ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
स्वामी या युगात जगाचे रक्षण करण्यासाठी आले. ते पूर्वीच्या अवतारांसारखे नाहीत; ते विनाश करण्यासाठी न अवतरता मानव जातीमध्ये परिवर्तन करण्यासाठी आले. म्हणून त्यांनी जगाची कारणे स्वतःवर घेऊन स्वतः दुःख भोगले. त्यांनी स्वतःच दोहोत विभागले, म्हणून आम्ही दोघांनी जागतिक कर्मे स्वतःवर घेऊन क्लेश सोसले .आम्ही सर्वांची पापकर्मे आमच्या शरीरांवर घेतली व त्यांना अमृतावस्था प्रदान करण्यासाठी, वैश्विक मुक्तीसाठी यातना सहन केल्या. स्वामींनी सर्वसामान्य मानवासारखा देह त्याग केला. यावर कृपया थोडावेळ चिंतन करा. २००३ पासून स्वामींच्या देहाला किती यातना झाल्या? एवढेच नाही तर अगदी बालवयात मांत्रिकाने त्यांच्या मस्तकात खिळे ठोकून व डोळ्यांमध्ये औषधी घालून त्यांना तीव्र ताप दिला. हे कशासाठी? भगवंताने एवढे दुःख का सोसावे? हे केवळ कलियुगातील लोकांसाठी भगवान करत आहेत. 'त्यांना' नीट चालता, बोलता येत नव्हते! किती हे दुःख! हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या अव्यय शरीरात सुया टोचल्या होत्या. बालपणी त्यांच्या पुस्तकात एक खेळा ठोकला आणि शेवटी त्यांचे सर्व शरीर यातनामय झाले !
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम