गुरुवार, २ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
प्रस्तावना 

             एकेक चक्र पार करत गेल्यानेच मनुष्य परमेश्वर प्राप्ती करू शकतो. एक व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत भगवान प्राप्ती कशी करते. सत्यवान् - सावित्री कथेमधून शब्दबद्ध केले आहे. आणि अमृतत्वास कशी प्राप्त होते हे श्री. अरविंद सत्यवान्- सावित्री या कहाणी मधून दर्शवितात. अरविंदांनी या पुस्तकात जे काही लिहिले आहे त्या सर्वांचे प्रात्यक्षिक मी व स्वामी या स्थूल जगात करीत आहोत. तथापि एखादी गोष्ट वाचणे आणि स्वामी व माझ्या जीवनामध्ये घडणारे सर्वांनी. चक्षुर्वेसत्यं पाहणे यामध्ये खूप फरक आहे. हे पुस्तक वाचून सर्वांनी अंतर्गत अध्यात्मिक प्रवासासाठी स्वतःस तयार करायला हवे.
             सावित्री तिच्या पतीचे विधीलिखित बदलते. स्वामी व मी एका युगाचे विधीलिखित बदलतो! आम्ही कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करतो.
             पुष्कळ वर्षांपूर्वी स्वामींनी मला सांगितले होते की, नारदाचा अंश अवतरून आपली कथा लिहील. त्यावेळी मला या पुस्तकाची माहिती नव्हती. नारदाचा कोणता अंश आमची जीवनगाथा लिहावयास येईल हे पाच वर्षानंतर आत्ता स्वामींनी दाखविले. हे आहेत श्री. अरविंद. अवतार म्हणून अवतरलेल्या स्वामींच्या जीवन कार्याचे त्यांनी या पुस्तकात वर्णन केले आहे.

* एम्.पी. पंडितांच्या 'संक्षिप्त सावित्री' पुस्तकामधून.
टीप : यापुढे ढळक अक्षरातील उतारे हे योगी अरविंदांच्या ' सावित्री ' या मूळ पुस्तकातील आहेत.
  

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




रविवार, २९ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
प्रस्तावना 

            श्री अरविंदच्या 'सावित्री' या  पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित करून स्वामींनी दिव्य संदेश म्हणून मला दिले. मी स्वामींना विचारता स्वामी म्हणाले," मी या पुस्तकात अधोरेखित केलेल्या भागांवर आधारित तू तुझ्या जीवनाची तुलना सावित्रीच्या जीवनाशी कर."
           पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर मी अचंबित झाले; कारण माझी व सावित्रीची जीवनशैली समांतर आहे. मी विचार केला," श्री अरविंदना माझ्याबाबत कसे बरे ठाऊक झाले?" या पुस्तकात त्यांनी जीवात्म्याचा अंतर्गत प्रवास व सत्यप्राप्तीच्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांचा करावा लागणारा सामना याविषयी लिहिले आहे. कुंडलिनीचे एकेक चक्रपार करून जात असता जे बदल घडतात ते अरविंद आणि सविस्तर लिहिले आहेत.

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २६ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
आभार 

            श्री अरविंद यांचे 'सावित्री' हे काव्य, त्यांची दूरदर्शी व स्फूर्तीदायक सत्य दृष्टी यांची, श्री वसंतसाई व वसंतसाई बुक्स अँड पब्लिकेशन ट्रस्ट कृतज्ञता व्यक्त करतात. आज हे पुस्तक त्यांच्या सावित्री मुळे अस्तित्वात आले.

          'संक्षिप्त सावित्री' हे पुस्तक लिहिणाऱ्या एम.पी. पंडितांना शतशः धन्यवाद. वसंतसाई अम्मांच्या लेखनास मार्गदर्शन करून स्फूर्ती देणाऱ्यासाठी भगवान सत्यसाईबाबांनी या पुस्तकातील काही भाग अधोरेखित केले.

           प्रिय वाचक ....
          या पुस्तकातील श्री वसंतसाई, श्री सत्यसाईबाबांचा उल्लेख स्वामी असा करतात.

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, २३ मार्च, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            त्यानंतर आम्ही स्वामींचा फोटो व पादुका घेऊन नागरसंकिर्तन करत गावामध्ये मिरवणूक काढली. मी माझी कृष्णाची मूर्ती बरोबर घेतली. दारातच (लहान मुलगा) मणिवन्ननने माझे पाय धरले वरडत रडत 'मी तुला जाऊ देणार नाही' असे म्हणाला. मी म्हणाले," स्वामींनी मला सांगितले आहे मला गेलेच पाहिजे. ही सर्व माया आहे." माझ्या कृष्णाच्या मूर्तीला, श्री मनोहरनना  व मला हार घालण्यात आले. मी माझ्या कृष्णासोबत जीवन प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी पाऊल उचलले. मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या सुवासिनी ध्यान सभागृहात पोहोचल्या. आम्ही श्री गणेशाला प्रदक्षिणा घालून ध्यान सभागृहाच्या पायऱ्या चढलो. एस. व्ही. नी दूधभात कालवला. कोदाईंनी त्याचे तीन उंडे बनवले आणि मला भरवले. ते खाऊन मी श्री मनोहर यांच्या सह सभागृहात प्रवेश केला.
             रंगीत दिव्यांच्या माळा व फुलांनी सभागृह सुशोभित केले होते. सभागृह इंद्राच्या दरबारासारखे भासत होते. लोक दोन्ही बाजूला बसली होती. व्यासपीठावर मध्यभागी स्वामींचा भव्य फोटो लावला होता. या फोटो त्यांचा उजवा हात चिन्मुद्रेत होता. त्यांच्या अनामिकेचा अग्रभाग अंगठ्यावर दाबला होता व बाकीची तीन बोटी मिटलेली होती. एका भक्ताने याचे सुंदर स्पष्टीकरण दिले. जर एखाद्याने तिन्ही गुणांवर नियंत्रण मिळवले तर जीव आणि शिव यांची मिलन होते. हे मुक्ती स्थळ आहे ती महिला भक्त म्हणाली, आम्हा तुम्ही तिन्ही गुणांवर विजय मिळवला आहेत. तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला आहे आणि तुमचा भगवानांची योग झाला आहे.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, २२ मार्च, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अनुक्रम
प्रस्तावना
१.मानवतेचा इतिहास
२.कर्मकायदा - अवतार कायदा 
३.विधिलिखित बदलते
४.काळ अन् मृत्यूवर विजय
५.सुईच्या अग्रा इतका अहंकार
६.बृहत योजनेनुसार भगवत रूपाचा साचा
७.आत्म्याची तीन मुखे 
८.स्तूपाचा जन्मदिन
९.जुनी कहानी अर्थ नवा
१०.एप्रिल नॉट होतोॲप्रिकॉट (जरदाळू)
११.कायद्याचे सिंहासन 
१२.अध्यात्मिक सूत्र मर्यादित 
१३.काहीही नाही हेच सर्व काही
१४.चुडामणी 
१५.यम कोण आहे ?
१६.दैवी न्यायाधीश
१७.माझ्याद्वारे जगाचा यमावर विजय
१८.देव माझ्या प्रेमाचा भुकेला 
१९.सुवर्णयोग - सोनेरी परिवर्तन
  

संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
             या सर्वोत्तम अवताराची रहस्य योगी अरविंदना कसे बरे ज्ञान झाले? ह्या सर्वश्रेष्ठ अवताराची कुशल योजना त्यांना कशी काय अवगत झाली? 'सत्यवान- सावित्री' या काव्यामधील अंतर्भूत आध्यात्मिक महत्त्व व्यक्त करून, खरे तर त्यांनी सत्य साई अन् वसंता यांची (जीवनशैली) प्रकट केली आहे. सावित्री तिच्या पतीचे विधीलिखित बदलते. स्वामी व मी युगाचे विधीलिखित बदलतो. आम्ही कलियुगाची सत्ययुगात परिवर्तन करतो. ही 'सत्यवान सावित्रीची' कहाणी आहे की ' सत्यसाई - वसंता' साईची गाथा?
VS

समर्पण
प्रिय भगवान,

          हे पुस्तक मी आपल्या चरणी अर्पण करते. हे तुम्ही लिहिले. सर्व काही तुम्हीच केले. अव्याहत प्रतीक्षेत माझे हृदय छिन्नभिन्न होत आहे. कृपा करून या आणि सर्वांवर कृपेचा वर्षाव करा.
आपली पादधूलिका
VS  

संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
             मी कधीही माझ्या वडिलांच्या डायऱ्या वाचल्या नाहीत. स्वामींनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिल्यानंतर आणि मला त्यावर लिहिण्यास सांगितल्यानंतरच मी त्यांच्या डायऱ्या वाचल्या. अजूनही वडक्कमपट्टीमध्ये तिजोरी त्यांच्या सर्व डायऱ्या जतन करून ठेवलेल्या आहेत. मणिवन्नननी  त्या डायऱ्या आश्रमात आल्यानंतरच आम्हाला त्यांच्या मनातील भावभावनांच्या गहनतेची जाणीव झाली. हे काही एखाद्या सर्वसामान्य मनुष्याचे भाव विश्व नाही. याद्वारे स्वामी मला आणि जगाला, ते कोण आहेत हे ज्ञात करून देत आहेत.
 
*     *     *
 
           माझे वडील कट्टर वैष्णवभक्त, गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक व भगवद्गीतेचे महाअनुयायी होते. त्यांच्या परमेश्वरावरील अतिव प्रेमातून अत्यंत उत्कट भक्ती निर्माण झाली. अशी भक्ती क्वचितच पाहायला मिळते. त्यांनी न चुकता गीतेतील मार्गाचे काटेकोरपणे पालन केले. त्यांच्या डायऱ्यांमधून त्यांची परमेश्वर प्राप्त तिकडे जाणारी जीवन यात्रा प्रतीत होते. भगवान श्री सत्य साईबाबांनी जर हे निदर्शनास आणून दिले नसते तर ते  सर्व अप्रकाशित राहिले असते. हे पुस्तक त्यांच्या मार्गदर्शनाची परिणती आहे. सर्वधर्माच्या लोकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी होवो.
वसंत साई 

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम