गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

 

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           ऑपरेशन आणि परमेश्वरावर? पूर्वीच्या युगांमध्ये असं काही घडलेलं आपण ऐकला आहे का? भगवान, जो अवघ्या जगाचा प्रतिपाळ करतो, त्याच्यावर शस्त्रक्रिया केली! हे सर्व कशासाठी? का? हे कसं काय? जगाला सुरक्षित ठेवणाऱ्या भगवंताला या जगाचे दुःख सोसलेच पाहिजे. जगाच्या दुःखात सहभागी व्हायला हवे. हा अवतारकायदा आहे. स्वामी कर्मकायदा बदलू शकत नाहीत.
            अवतरीत अवताराने दुःख भोगलेच पाहिजे. भवसागराची दुःखे पाहून संत महंत भगवंताची प्रार्थना करतात. देव व ऋषीगण त्यांची प्रार्थना ऐकून भगवंताला विनंती करतात. केवळ महाविष्णू संरक्षक देव आहेत, म्हणून ते त्याची प्रार्थना करतात. या कारणासाठीच महाविष्णू अवतार घेतो. तो जेव्हा जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा त्याला अत्यंत क्लेश सोसणे भाग असते. आताचे कार्य खूप व्यापक आहे म्हणून हा महोत्तम अवतार प्रचंड प्रमाणावर कार्य करत आहे. प्रथम शिर्डी बाबा म्हणून येऊन त्याने पायाभरणी केली; नंतर सत्यसाई म्हणून अवतरला. शिर्डी बाबा शिवा अवतार होता; तर सत्यसाई शिवशक्ती अवतार म्हणून त्याने मलाही रूप देऊन आणले. त्यांच्यापासून झालेल्या ताटातुटीने मी अश्रू ढाळत आहे, विलाप करतेय. मी जागतिक कर्माचा भार वाहते व आम्ही दोघं सोसतोय. 



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

बुधवार, २९ जुलै, २०२६

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       

  गुरुपौर्णिमेचा संदेश 

 ॐ श्री साई राम 
   भगवान बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

आज गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र दिवस आहे.
आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या गुरूंच्या प्रती पूर्ण श्रद्धेने कृतज्ञता समर्पित करण्याचा आजचा दिवस आहे.
जसा पौर्णिमेचा चंद्रमा आकाशातील अंध:काराला दूर करतो  तसेच गुरु आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंध:काराला दूर करतो. 
 तो कोणता अंधकार आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या बंधनात टाकतो?
 
अविद्या, अज्ञान, भ्रम, अहंकार देहाभिमान  यामुळे आपण नित्य आणि अनित्य यामधील भेद ओळखू शकत नाही.काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे तसेच परमेश्वराला कशी भक्ती आणि कसा भक्त प्रिय आहे  हेच आपल्याला समजत नाही. 
हे खरे अज्ञान आहे. गुरूंचा अनुग्रह झाला की आपल्या जीवनातील हे अज्ञान दूर होते.

स्वामींनी मानवतेला सर्वप्रथम कोणता संदेश दिला होता?
 " मानस भज रे गुरु चरणम 
 दुस्तर भवसागर तरणम " 
 अर्थात
 मनाला गुरूंच्या चरणावर स्थिर करा
जेव्हा आपले मन गुरूंच्या चरणांवर स्थिर होते आणि हेच आपल्याला  भवसागरातून तरुन नेते म्हणून जीवन मार्गावर वाटचाल करताना त्यांच्या आज्ञेचे पालन करा. त्यांची शिकवण आचरणात आणा.
आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये गुरूंचा महिमा जाणून घेण्याचाही दिवस आहे.
स्वामींनी म्हटले आहे सत्य बोला धर्माचे(सदाचरण)पालन करा. मातापित्यांचा सन्मान करा.सेवा करा. हीच माझी गुरुदक्षिणा आहे.
 
जय साईराम

रविवार, २६ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           राजमुकूट धारण करण्याऐवजी त्या वेळी राम वनात गेला. या वेळेपासून त्याचा वनवासाला सुरुवात झाली. तिथे पासून ताटातूट झाल्याने त्याच्या यातना वाढल्या. हे अवताराचे क्लेश आहेत. याप्रमाणेच दुष्टांचा नाश करून धर्म स्थापना करण्यासाठी कृष्णावतार झाला. त्याचेही संपूर्ण जीवन दुःखमय होते. त्याच्या जन्मापासूनच अनेक असुरांनी त्याचा वध करायचा प्रयत्न केला. त्याचे कौटुंबिक जीवनही दुखत होते.

            स्वामी या युगात जगाचे रक्षण करण्यासाठी आले. ते पूर्वीच्या अवतारांसारखे नाहीत; ते विनाश करण्यासाठी न अवतरता मानव जातीमध्ये परिवर्तन करण्यासाठी आले. म्हणून त्यांनी जगाची कारणे स्वतःवर घेऊन स्वतः दुःख भोगले. त्यांनी स्वतःच दोहोत विभागले, म्हणून आम्ही दोघांनी जागतिक कर्मे स्वतःवर घेऊन क्लेश सोसले .आम्ही सर्वांची पापकर्मे आमच्या शरीरांवर घेतली व त्यांना अमृतावस्था प्रदान करण्यासाठी, वैश्विक मुक्तीसाठी यातना सहन केल्या. स्वामींनी सर्वसामान्य मानवासारखा देह त्याग केला. यावर कृपया थोडावेळ चिंतन करा. २००३ पासून स्वामींच्या देहाला किती यातना झाल्या? एवढेच नाही तर अगदी बालवयात मांत्रिकाने त्यांच्या मस्तकात खिळे ठोकून व डोळ्यांमध्ये औषधी घालून त्यांना तीव्र ताप दिला. हे कशासाठी? भगवंताने एवढे दुःख का  सोसावे? हे केवळ कलियुगातील लोकांसाठी भगवान करत आहेत. 'त्यांना' नीट चालता, बोलता येत नव्हते! किती हे दुःख! हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या अव्यय शरीरात सुया टोचल्या होत्या. बालपणी त्यांच्या पुस्तकात एक खेळा ठोकला आणि शेवटी त्यांचे सर्व शरीर यातनामय झाले !



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १९ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            अशा रीतीने एखादाच चिंतन करतो. तो आध्यात्मिक पुस्तके वाचतो. साधू, संत व साक्षात्कारी आत्म्यांच्या शोधात जातो हजारात अगदी एखादाच असे चिंतन करतो अशा हजारोंमध्ये काही शेकडा साधना करतात व त्यांच्यामधील एखादाच भगवत् प्राप्ती करतो.
           केवळ दुःख मनुष्याच्या हृदयातील विरोध नाहीसा करून त्यास रस्ता दाखवितो. नाहीतर तो या जगात संतोष व समाधानी राहील. माणूस मी व माझे यांमधून मुक्त झाला तरच त्याच्या जीवित आचे दुःख कमी होते.
           भगवंताला जर जग वाचवायचे असेल तर त्याने या जगाच्या दुःखात सहभागी होणे भाग आहे. हा कायदा अवतरीत भगवंतासाठी आहे. पूर्वी प्रत्येक अवतार जगाचे कल्याण कमी करण्यासाठी आला. धर्माचा ऱ्हास झाल्यानंतर अवतार सर्व सुरळीत करण्यासाठी अवतरीत होतो. राम अवतरला त्याने राक्षसांचा संहार केला. राक्षस ऋषींच्या तपाचे विनाशक होते. त्यामुळे रामाला त्यांचा विध्वंस करणे भाग होते. परंतु हे करण्यासाठी त्याला सीतेची ताटातूट सहन करावी लागली. त्याचा विरह राक्षसांचा संहाराचे कारण बनला. या ताटात तुटीमुळे रामाने केवळ रावणाचा नव्हे तर त्याचा अखिल वंशवर अक्षय सेना मुळापासून नष्ट केली. या कारणासाठी रामाचे वैयक्तिक जीवन दुःखमय होते.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, १६ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            पृथ्वीवरील सुखांमुळे तुला परमेश्वरी आनंदाचा लाभ होत नाही. म्हणून दुःख आणि वेदनांची गरज निर्माण होते. दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय या अज्ञानी जगात आनंद मिळू शकत नाही. मानवाच्या हृदयात असलेल्या विरोधाचा भंग करण्यासाठी देव दुःखाचा हातोडा वापरतो. या दबावाशिवाय मानवाचा आत्मा सुखातच संतुष्ट राहील. माणूस जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत दुःख आणि वारी आहे. ज्याला जगाचा उद्धार करावयाचा आहे, त्याला दुःख भोगलेच पाहिजे. देव जेव्हा मनुष्य रूपात पृथ्वीवर अवतार घेतो तेव्हा त्यालाही हाच नियम लागू होतो.

              जग म्हणजे हाल अपेष्टा. जगात हे स्वाभाविक आहे. मानवाला हे उमजलं की तो दुःख व यातनांमधून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधू लागतो. माणूस सहजपणे दुःख, यातनांचा स्वीकार करतो व दुसऱ्यांना उपदेश करतो," जग हे असंच असतं! संसारी जीवन असच असणार!" अशा तऱ्हेने बोलून, त्यांनी स्वतःच्या सहजपणे सर्व स्वीकारले तसं दुसऱ्यानेही स्वीकारावी म्हणून त्याला समजावून सांगतो! हजारांत एखादा चिंतन करतो. त्या हजारात अगदी एकच त्याला उमजलेले आचरण आणतो! तो म्हणतो,' मला हे यातनामय संसारी जीवन नको! माझे दुःख दूर करण्याचा मार्ग कोणता? यातून मुक्त कसे व्हावे?"


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ५ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            प्रत्येक व्यक्ती मला त्यांच्या मानवी दृष्टीकोनातून पाहते, त्यामुळे चुका घडतात. मी सर्वांचे रुदय परिवर्तन करण्यात आले आहे, तरीही त्यांचा मानवी स्वभाव त्यांना माझ्यापासून दूर करतो. हे केवळ इथे आश्रमातच नाही तर जगभर असेच आहे. मी भावाद्वारे सर्व बदलते. माझे भाव स्तुती मधून बाह्यगामी होतात व परिवर्तन करतात. काहीजण शिल्लक समाधानासाठी इथे येतात. जरी माझे प्रेम त्यांना खेचून आणते तरी त्यांचा स्वभाव त्यांना माझ्या प्रेम बंधाशी प्रतिकार करायला लावतो. अशा रीतीने त्यांचा एक पाय आश्रमात असतो तर दुसरा त्यांच्या स्वभावात. म्हणून ते माझी उंची गाठू शकत नाहीत. ते नावापुरतेच आश्रमवासी आहेत.  स्वामींनी किती सांगितले, मी किती सांगितले. जर ते बदलले नाहीत तर कठीण आहे.

            सत्याचा मार्ग, भगवंताचा मार्ग खडतर आहे. हृदय बुद्धी व इंद्रियांनी त्यांची दिशा बदललीच पाहिजे. माझ्या भावा विश्वामधून सर्वांना सारखीच मुक्ती मिळेल. हे नक्की होईल. अगदी नक्की. तथापि ही सर्वसामान्यांना मिळणारी मुक्ती असेल. माझ्या समीप असल्याची मुद्रा कोणालाही नाही, कठोर कष्ट व जागरूकता यांची शेवटच्या घटकापर्यंत गरज आहे.
 


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २८ जून, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            परंतु तिच्या बरोबरीने उभा राहू शकेल असा एकही तुल्यबळ सोबती नसतो. तिला तिच्या उच्च पातळीवरून खाली वाकून सर्वांना सांभाळावे लागते व त्यांच्या आत्म्यांना मातीच्या ममतेने कवटाळावे लागते. ती मात्र अंतरी एकटीच, एकाकी राहते.
 
          हे माझ्या अवस्थेशी तंतोतंत जुळते. या आश्रमात अगदी थोडे लोक आहेत. अत्यल्प व्यक्तींनी माझ्या हाकेला प्रतिसाद दिला. आहे इतर इथे येऊन शकत नाहीत. इथे वास्तव्य करण्यासाठी अनेक आले पण दीर्घकाळ राहू शकले नाहीत. याचे कारण हे स्थळ अतिशय शक्तिशाली आहे. इथे स्वामींचे अवतार कार्य घडत आहे. त्यामुळे इथे वास्तव्य करणे अति कठीण आहे.
 


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम