रविवार, १ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २७ 
       
           यज्ञ तप आणि ज्ञान यामध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत् असे म्हटले जाते आणि परब्रम्हाच्या संतुष्टी प्रीत्यर्थ केलेल्या कर्मानाही सत् असे म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
              
           कान्हा! या हीनाला यज्ञ, तप आणि दान यामध्ये दृढश्चित्त कर. तुझ्यासाठी सत्कर्म करायला लाव. वैकुंठवासुदेवा! वराहवतारा! वामना! याला तुझ्या चरणी स्वीकारून त्याची कल्याण कर. कान्हा! तूच आधार प्रभू! शरणो शरणम्. नीचाला त्वरेने तुझ्या चरणी घे. प्रभू! शरणम्

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २९ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २६ 
       
           'सत्' परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्थ! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! या निरुपायी जीवाला तुझा उत्तम गीतोपदेश असा 'सत्' हा शब्द तसेच त्यातील सत्य आणि चांगलं ह्यांच्या अर्थाची जाणीव करून दे.  माझ्याकडून प्रशंसनीय कृत्ये करून घेऊन मला सत् नाम प्राप्त करून दे. वासुदेवा! ये नं! माझ्या मनात येऊन राहा. माझी काळोखे मन उजळू दे. कान्हा! ईसा! ये, येऊन मला तुझ्या चरणी स्वीकारून माझा उद्धार कर. तूच स्वामी! प्रभू!

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २३ 
       
           ॐ, तत्, सत् अशी तीन प्रकारची  सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! माझा त्राता! प्रभू! ह्या नीच जीवाला ' ॐ, तत्, सत्'  तुझे वर्णन करणाऱ्या या तीन सत्य वचनांचे पूर्ण ज्ञान दे. तू उपदेशलेले ब्राह्मण्य, वेद आणि यज्ञ या हलक्या जीवाला शिकवून त्याप्रमाणे वागावयास लाव. तुझ्या मार्गाचे अनुसरण करण्यास नि:शक्त अशा या दुबळ्याला तुझ्या मार्गावर चालावयास लाव. तुझ्या मार्गावर तू मला घेऊन चल. परमेशा! रामानुजा! गरिबाला दुसरा रस्ता नाही. कान्हा! तुझ्या चरणी घेऊन आशीर्वाद कर. तूच आधार. शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १८ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २२ 
       
           अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलना पूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! या दिन जीवाला तामसिक दान करणारा करू नकोस. अनुचित स्थळी, अनुचित काळी, अनुचित व्यक्तीला, असभ्य दान करायला देऊ नकोस. सात्विक दान करायला लाव. सर्वेशा! सर्वलोकशरण्या परमधामा, परमदयाळा, शेषशयना, पद्मनाभा, गोविंदा, गोपाला, सप्तवृषभ नियंत्रका, कृष्णा! तूच आधार. शरणो शरणम्.   

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १६ , श्लोक २१
       
            हे अर्जुना! काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. मनुष्याने  त्यांचा त्याग केला पाहिजे. कारण ही तीन द्वारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, कमलाकांता, काम, क्रोध आणि लोभ या तीन  द्वारांमधून माझी पाठवणी करू नकोस. केवळ तुझी सेवा करण्यासाठीच माझा प्रयत्न ठेव. मी तुला शरण आलो आहे. या अधमाला नरकात ढकलू नकोस. हे श्रीरामा ध्यास घेणाऱ्या जीवांच्या संरक्षका, या श्वानाचे रक्षण कर. मला सद् विचार दे. शरणो शरणम्.  

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ११ जानेवारी, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १६ , श्लोक १२
       
            शेकडो आशारुपी पाशांनी बद्ध असलेले हे जीव कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अवैद्य मार्गांनी धनसंचय करतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           परमेशा ! या गुलामाच्या अमर्याद इच्छा नाहीशा कर. शेकडो इच्छांच्या दोरखंडांनी जखडून नकोस. काम क्रोधाच्या आहारी जाऊ देऊ नकोस. कामभोगासाठी गैरमार्गाने संपत्ती गोळा करायची बुद्धी देऊ नकोस. मला अपरिग्रही बनव.  भगवान, हा दास फक्त तुला शरण आला आहे अच्युता! अनंता! आधार देऊन दुवा कर.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक २०
       
            हे निष्पाप अर्जुना! हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला सांगितला आहे. जो याचे तत्त्वतः ज्ञान करून घेतो तो ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, या पाप्याला पापमुक्त कर.  बुद्धिमान कर.  जे करणे योग्य आहे ते करण्याची बुद्धी दे. जे करू नये ते करत असल्यास तू येऊन त्याचे कृत्य थांबव. दया कर.  गुप्त शास्त्रांचे ज्ञान शिकव. तुझी शिकवण आत्मसात करण्याची ताकद दे. आदि नारायणा! अनाथरक्षका!  तूच याच रक्षण करायला हवंस. मी तुला शरण आलो आहे. कान्हा, कृपा कर.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम