ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
कुमारी पासून कुबेरापर्यंत
७ फेब्रुवारी २००१ पहाटे ४ वा.
घड्याळाचा गजर झाला.' ॐ साई श्री साई जय जय साई.' ध्यान व अभिषेक झाल्यानंतर मी, स्वामींनी कुंकवाने आशीर्वादित केलेले त्यांचे पदक घातले. नवीन साडी व नवीन जोडवी घातली. मी माझ्या तिन्ही मुलांना व सुनांना आज घडणाऱ्या घटनेचा संदर्भात सांगितले. संन्यास घेण्यासाठी त्यांनी मला मुक्त करावे असेही मी त्यांना म्हणाले. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. ते म्हणाले," नाही आम्ही तुलाही नाही करू देणार. " ते रडत होते, माझी अर्ज करत होते माझी सून, मनो म्हणाली," तुम्हाला जे हवे ते तुम्ही करा, परंतु मंगळसूत्र काढू नका." मी म्हणाले," ही परमेश्वराची आज्ञा आहे मला ती शिरंसावंद्य मानलीच पाहिजे. केवळ तुम्ही माझी मुले नसून समस्त विश्वातील लोकं माझी मुलं आहेत. इथून पुढे मला त्यांच्यासाठी जगले पाहिजे. तुम्हाला माहित आहे दररोज मला त्यासाठी असंख्य फोन व पत्रे येतात. अनेक लोकं माझा शोध घेत येथे येतात. मला त्या सर्वांसाठी प्रार्थना करायला नको का? मी त्यांना मदत केली पाहिजे. भगवान तुम्हाला मंगल आशीर्वाद देतील जग तुमच्या त्यागाची प्रशंसा करेल. संन्यास घेण्यासाठी मला मनापासून व आनंदाने निरोप द्या.
एस. व्ही.नी जमलेल्या सर्व लोकांना आजच्या घटने विषयी थोडक्यात सांगितले ते म्हणाले," जगाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णक्षराने लिहिला जाईल. आम्हा संन्यास घेत आहेत. आजचा दिवस विशेष आहे. आज पौर्णिमेचा पवित्र दिन आहे. अम्मांबरोबर बरोबर श्री मनोहरनही संन्यास घेत आहेत. याला आत्मसंन्यास म्हणतात. आत्मसंन्यास म्हणजे जंगलात जाणे व भगवी वस्त्र धारण करणे नव्हे. स्वामींनी त्या दोघांना पती पत्नीच्या वैवाहिक नात्याचा त्याग करण्यास सांगितला आहे. अम्मा त्यांचे मंगळसूत्र काढतील व श्री मनोहर अन ते दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करतील. जगामध्ये असे कधीही घडले नाही.
जय साईराम