गुरुवार, १४ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           आता पान ११७,
           .....सावित्री त्याला वाकून नमस्कार करते वहात जोडून त्याच्या पाया पडते.
           त्याच्या गळ्यात माळ घातल्यानंतर ती हे करते. पुन्हा स्वामींनी अधोरेखित केले,
           ....सत्यवान आणि तिला आपल्या कवेत घेतले. नदी जशी महासागरात विलीन व्हावी त्याप्रमाणे तिचे अस्तित्व त्याच्यात विलीन झाले हे सावित्रीला जाणवते.
             या ओळींच्या आधी पुस्तकात लिहिले आहे,' सावित्री गाडीतून खाली उतरते, फुले गोळा करते त्वरित एक माळ गुंफते व सत्यवानाच्या गळ्यात घालते. नंतर ती त्याच्या पाया पडते.' हे माझ्या जीवनात घडेल. स्वामी येतील, मला बोलावतील. आम्ही त्यांच्याकडे गाडीने जाऊ. कारमधून उतरू. स्वामी आमची स्वागत करतील. विलात करीत, अश्रू ढाळत मी त्यांच्या पवित्र चरणांवर नतमस्तक  होईन. स्वामी मला उचलतील आणि आलिंगन देतील. त्यावेळी मला जाणवेल, ' नदी जशी सागराला जाऊन मिळते त्याप्रमाणे माझ अस्तित्व "त्या' च्या मध्ये वाहून गेले. ७३ वर्षांनी ही तळमळ आहे! किती दुःख? किती यातना? विभक्त करताना येणारे जुळे. आम्ही विभक्त झालो, हे यातून दिसून येते. वियोगानंतर आमच्या मिलनाचा हा पहिला दिवस असेल. आम्ही जागतिक करणे वाहत आहोत आणि विश्वमुक्तीसाठी दीर्घकाळ वियोग सहन करीत आहोत. केवळ त्या दिवशी आम्ही आमची पूर्णम् अवस्था प्राप्त करू. आदी पुरुषापासून दूर गेलेल्या शक्तीचे ' त्या' च्याशी मिलन होईल.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ७ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             आमच्या विवाहाच्या वेळी स्वामींना सर्व काही माहीत होते. मला भगवंताशी विवाह करायचा होता. तथापि भूलोकावर हे शक्य नाही असे मला माझ्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी मला तीन मुलगे सुचविले व एकाची पसंती करायला सांगितले. माझ्या नकळत मी स्वामींना पसंत केले. त्यांनी माझ्याशी वेगळ्या रूपात विवाह केला. जरी रूपे बदलली तरी भगवान व शक्ती हे आमची सत्य आहे; आत्मा अपरिवर्तनीय आहे. दोघांमधील अंतर नाहीसे झाले. दोन हृदयांचा संयोग झाला; परंतु माझे मन अशांत होते. अजूनही मला वाटत होते," आम्हा दोघांमध्ये अंतर आहे!"

            २००१ मध्ये स्वामींनी मला ' पुट्टू मांगल्य ' करून ते व्हाईटफील्डच्या वृंदावनला घेऊन यायला सांगितले. स्वामींनी मांगल्य हस्त स्पर्शाने आशीर्वादित केल्यानंतर मी ते गळ्यात घातले. केवळ त्या क्षणी आमच्या मधील अंतर गळून पडले. अंतरीची खून पाठवून माझा जीव त्यांच्या जीवात गाड प्रेमाने विसावला. यानंतरच आमचा खरा प्रवास सुरू झाला.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ३ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             माझ्या जीवनप्रवासाचा मार्गदर्शक स्वामी, माझ्या अंतरात आहेत. ते केवळ अंतर्यामी नाही तर माझ्या बाह्य जीवनाची सोबती ही आहेत. अगदी बालवयापासून मला भगवंताशी विवाह करायचा होता. या ज्वलंत इच्छेमुळे भगवान माझे पती झाले. भगवंताने माझ्याशी विवाह केला; परंतु या सत्यापासून मी अनभिज्ञ होते. काही काळ गेल्यानंतरच स्वामींनी सांगितले की, त्यांनीच माझ्याशी विवाह केला. 
            आता आपण ११३ पानावरील उतारा पाहू.
             .....सत्यवान सावित्री दोघांना एकमेकांची ओळख पटते. आठवणींच्या पटलावर त्यांचा पूर्ण भूतकाळ दृश्यमान होतो. रूपे बदललेली पण आत्मा नाही. दोघांमधील अंतर क्षणात गळून पडते व अंतरीची खून पटवून जीव जीवनात गार्ड प्रेमाने विसावतो.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २३ एप्रिल, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            लहानपणापासून मला कृष्णाची विवाह करायचा होता. आता ६३ व्या वर्षी माझे नातेवाईक माझी मुले आणि पती या सर्वांनी मला साईकृष्णाला देऊन टाकले. ही घटना मी विसरू शकत नाही खरोखर एक अजब चमत्कार! केवळ परमेश्वरालाच त्याच्या लीला ठाऊक! स्वामींनी कसे मला सर्व बंधना मधून मुक्त केले व केवळ त्यांचाच एक बंधन आहे हे दर्शविले. हा काही संन्यास समारंभ नसून विवाह समारंभ आहे! तरुण असताना मी स्वतः अंडाळ असल्याची कल्पना करून मी तिच्या ' वारनम अयिराम ' . हा श्लोक पुन्हा पुन्हा गाऊन आनंद घेत असे. ह्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाशी झालेल्या तिच्या स्वप्न विवाहाचे वर्णन करते. आज हे सत्यात उतरले आहे. अखिल विश्व या विवाह समारंभाचे साक्षी आहे. " यद् भावम् तद् भवति " तुम्ही ज्याचा विचार करता ते बनता. मी कल्पिलेला कृष्णाची विवाहाचा प्रसंग आता वास्तवात उतरला आहे वा वास्तव बनला आहे. मी ४० वर्षे गृहस्थाश्रमी संन्यासी होऊन जीवन जगले. आता संन्यासी बनून मी कृष्णाबरोबर गृहस्थ जीवन जगत आहे! ज्या चमत्काराने माझी मनोकामना पूर्ण केली त्या चमत्काराचे कोणालाही आकलन होणार नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             सत्यवान- सावित्रीची गोष्ट सर्वांना माहीत आहे. तरीही महान संत अरविंदांचे लिखाण वेगळे आहे. ते दुसरी कथा सांगत होते. ते त्रिकाळ ज्ञानी आहेत. त्यांना भूतकाळ, वर्तमान व भविष्याचे ज्ञान आहे. ते त्या सत्यवानसंबंधी लिहीत नव्हते; तर भविष्यात होणारा अवतार भगवान श्री सत्यसाईबाबांबद्दल लिहीत होते. त्यांनी अवतार व त्याची शक्ती, यांच्या अवतार कार्याबाबत लिहिले. स्वामींचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ ला झाला. दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबर, १९२६ ला अरविंद यांनी घोषित केले, "आज कृष्ण स्थूल रूपात अवतरला." या घोषणेनंतर ते एकांतात गेले व क्वचितच दृष्टीस पडले.
             अशारीतीने स्वामींनी सावित्री पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित केले व मला माझ्या जीवनाशी त्या भागांची तुलना करावयास सांगितले. आता आपण पाणी १०६ पाहू.
             .....तुझ्या अंतरंगातील धगधगणाऱ्या मार्गदर्शकाशिवाय इतर कोणाची तुला गरज नाही. तुझा होऊ घातलेला जीवनसाथी व सोबती तुझी वाट पाहत आहे.




संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १९ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             स्वामींनी १९९८ मध्ये माझ्या उदरात विश्व ठेवले. मी मातृभावामुळे विश्वपरिवर्तन घडविले. कलियुगात या भूतलावर खरा आनंद कुणालाही माहित नाही. फसव्या आनंदाच्या शोधा ते इकडून तिकडे भरकटत आहेत. सर्व जन्ममृत्यूच्या चक्रात अडकले आहेत. खरे तर निखळ आनंद केवळ परमेश्वरापासून प्राप्त होऊ शकतो.

             'मी व माझे' यावरील ममत्वाचा त्याग केला तरच निखळ आनंद निर्माण होतो. जगास याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मी इथे आले. जागतिक कर्मे स्वीकारून मी यातना भोगत आहे. हे माझ्या मातृभावामुळे साध्य होते. स्वामींनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             हे माझ्याशी तंतोतंत जुळते. वसंता म्हणजे वसंत ऋतुचे आगमन-  माझा जन्म. पूर्वी स्वामींनी मला 'वैश्विक स्फोट' ही कविता दिली. त्यात माझा जन्म व जीवनाचे वर्णन आहे. हा अध्याय त्या पूर्ण कवितेने संपतो.

अवसेच्या अंधाऱ्या रात्री वडकंपट्टी ग्रामी
जाहला पुनवेचा जन्म

           त्यांनी माझ्या माता-पित्यांबद्दलही लिहिले. पुढे स्वामींनी घोषित केले की, ते व मी आम्ही दोघं,'असूनही एक झालो दोन' अशा रीतीने त्यांनी आमची अवस्था जगासमोर उघड केली, होय. मी विश्वमाता आहे. अखिल विश्व मी माझ्या उदरात वहावे, माझ्यापासून सर्व जन्माला यावेत यासाठी स्वामींकडे अश्रू ढाळले. ' उपनिषदांच्या पलीकडे' या पुस्तकात मी हे लिहिले आहे.
 

संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम