ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
एकेक चक्र पार करत गेल्यानेच मनुष्य परमेश्वर प्राप्ती करू शकतो. एक व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत भगवान प्राप्ती कशी करते. सत्यवान् - सावित्री कथेमधून शब्दबद्ध केले आहे. आणि अमृतत्वास कशी प्राप्त होते हे श्री. अरविंद सत्यवान्- सावित्री या कहाणी मधून दर्शवितात. अरविंदांनी या पुस्तकात जे काही लिहिले आहे त्या सर्वांचे प्रात्यक्षिक मी व स्वामी या स्थूल जगात करीत आहोत. तथापि एखादी गोष्ट वाचणे आणि स्वामी व माझ्या जीवनामध्ये घडणारे सर्वांनी. चक्षुर्वेसत्यं पाहणे यामध्ये खूप फरक आहे. हे पुस्तक वाचून सर्वांनी अंतर्गत अध्यात्मिक प्रवासासाठी स्वतःस तयार करायला हवे.
सावित्री तिच्या पतीचे विधीलिखित बदलते. स्वामी व मी एका युगाचे विधीलिखित बदलतो! आम्ही कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करतो.
पुष्कळ वर्षांपूर्वी स्वामींनी मला सांगितले होते की, नारदाचा अंश अवतरून आपली कथा लिहील. त्यावेळी मला या पुस्तकाची माहिती नव्हती. नारदाचा कोणता अंश आमची जीवनगाथा लिहावयास येईल हे पाच वर्षानंतर आत्ता स्वामींनी दाखविले. हे आहेत श्री. अरविंद. अवतार म्हणून अवतरलेल्या स्वामींच्या जीवन कार्याचे त्यांनी या पुस्तकात वर्णन केले आहे.
* एम्.पी. पंडितांच्या 'संक्षिप्त सावित्री' पुस्तकामधून.
टीप : यापुढे ढळक अक्षरातील उतारे हे योगी अरविंदांच्या ' सावित्री ' या मूळ पुस्तकातील आहेत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम