रविवार, १४ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

 वैश्विक स्फोट

२३ ऑक्टोबर १९३८
अमावस्येची काळोखी रात 
अहो आश्चर्यम्
अवस्थेच्या अंधाऱ्या रात्री 
जाहला पुनवेचा जन्म!

पिता मधुरकवी आळ्वार
माता वेदवल्ली
दक्षिणेकडील मधुरैसमीप 
वडक्कम्पट्टी ग्राम तयांचे
कन्येच्या आगमने आनंद त्यांसी शब्दातीत
सानुल्या या देवदूताचे 
नामाभिधान केली 'वसंता'
केवढे समर्पक नामकरण 
केले तयांनी अजाणता!
वसंता अर्थात वसंतऋतु 
अखेरीस त्या शुष्क मानवी जीवांना
गवसले प्रयोजन
आनंदाचा उत्सव करण्या 
प्रभुवराचे गुणगान गाण्या!

स्वागत तुझे माता मेरी 
साक्षात् प्रभूशी विवाह करी!
या! सकल जन या... 
तिची कथा पुढे ऐकण्या!

कट्टर गांधीवादी पिता 
आचारी जीवनी भगवद्गीता! 
असे अत्यंत दानशूर 
स्वातंत्र्य सैनिक शूरवीर 
तळपला शुक्र तार्‍यासम 
सच्चा पुत्र भारत मातेचा

वेदवल्ली, वैष्णव भक्तपरायण
रात्रंदिन प्रार्थनेत रममाण
पतीस घडतात तुरुंगवास 
त्या दुर्बल स्त्रीस 
आसरा ना कोणी दूजा
केवळ एक प्रभू परमेश, प्रभू परमेश!

हे प्रभू आहेस कोठे तू?
अंतरलास का मजसी तू?
हे माझ्या कृष्णा ! 
मज उध्दरणार नाहीस का ?
तिच्या करूण हृदनाचे पडसाद उमटती स्वर्गलोकी
भार असह्य वसुंधरेसी 
प्रभू म्हणे," परतुनी ये स्वगृहासी 
प्रतिक्षेत मी तवा नेत्रातील अश्रू पुसण्यासी!"

भगवंतासाठी अपयश येते क्वचित
कसे ? ते पाहू आपण 
बालवसंतेने नेली पुढे 
मातेची प्रज्वलित ज्योत 
त्या प्रखर ज्योतीने 
जर दाहिले प्रभुंवरा 
तर दोष कोणा द्यावा बरे?

धगधगता अग्नी भक्तिचा 
उद्रेक ज्वालामुखीचा 
अर्थात स्फोट विश्वाचा 
'ब्रम्हांड स्पोर्ट' सिद्धांत नव्हे हा 
आहे साक्षात स्फोट ब्रम्हांडाचा!

भगवंताशी संकल्प बदल अनिवार्य आता 
२७ मे २००१ या शुभदिनी 
मांगल्ये दिले ब्रह्मचारी बाबांनी
देऊनी मांगल्ये केली घोषणा मूक  
"आम्ही दोघ आहोत एक "

नायक नायिकेचा विवाह 
होऊनही सदा जीवन सुखी होता
कथेची होते सुफळ सांगता!

परी अम्मा याहुनी न्यारी 
वसंता न केवळ, ही आहे विश्वमाता
तिचे विश्व, तिची लेकरे दुःखात चूर असता 
असेल का संतोष तिच्या चित्ता ?

जोवरी ना देसी वैश्विक मुक्ती 
नसे मज शांती विश्रांती 
अग्निप्रवेश, नरकयातना 
सिद्ध मी याहूनी घोर सत्वपरीक्षा देण्या 
पाऊले ना ढळतील माझी मार्गावरूनी 

हा मार्ग वैश्विक मुक्तीचा, 
मानवा, दानवा 
कीटक, पशु, जलचरा 
मुक्त करील चराचरा


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



गुरुवार, ११ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            त्याच पानावर स्वामींनी एक ओळ अधोरेखित केली.

            ......काळ व इतिहासातून माणूस काहीही शिकत नाही.

           वेळ सतत बदलत राहते. युगे बदलतात. मनुष्याने अनेक काव्य वाचली आहेत; परंतु त्यापासून तो काहीही शिकला नाही. यामुळे तो स्वतःच स्वतःचा कट्टर शत्रू होतो. रामायण, भागवत, महाभारत, भगवत् गीता किती बरं दिव्य पुस्तके इथे आहेत! तथापि या पुस्तकांनी शिकवलेले सूक्ष्म अर्थ लोक आचरणात आणत नाहीत. परिणामतः माणूस पुन्हा पुन्हा जन्मास येऊन मृत्यू पावतो. माणूस जन्मास न येण्यासाठी जन्माला आले हे विसरला आहे. म्हणून, मार्ग दर्शविण्यासाठी अवतार अवतरला.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



 

मंगळवार, ९ जून, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            उद्घाटन समारंभाची वेळी भगवानांनी आमच्यावर भरभरून  कृपावृष्टी केली. पूर्ण होती देताना स्वामींच्या खुर्चीवरील कमळ खाली पडले. वेदिकेवर ठेवलेल्या सात पादुकांच्या जोड्यांवर विभूती व तेल साक्षात झाले.  तेलाचे सृजनीकरण कर्मसंहाराचे घटक आहे. जे लोक ह्या ठिकाणी या ध्यान सभागृहात येतील त्यांच्या कर्मांचा नाश होईल व त्यांना मुक्ती प्रदान केली जाईल. हे दर्शविण्यासाठी दोन दिवस तेल सुजित झाले. भगवान म्हणाले जसे पक्षांचे प्राण्यांचे आश्रयस्थान असते तसे साई गीतालयम सभागृह लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे.
             भगवान यांनी या उद्घाटन समारंभासाठी तई पूसम पौर्णिमेचा दिवस निवडला. हा एक शुभ योगच म्हणायचा! ह्या पवित्र दिनी संत वल्लालर सर दिव्य तेजा मध्ये विलीन झाले. अंडाळ आणि वल्लालर  प्रमाणे मलाही लहानपणापासूनच परमेश्वरामध्ये सदेह विलीन व्हायचे आहे. मी नेहमी ह्यासाठी प्रार्थना करते. या आमच्या संयोगासाठी स्वामींनी हाच दिवस निवडल्याचे आताच मला ज्ञात झाले. ते म्हणाले की ह्या तई पूसम दिवशी माझा त्यांच्याशी सदेह संयोग होईल. मी म्हणाले," तई पूसम हा दिवस साई गीतालयमचा उद्घाटन दिन आणि आमचा विवाह दिन म्हणून साजरा केला जाईल."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, ७ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            मी स्वामींच्या एका दृष्टीक्षेपासाठी, एका स्पर्शासाठी, एका शब्दासाठी तळमळते आहे. स्वामींनी लाखो लोकांना दर्शन, स्पर्श, संभाषण दिले आहे; ते मला हे देऊ शकत नव्हते का ? हे अवतार कार्य आहे. हे असंच व्हायला हवे. यामुळे त्यांचे प्रेम व जवळीकीसाठी मी कासावीस आहे. हे मला न मिळाल्यामुळे मी जग बदलण्याची शपथ घेतली. या अवतारकाळात स्वामींनी जे काही केलं ते त्यांना प्रेमावतार काळात आल्यानंतर अनुभवावेच लागेल. आता ते मला हुरहुर लावतात, तेव्हा त्यांना माझ्या प्रेमाचा ध्यास लागून राहील. हा कर्म कायदा आहे भगवान स्वतः या कायद्याची प्रात्यक्षिक करतो.

           द्वैत सर्वांचे मूळ आहे. सर्वाभूती परमेश्वर आहे. जेव्हा मानवाला हे उमजते तेव्हा त्याचे दुःख निवते, दुःख त्याला स्पर्श करू शकत नाही, तू जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, ३१ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            एक कोळी स्वतःभोवती जाळी विणतो व स्वतःच्या मध्यभागी बसतो. अगदी असेच प्रत्येक मनुष्याने स्वतःभोवती संस्कारांचे जाळे बनविले आहे. पूर्वीच्या जन्मांमध्ये त्यांनी जे काही केले असते, त्याचे या जन्मात संस्कार होतात. हे त्याने स्वतः निर्माण केलेलं जाळं आहे. मानव स्वतः विधीलिखित लिहून स्वतःला शापित करतो. कोणाचीही या जाळ्यातून सुटका नाही. हा कर्म कायदा आहे. भगवंत सुद्धा या कर्म कायद्याला बांधील असतो. हे कसे काय? आपण पाहू या.

             रामावताराच्या काळात वालीने तप करून वर प्राप्त केला. जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल असा तो वर होता. रामाने सुग्रीवास  वालीशी युद्ध करण्यास सांगितले. त्यावेळी झाडामागे लपून रामाने बाण मारून  वालीचा वध केला. जर रामाने हे केलं नसतं तर वालीचा वध कोणीही करू शकले नसते. हे अवतार कार्य होते. अवतार अवतरतो तेव्हा सर्व योजना आखतो, सर्वकाही त्यानुसारच घडले पाहिजे. पुढील युगात वाली नावाच्या पारध्याने झाडामागून कृष्णाच्या पायाच्या अंगठ्यावर बाण मारला व त्याचा मृत्यू झाला. रामाच्या चुकीच्या कृतीमुळे हे सर्व घडले. कर्म कायद्यापासून कोणाचीही सुटका नाही याचे प्रात्यक्षिक अवतार स्वतः करतात. आपण अजून एक उदाहरण पाहू.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २८ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           स्वामींनी पुस्तकात हे अधोरेखित केले. या आधी त्या पुस्तकात काय झाले ते आपण पाहू. नारद ऋषी सावित्रीकडे येऊन सत्यवान च्या प्रारब्धाबाबत बोलतात." मानवासाठी जीवन अंतर्गत दुःख व अश्रू आहे. आपल्यामधील दुष्ट शक्ती कार्यरत असतात. भगवंताने हा कायदा कशासाठी केला? मानवतेला हा शाप आहे का?" ती हे अजून विस्ताराने सांगण्यास सांगते.
            हा कर्म कायदा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच तिच्या दुःखाचे कारण आहे. पूर्वी त्याच्याकडून झालेल्या दुष्कृत्यांमुळे तो आज या स्थितीत आहे. जन्मोजन्मीचे दुर्गुण त्याच्या यातनांची कारण आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःची विधीलिखित घडवित असते. तो स्वतः त्याच्या शापित जीवनाचे कारण आहे. जन्मल्याक्षणी मतभेद व भेदभाव निर्माण होतात, आणि  ते पावलोपावली वाढत जातात. मूल दुःख व अश्रूंमधून जन्मास येते. ते एक एक पाऊल उचलून टाकत असता हे घडत राहते. म्हणून हे जाळं आहे.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २४ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           अरविंदांनी हे सगळं कसं बरं लिहिले ? त्यांनी जे काही लिहिले आहे ते सर्व माझे जीवन दर्शविते. मला याचे अतिशय आश्चर्य वाटते. आमची भविष्यात होऊ घातलेली पहिली भेट सुद्धा त्यांनी सुचित केली आहे. या भूतलावर जन्मास असलेली ही वसंत सरिता अथक धावत राहिली. ती अखेरीस साई सागरास मिळाली. तिचा उगम जेथून झाला तो स्त्रोत तिने प्राप्त केला. ७३ वर्षानंतर स्वामी मला बोलावतील आणि मी कोण आहे हे सर्व जगास दाखवतील.
            आपण पान नं. १२५ पाहूया,
            .....आमच्या आयुष्याचा जन्मच वेदनेतून होतो व रडतच आम्ही जन्मतो. आमच्या ठाईसहारक शक्तींचा वास असतो. आम्ही एखाद्या वेढलेल्या किल्ल्याप्रमाणे असतो. मानव जातीलाच काहीतरी शाप आहे अगदी जन्मापासून त्यांच्यावर द्वंद्वात्मक परिस्थिती लाभलेलीच असते. प्रत्येक पावलावर एक फास असतो. चुका आणि दुःख गुणाकाराने वाढतच असतात.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम