ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
केवळ दुःख मनुष्याच्या हृदयातील विरोध नाहीसा करून त्यास रस्ता दाखवितो. नाहीतर तो या जगात संतोष व समाधानी राहील. माणूस मी व माझे यांमधून मुक्त झाला तरच त्याच्या जीवित आचे दुःख कमी होते.
भगवंताला जर जग वाचवायचे असेल तर त्याने या जगाच्या दुःखात सहभागी होणे भाग आहे. हा कायदा अवतरीत भगवंतासाठी आहे. पूर्वी प्रत्येक अवतार जगाचे कल्याण कमी करण्यासाठी आला. धर्माचा ऱ्हास झाल्यानंतर अवतार सर्व सुरळीत करण्यासाठी अवतरीत होतो. राम अवतरला त्याने राक्षसांचा संहार केला. राक्षस ऋषींच्या तपाचे विनाशक होते. त्यामुळे रामाला त्यांचा विध्वंस करणे भाग होते. परंतु हे करण्यासाठी त्याला सीतेची ताटातूट सहन करावी लागली. त्याचा विरह राक्षसांचा संहाराचे कारण बनला. या ताटात तुटीमुळे रामाने केवळ रावणाचा नव्हे तर त्याचा अखिल वंशवर अक्षय सेना मुळापासून नष्ट केली. या कारणासाठी रामाचे वैयक्तिक जीवन दुःखमय होते.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम