले आहे त्या सर्वांचे प्रात्यक्षिक मी व स्वामी या स्थूल जगात करीत आहोत. तथापि एखादी गोष्ट वाचणे आणि स्वामी व माझ्या जीवनामध्ये घडणारे सर्वांनी. चक्षुर्वेसत्यं पाहणे यामध्ये खूप फरक आहे. हे पुस्तक वाचून सर्वांनी अंतर्गत अध्यात्मिक प्रवासासाठी स्वतःस तयार करायला हवे.
             सावित्री तिच्या पतीचे विधीलिखित बदलते. स्वामी व मी एका युगाचे विधीलिखित बदलतो! आम्ही कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करतो.
             पुष्कळ वर्षांपूर्वी स्वामींनी मला सांगितले होते की, नारदाचा अंश अवतरून आपली कथा लिहील. त्यावेळी मला या पुस्तकाची माहिती नव्हती. नारदाचा कोणता अंश आमची जीवनगाथा लिहावयास येईल हे पाच वर्षानंतर आत्ता स्वामींनी दाखविले. हे आहेत श्री. अरविंद. अवतार म्हणून अवतरलेल्या स्वामींच्या जीवन कार्याचे त्यांनी या पुस्तकात वर्णन केले आहे.

* एम्.पी. पंडितांच्या 'संक्षिप्त सावित्री' पुस्तकामधून.
टीप : यापुढे ढळक अक्षरातील उतारे हे योगी अरविंदांच्या ' सावित्री ' या मूळ पुस्तकातील आहेत.
  

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




रविवार, २९ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
प्रस्तावना 

            श्री अरविंदच्या 'सावित्री' या  पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित करून स्वामींनी दिव्य संदेश म्हणून मला दिले. मी स्वामींना विचारता स्वामी म्हणाले," मी या पुस्तकात अधोरेखित केलेल्या भागांवर आधारित तू तुझ्या जीवनाची तुलना सावित्रीच्या जीवनाशी कर."
           पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर मी अचंबित झाले; कारण माझी व सावित्रीची जीवनशैली समांतर आहे. मी विचार केला," श्री अरविंदना माझ्याबाबत कसे बरे ठाऊक झाले?" या पुस्तकात त्यांनी जीवात्म्याचा अंतर्गत प्रवास व सत्यप्राप्तीच्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांचा करावा लागणारा सामना याविषयी लिहिले आहे. कुंडलिनीचे एकेक चक्रपार करून जात असता जे बदल घडतात ते अरविंद आणि सविस्तर लिहिले आहेत.

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २६ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
आभार 

            श्री अरविंद यांचे 'सावित्री' हे काव्य, त्यांची दूरदर्शी व स्फूर्तीदायक सत्य दृष्टी यांची, श्री वसंतसाई व वसंतसाई बुक्स अँड पब्लिकेशन ट्रस्ट कृतज्ञता व्यक्त करतात. आज हे पुस्तक त्यांच्या सावित्री मुळे अस्तित्वात आले.

          'संक्षिप्त सावित्री' हे पुस्तक लिहिणाऱ्या एम.पी. पंडितांना शतशः धन्यवाद. वसंतसाई अम्मांच्या लेखनास मार्गदर्शन करून स्फूर्ती देणाऱ्यासाठी भगवान सत्यसाईबाबांनी या पुस्तकातील काही भाग अधोरेखित केले.

           प्रिय वाचक ....
          या पुस्तकातील श्री वसंतसाई, श्री सत्यसाईबाबांचा उल्लेख स्वामी असा करतात.

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, २३ मार्च, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            त्यानंतर आम्ही स्वामींचा फोटो व पादुका घेऊन नागरसंकिर्तन करत गावामध्ये मिरवणूक काढली. मी माझी कृष्णाची मूर्ती बरोबर घेतली. दारातच (लहान मुलगा) मणिवन्ननने माझे पाय धरले वरडत रडत 'मी तुला जाऊ देणार नाही' असे म्हणाला. मी म्हणाले," स्वामींनी मला सांगितले आहे मला गेलेच पाहिजे. ही सर्व माया आहे." माझ्या कृष्णाच्या मूर्तीला, श्री मनोहरनना  व मला हार घालण्यात आले. मी माझ्या कृष्णासोबत जीवन प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी पाऊल उचलले. मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या सुवासिनी ध्यान सभागृहात पोहोचल्या. आम्ही श्री गणेशाला प्रदक्षिणा घालून ध्यान सभागृहाच्या पायऱ्या चढलो. एस. व्ही. नी दूधभात कालवला. कोदाईंनी त्याचे तीन उंडे बनवले आणि मला भरवले. ते खाऊन मी श्री मनोहर यांच्या सह सभागृहात प्रवेश केला.
             रंगीत दिव्यांच्या माळा व फुलांनी सभागृह सुशोभित केले होते. सभागृह इंद्राच्या दरबारासारखे भासत होते. लोक दोन्ही बाजूला बसली होती. व्यासपीठावर मध्यभागी स्वामींचा भव्य फोटो लावला होता. या फोटो त्यांचा उजवा हात चिन्मुद्रेत होता. त्यांच्या अनामिकेचा अग्रभाग अंगठ्यावर दाबला होता व बाकीची तीन बोटी मिटलेली होती. एका भक्ताने याचे सुंदर स्पष्टीकरण दिले. जर एखाद्याने तिन्ही गुणांवर नियंत्रण मिळवले तर जीव आणि शिव यांची मिलन होते. हे मुक्ती स्थळ आहे ती महिला भक्त म्हणाली, आम्हा तुम्ही तिन्ही गुणांवर विजय मिळवला आहेत. तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला आहे आणि तुमचा भगवानांची योग झाला आहे.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम