ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
वसंता : स्वामी मी सावित्री वर लिहू का?
स्वामी : होय, तू लिही. अरविंदांनी तुझ्या जीवनाबद्दलच लिहिले आहे.
वसंता : आता मला समजलं स्वामी, मी लिहीन.
ध्यान समाप्त.
स्वामींनी श्री अरविंद यांच्या 'सावित्री' या पुस्तकातील अध्यायांमधील काही भाग सुचित केले. मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले की ते सर्व माझ्या जीवनाशी निगडित होते. सावित्रीच्या व माझ्या जीवनशैलीमध्ये आमच्या जन्मापासूनच साधर्म्य आहे. तिच्या जन्माबाबत १०१ पानावर स्वामींनी काय अधोरेखित केले ते आपण पाहू,
....वसंत ऋतु बहरला. अशाच एका बहराच्या अत्युच्च क्षणी, सृष्टीच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करत असता, सत् चित् आनंदासाठी तिने दिलेल्या हाकेला ओ देत एक दैवी आत्मा पृथ्वीवर अवतरला. सावित्री जन्मली. अपूर्ण काय हाती घेण्यास आदिमाता भूतलावर परत आली.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम