शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

      जन्माष्टमी  संदेश 

          आपण ‘कृष्ण’ या शब्दाचा अर्थ योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे. या शब्दाचे तीन अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे — ‘कृष्यति इति कृष्णः’ — जो मशागत करतो, तो कृष्ण. कशाची मशागत करायची? आपल्या हृदयभूमीची. कृष्ण आपल्या हृदयभूमीची मशागत करतो—दुर्गुणरूपी तण उपटून टाकतो आणि प्रेमरूपी जलाने ते सिंचित करतो. साधनेच्या साहाय्याने हृदयभूमीची नांगरणी करतो आणि भक्तीची बीजे पेरतो. अशा प्रकारे कृष्ण आपल्या हृदयाची मशागत  करतो. या शब्दाचा दुसरा अर्थ आहे — ‘कर्षति इति कृष्णः’ — जो आकर्षित करतो, तो कृष्ण. कृष्ण आपल्या डोळ्यांनी, आपल्या वाणीने, आपल्या लीलेने आणि आपल्या प्रत्येक कृतीने आपल्याला आकर्षित करतो. त्याच्या वाणीने तो द्वेषाने भरलेली हृदयेही मृदू आणि शांत करतो आणि त्यांना आनंदाने भरून टाकतो. या शब्दाचा तिसरा अर्थ आहे — ‘कुष्यति इति कृष्णः’ — जो सदैव आनंदमय असतो, तो कृष्ण. कृष्ण सदैव आनंदावस्थेत होता. या सर्व गुणांमुळेच ऋषी गर्गांनी त्याचे नाव ‘कृष्ण’ असे ठेवले. ‘कृष्ण’ या शब्दाचा सामान्य अर्थ श्यामल वर्णाचा असा घेतला जातो परंतु लोकं केवळ याच अर्थाचा विचार करतात आणि भगवानांच्या नावामागील अधिक गहन आणि खरा अर्थ विसरून जातात. हे सर्व भगवानांनी १४ ऑगस्ट १९९० रोजी दिलेल्या एका प्रवचनात सांगितले होते.               


जय साईराम

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           जर आपण भलाई केली तर आपल्याकडे चांगले येते. आपण बुराई केली तर वाईटच आपला पाठपुरावा करेल. हे आपण स्वतः लिहिलेले व लिहीत असलेले विधिलिखित आहे. आपण आपल्या आचार, विचार व उच्चारातून फक्त चांगलेच केले पाहिजे. स्वामींनी सातत्याने ८४ वर्षे याची शिकवण दिली. आता महर्षी अरविंदांनी नाविन्यपूर्ण रीतीने हे लिहिले आहे. पुस्तकात सर्व काही स्वामींनी अधोरेखित केले व मला लिहायला सांगितले. सर्व सारखेच आहे. अरविंदांनी स्वामींच्या अवतार कार्याबद्दल आधीच लिहिले आहे. मानवाची गहिरे ठसे त्याला कुमारगांवर घेऊन जातात. अखेरीस, मनुष्य यावर मात करतो. म्हणूनच खरा शत्रू कोण हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. प्रत्येक माणसाने या गुप्त शत्रूवर ताबा मिळवून त्याचा पराजय करायला हवा.
          परमात्म सत् चरित्र भाग १४ या पुस्तकातील आत्म सोबती या नव्या अध्यायाच्या शेवटच्या उतारातून खालील भाग घेतला आहे.
           स्वामींनी अरविंदांच्या सावित्री पुस्तकातील पान १०३ वर काही लिहिले व काही भाग सुचविला. 
           पृथ्वीची सुज्ञता सावित्रीच्या स्थिर मनाशी हितगुज करते. तिचे मन विचारांचा पलीकडे उडी घेते व मानवासाठी अज्ञात आणि अनंत असणाऱ्या नव्या क्षितिजाचे दरवाजे उघडते.
           ती सभावतालच्या सर्वांना आपल्या कवित घेते व त्यांना दिव्यत्वाकडे नेण्यासाठी सिद्ध होते.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           आता आपण यासंबंधी पाहुयात. जन्मल्या क्षणापासून मानवास विरोधाला तोंड द्यावे लागते. विरोधाला सुरुवात होते व तो वाढत जातो. हा विरोध आणि झगडा किती शेकडो वाटांनी व ठिकाणाहून बंड करतो! कोण आहे हा शत्रू? म्हणून चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ते आपलेच वाईट विचार आहेत. आपण जन्मल्याबरोबर ते येतात व आपल्या विरोधात उभे ठाकतात. आपली संस्कारात आपले शत्रू आहेत. कोणतेही नवीन शत्रू उड्या मारून आपल्यासमोर उभे ठाकत नाहीत. सर्व काही आपलेच भावविश्व आहे. आपण शरीर धारण करून जन्मल्याक्षणी ते आपला पाठपुरावा करू लागतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे महान संतांनी घोषित केले आहे व स्वामींनी याची शिकवण दिली.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

 

 

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           ज्या स्वामींनी देह सोडला ते माझ्या अश्रूंमुळे व विलापाद्वारे परत येतील. त्यांना हे कार्य एकाच देहाद्वारे सिद्धीस नेता येणार नाही का? पुन्हा देह कशासाठी? पहिला देह, त्यांनी जागतिक कर्मांसाठी सोडलेला देह आहे हे सूचित करतात. इतक्या टोकापर्यंत त्यांनी सहन करायला हवे! आता स्वामी नूतन देहांत येतात. सत्ययुगात प्रेम साई अवतरेल. हे खूप मोठे, प्रचंड कार्य आहे. हे कार्य एका अवताराच्या काळात पूर्ण होणारे नाही. म्हणून भगवान एका मागोमाग एक चार अवतार घेतो. हे पूर्वी कधी घडलेले नाही. परमेश्वराची पूर्ण शक्ती, ताकद पृथ्वी सहन करू शकणार नाही. म्हणून तो एक अवतार धारण करून अवतरीत होऊ शकत नाही म्हणून तो स्वतःच चारात विभागून अवतरतो. तो अवतार कार्याचे उल्लंघन करू शकत नाही व कर्मकायद्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तो परिपूर्ण स्वरूपात येऊ शकत नाही. म्हणून त्याने चार अवतार धारण करून अवतरण्याची योजना आखली.
             स्वामींनी परत त्याच पानावर अधोरेखित केले.....
या पृथ्वीच्या अस्तित्वातच एक दडलेली अंधारी विरोधी शक्ती आहे व ती जगाच्या प्रत्येक पावलागणिक विरोध करते. शेकडो ठिकाणी शेकडो वेळा संघर्ष करून मानवाला या विरोधी शक्तीला हरवावे लागते. ही शक्ती चुकीच्या मार्गाने नेते, विकृत बनते व मानवाचा पाडावा करते. या दडलेल्या शत्रूवर मानवाला विजय मिळवायलाच हवा.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

 

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           ऑपरेशन आणि परमेश्वरावर? पूर्वीच्या युगांमध्ये असं काही घडलेलं आपण ऐकला आहे का? भगवान, जो अवघ्या जगाचा प्रतिपाळ करतो, त्याच्यावर शस्त्रक्रिया केली! हे सर्व कशासाठी? का? हे कसं काय? जगाला सुरक्षित ठेवणाऱ्या भगवंताला या जगाचे दुःख सोसलेच पाहिजे. जगाच्या दुःखात सहभागी व्हायला हवे. हा अवतारकायदा आहे. स्वामी कर्मकायदा बदलू शकत नाहीत.
            अवतरीत अवताराने दुःख भोगलेच पाहिजे. भवसागराची दुःखे पाहून संत महंत भगवंताची प्रार्थना करतात. देव व ऋषीगण त्यांची प्रार्थना ऐकून भगवंताला विनंती करतात. केवळ महाविष्णू संरक्षक देव आहेत, म्हणून ते त्याची प्रार्थना करतात. या कारणासाठीच महाविष्णू अवतार घेतो. तो जेव्हा जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा त्याला अत्यंत क्लेश सोसणे भाग असते. आताचे कार्य खूप व्यापक आहे म्हणून हा महोत्तम अवतार प्रचंड प्रमाणावर कार्य करत आहे. प्रथम शिर्डी बाबा म्हणून येऊन त्याने पायाभरणी केली; नंतर सत्यसाई म्हणून अवतरला. शिर्डी बाबा शिवा अवतार होता; तर सत्यसाई शिवशक्ती अवतार म्हणून त्याने मलाही रूप देऊन आणले. त्यांच्यापासून झालेल्या ताटातुटीने मी अश्रू ढाळत आहे, विलाप करतेय. मी जागतिक कर्माचा भार वाहते व आम्ही दोघं सोसतोय. 



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

बुधवार, २९ जुलै, २०२६

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       

  गुरुपौर्णिमेचा संदेश 

 ॐ श्री साई राम 
   भगवान बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

आज गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र दिवस आहे.
आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या गुरूंच्या प्रती पूर्ण श्रद्धेने कृतज्ञता समर्पित करण्याचा आजचा दिवस आहे.
जसा पौर्णिमेचा चंद्रमा आकाशातील अंध:काराला दूर करतो  तसेच गुरु आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंध:काराला दूर करतो. 
 तो कोणता अंधकार आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या बंधनात टाकतो?
 
अविद्या, अज्ञान, भ्रम, अहंकार देहाभिमान  यामुळे आपण नित्य आणि अनित्य यामधील भेद ओळखू शकत नाही.काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे तसेच परमेश्वराला कशी भक्ती आणि कसा भक्त प्रिय आहे  हेच आपल्याला समजत नाही. 
हे खरे अज्ञान आहे. गुरूंचा अनुग्रह झाला की आपल्या जीवनातील हे अज्ञान दूर होते.

स्वामींनी मानवतेला सर्वप्रथम कोणता संदेश दिला होता?
 " मानस भज रे गुरु चरणम 
 दुस्तर भवसागर तरणम " 
 अर्थात
 मनाला गुरूंच्या चरणावर स्थिर करा
जेव्हा आपले मन गुरूंच्या चरणांवर स्थिर होते आणि हेच आपल्याला  भवसागरातून तरुन नेते म्हणून जीवन मार्गावर वाटचाल करताना त्यांच्या आज्ञेचे पालन करा. त्यांची शिकवण आचरणात आणा.
आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये गुरूंचा महिमा जाणून घेण्याचाही दिवस आहे.
स्वामींनी म्हटले आहे सत्य बोला धर्माचे(सदाचरण)पालन करा. मातापित्यांचा सन्मान करा.सेवा करा. हीच माझी गुरुदक्षिणा आहे.
 
जय साईराम

रविवार, २६ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           राजमुकूट धारण करण्याऐवजी त्या वेळी राम वनात गेला. या वेळेपासून त्याचा वनवासाला सुरुवात झाली. तिथे पासून ताटातूट झाल्याने त्याच्या यातना वाढल्या. हे अवताराचे क्लेश आहेत. याप्रमाणेच दुष्टांचा नाश करून धर्म स्थापना करण्यासाठी कृष्णावतार झाला. त्याचेही संपूर्ण जीवन दुःखमय होते. त्याच्या जन्मापासूनच अनेक असुरांनी त्याचा वध करायचा प्रयत्न केला. त्याचे कौटुंबिक जीवनही दुखत होते.

            स्वामी या युगात जगाचे रक्षण करण्यासाठी आले. ते पूर्वीच्या अवतारांसारखे नाहीत; ते विनाश करण्यासाठी न अवतरता मानव जातीमध्ये परिवर्तन करण्यासाठी आले. म्हणून त्यांनी जगाची कारणे स्वतःवर घेऊन स्वतः दुःख भोगले. त्यांनी स्वतःच दोहोत विभागले, म्हणून आम्ही दोघांनी जागतिक कर्मे स्वतःवर घेऊन क्लेश सोसले .आम्ही सर्वांची पापकर्मे आमच्या शरीरांवर घेतली व त्यांना अमृतावस्था प्रदान करण्यासाठी, वैश्विक मुक्तीसाठी यातना सहन केल्या. स्वामींनी सर्वसामान्य मानवासारखा देह त्याग केला. यावर कृपया थोडावेळ चिंतन करा. २००३ पासून स्वामींच्या देहाला किती यातना झाल्या? एवढेच नाही तर अगदी बालवयात मांत्रिकाने त्यांच्या मस्तकात खिळे ठोकून व डोळ्यांमध्ये औषधी घालून त्यांना तीव्र ताप दिला. हे कशासाठी? भगवंताने एवढे दुःख का  सोसावे? हे केवळ कलियुगातील लोकांसाठी भगवान करत आहेत. 'त्यांना' नीट चालता, बोलता येत नव्हते! किती हे दुःख! हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या अव्यय शरीरात सुया टोचल्या होत्या. बालपणी त्यांच्या पुस्तकात एक खेळा ठोकला आणि शेवटी त्यांचे सर्व शरीर यातनामय झाले !



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम