ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
अवतरीत अवताराने दुःख भोगलेच पाहिजे. भवसागराची दुःखे पाहून संत महंत भगवंताची प्रार्थना करतात. देव व ऋषीगण त्यांची प्रार्थना ऐकून भगवंताला विनंती करतात. केवळ महाविष्णू संरक्षक देव आहेत, म्हणून ते त्याची प्रार्थना करतात. या कारणासाठीच महाविष्णू अवतार घेतो. तो जेव्हा जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा त्याला अत्यंत क्लेश सोसणे भाग असते. आताचे कार्य खूप व्यापक आहे म्हणून हा महोत्तम अवतार प्रचंड प्रमाणावर कार्य करत आहे. प्रथम शिर्डी बाबा म्हणून येऊन त्याने पायाभरणी केली; नंतर सत्यसाई म्हणून अवतरला. शिर्डी बाबा शिवा अवतार होता; तर सत्यसाई शिवशक्ती अवतार म्हणून त्याने मलाही रूप देऊन आणले. त्यांच्यापासून झालेल्या ताटातुटीने मी अश्रू ढाळत आहे, विलाप करतेय. मी जागतिक कर्माचा भार वाहते व आम्ही दोघं सोसतोय.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम