गुरुवार, ७ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             आमच्या विवाहाच्या वेळी स्वामींना सर्व काही माहीत होते. मला भगवंताशी विवाह करायचा होता. तथापि भूलोकावर हे शक्य नाही असे मला माझ्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी मला तीन मुलगे सुचविले व एकाची पसंती करायला सांगितले. माझ्या नकळत मी स्वामींना पसंत केले. त्यांनी माझ्याशी वेगळ्या रूपात विवाह केला. जरी रूपे बदलली तरी भगवान व शक्ती हे आमची सत्य आहे; आत्मा अपरिवर्तनीय आहे. दोघांमधील अंतर नाहीसे झाले. दोन हृदयांचा संयोग झाला; परंतु माझे मन अशांत होते. अजूनही मला वाटत होते," आम्हा दोघांमध्ये अंतर आहे!"

            २००१ मध्ये स्वामींनी मला ' पुट्टू मांगल्य ' करून ते व्हाईटफील्डच्या वृंदावनला घेऊन यायला सांगितले. स्वामींनी मांगल्य हस्त स्पर्शाने आशीर्वादित केल्यानंतर मी ते गळ्यात घातले. केवळ त्या क्षणी आमच्या मधील अंतर गळून पडले. अंतरीची खून पाठवून माझा जीव त्यांच्या जीवात गाड प्रेमाने विसावला. यानंतरच आमचा खरा प्रवास सुरू झाला.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ३ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             माझ्या जीवनप्रवासाचा मार्गदर्शक स्वामी, माझ्या अंतरात आहेत. ते केवळ अंतर्यामी नाही तर माझ्या बाह्य जीवनाची सोबती ही आहेत. अगदी बालवयापासून मला भगवंताशी विवाह करायचा होता. या ज्वलंत इच्छेमुळे भगवान माझे पती झाले. भगवंताने माझ्याशी विवाह केला; परंतु या सत्यापासून मी अनभिज्ञ होते. काही काळ गेल्यानंतरच स्वामींनी सांगितले की, त्यांनीच माझ्याशी विवाह केला. 
            आता आपण ११३ पानावरील उतारा पाहू.
             .....सत्यवान सावित्री दोघांना एकमेकांची ओळख पटते. आठवणींच्या पटलावर त्यांचा पूर्ण भूतकाळ दृश्यमान होतो. रूपे बदललेली पण आत्मा नाही. दोघांमधील अंतर क्षणात गळून पडते व अंतरीची खून पटवून जीव जीवनात गार्ड प्रेमाने विसावतो.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २३ एप्रिल, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            लहानपणापासून मला कृष्णाची विवाह करायचा होता. आता ६३ व्या वर्षी माझे नातेवाईक माझी मुले आणि पती या सर्वांनी मला साईकृष्णाला देऊन टाकले. ही घटना मी विसरू शकत नाही खरोखर एक अजब चमत्कार! केवळ परमेश्वरालाच त्याच्या लीला ठाऊक! स्वामींनी कसे मला सर्व बंधना मधून मुक्त केले व केवळ त्यांचाच एक बंधन आहे हे दर्शविले. हा काही संन्यास समारंभ नसून विवाह समारंभ आहे! तरुण असताना मी स्वतः अंडाळ असल्याची कल्पना करून मी तिच्या ' वारनम अयिराम ' . हा श्लोक पुन्हा पुन्हा गाऊन आनंद घेत असे. ह्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाशी झालेल्या तिच्या स्वप्न विवाहाचे वर्णन करते. आज हे सत्यात उतरले आहे. अखिल विश्व या विवाह समारंभाचे साक्षी आहे. " यद् भावम् तद् भवति " तुम्ही ज्याचा विचार करता ते बनता. मी कल्पिलेला कृष्णाची विवाहाचा प्रसंग आता वास्तवात उतरला आहे वा वास्तव बनला आहे. मी ४० वर्षे गृहस्थाश्रमी संन्यासी होऊन जीवन जगले. आता संन्यासी बनून मी कृष्णाबरोबर गृहस्थ जीवन जगत आहे! ज्या चमत्काराने माझी मनोकामना पूर्ण केली त्या चमत्काराचे कोणालाही आकलन होणार नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             सत्यवान- सावित्रीची गोष्ट सर्वांना माहीत आहे. तरीही महान संत अरविंदांचे लिखाण वेगळे आहे. ते दुसरी कथा सांगत होते. ते त्रिकाळ ज्ञानी आहेत. त्यांना भूतकाळ, वर्तमान व भविष्याचे ज्ञान आहे. ते त्या सत्यवानसंबंधी लिहीत नव्हते; तर भविष्यात होणारा अवतार भगवान श्री सत्यसाईबाबांबद्दल लिहीत होते. त्यांनी अवतार व त्याची शक्ती, यांच्या अवतार कार्याबाबत लिहिले. स्वामींचा जन्म २३ नोव्हेंबर १९२६ ला झाला. दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबर, १९२६ ला अरविंद यांनी घोषित केले, "आज कृष्ण स्थूल रूपात अवतरला." या घोषणेनंतर ते एकांतात गेले व क्वचितच दृष्टीस पडले.
             अशारीतीने स्वामींनी सावित्री पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित केले व मला माझ्या जीवनाशी त्या भागांची तुलना करावयास सांगितले. आता आपण पाणी १०६ पाहू.
             .....तुझ्या अंतरंगातील धगधगणाऱ्या मार्गदर्शकाशिवाय इतर कोणाची तुला गरज नाही. तुझा होऊ घातलेला जीवनसाथी व सोबती तुझी वाट पाहत आहे.




संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १९ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             स्वामींनी १९९८ मध्ये माझ्या उदरात विश्व ठेवले. मी मातृभावामुळे विश्वपरिवर्तन घडविले. कलियुगात या भूतलावर खरा आनंद कुणालाही माहित नाही. फसव्या आनंदाच्या शोधा ते इकडून तिकडे भरकटत आहेत. सर्व जन्ममृत्यूच्या चक्रात अडकले आहेत. खरे तर निखळ आनंद केवळ परमेश्वरापासून प्राप्त होऊ शकतो.

             'मी व माझे' यावरील ममत्वाचा त्याग केला तरच निखळ आनंद निर्माण होतो. जगास याचे प्रात्यक्षिक करण्यासाठी मी इथे आले. जागतिक कर्मे स्वीकारून मी यातना भोगत आहे. हे माझ्या मातृभावामुळे साध्य होते. स्वामींनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             हे माझ्याशी तंतोतंत जुळते. वसंता म्हणजे वसंत ऋतुचे आगमन-  माझा जन्म. पूर्वी स्वामींनी मला 'वैश्विक स्फोट' ही कविता दिली. त्यात माझा जन्म व जीवनाचे वर्णन आहे. हा अध्याय त्या पूर्ण कवितेने संपतो.

अवसेच्या अंधाऱ्या रात्री वडकंपट्टी ग्रामी
जाहला पुनवेचा जन्म

           त्यांनी माझ्या माता-पित्यांबद्दलही लिहिले. पुढे स्वामींनी घोषित केले की, ते व मी आम्ही दोघं,'असूनही एक झालो दोन' अशा रीतीने त्यांनी आमची अवस्था जगासमोर उघड केली, होय. मी विश्वमाता आहे. अखिल विश्व मी माझ्या उदरात वहावे, माझ्यापासून सर्व जन्माला यावेत यासाठी स्वामींकडे अश्रू ढाळले. ' उपनिषदांच्या पलीकडे' या पुस्तकात मी हे लिहिले आहे.
 

संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १२ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

२८ सप्टेंबर २०१३ मध्यान्ह ध्यान 

वसंता : स्वामी मी सावित्री वर लिहू का?
स्वामी : होय, तू लिही. अरविंदांनी तुझ्या जीवनाबद्दलच लिहिले आहे.
वसंता : आता मला समजलं स्वामी, मी लिहीन.
ध्यान समाप्त.
          स्वामींनी श्री अरविंद यांच्या 'सावित्री' या पुस्तकातील अध्यायांमधील काही भाग सुचित केले. मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आले की ते सर्व माझ्या जीवनाशी निगडित होते. सावित्रीच्या व माझ्या जीवनशैलीमध्ये आमच्या जन्मापासूनच साधर्म्य आहे. तिच्या जन्माबाबत १०१ पानावर स्वामींनी काय अधोरेखित केले ते आपण पाहू,
           ....वसंत ऋतु बहरला. अशाच एका बहराच्या अत्युच्च क्षणी, सृष्टीच्या सौंदर्याचा उत्सव साजरा करत असता, सत् चित् आनंदासाठी तिने दिलेल्या हाकेला ओ देत एक दैवी आत्मा पृथ्वीवर अवतरला. सावित्री जन्मली. अपूर्ण काय हाती घेण्यास आदिमाता भूतलावर परत आली.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ९ एप्रिल, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            प्रथम गणेश होम, नवग्रह होऊन आणि लक्ष्मीनारायण सुदर्शन होऊन झाले. अखेरी संन्यास होऊन करण्यात आला. ह्या होमाच्या अगोदर माझे मंगळसूत्र काढले व ते फुले फळे व इतर पूजा साहित्य बरोबर एका तबकात ठेवण्यात आले. त्यानंतर ते माझ्या यजमानांनी दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केले. इथून पुढे त्यांना माझे यजमान म्हणणे उचित ठरणार नाही. आता माझी आणि त्यांचे नाते मित्रत्वाचे आहे. असा मित्र जो परमेश्वराचे कार्य करण्यासाठी मला सहाय्य करतो.  श्री मनोहरननी स्वतःच्या हातानी मी काढलेले मंगळसूत्र  दुर्गा देवीच्या चरणी अर्पण केलेले पाहून सर्वांचे डोळे पाणावले. माझ्या आयुष्यात अशी घटना घडेल असे कोणालाही वाटले नव्हते. स्वामी म्हणाले की अशी घटना कोणाच्याही जीवनात घडलेली नाही. कोणतीही स्त्री आपले मंगळसूत्र काढण्यास व आपल्या पतीकडून ते परमेश्वरास अर्पण करण्यास राजी होणार नाही. मी दीर्घकाळ गृहस्थाश्रमात असूनही संन्यासी होते व आता मी पूर्णपणे शास्त्रसंमत संन्यासी आहे. मंगळसूत्र काढण्याच्या घटनेने मला रामकृष्ण परमहंस आणि पवित्र धागा तोडल्याची आठवण करून दिली. पवित्र अग्नीमध्ये पूर्ण होती देताना मी म्हणाले, "भगवान आम्ही आमचे जीवन आपणास समर्पित करतो."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
            इथे माझी पृथ्वीवरील अवतरण सूचित केले आहे. पूर्वी एकदा स्वामी म्हणाली की कलियुगाच्या लोकांचे रुदन ऐकून व त्यांच्या यातना पाहून महालक्ष्मी धरतीवर अवतरली. मी अशी अवतरले. मी कलियुग तोडून प्रकृतीचे विधीलिखित बदलण्यासाठी आले. कलीचा कायदा म्हणजे कर्मकायदा. हा कायदा तोडून मी प्रकृतीचा अधःपात थांबविते. हा विनाश प्रकृतीचे विधीलिखित आहे मी स्वामींपासून नियुक्त झाल्यामुळे, माझ्यापाशी असलेल्या सर्व शक्तीनिशी मी हे करते. "त्या"ने मला वेगळ्या रूपात आणले मी "त्या"ची शक्ती आहे.
            स्वामी व मी इथे आलो. कलियुगाला मुक्त करण्यासाठी अखिल विश्वाची कर्मे आमच्या देहांवर घेतली. या आपत्काली मृत्यूघटकेच्या वेळी मी अश्वत्थ वृक्ष परत विश्वात आणून पृथ्वीवर-  मानवी मातीवर त्याचे आरोपण करते. या जगात मी स्वामींना परत आणि असा याचा अर्थ आहे. "त्या"च्या संसार वृक्षाचे पृथ्वीवर रोपण झाले. मी पृथ्वीचे वैकुंठात परिवर्तन करते, तिला स्वर्गाची शाखा करते. प्रकृती सर्वांना मुक्ती बहाल करते. ती स्वतः झेप घेऊन मानवाला अमृतवाकडे घेऊन जाईल.
 



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ५ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
            स्वामींनी सर्वप्रथम ९७ पानावरील उतारा निर्देशित केला. या पानावर स्वामींनी खालील वाक्य अधोरेखित केले,
           पृथ्वीवर स्वर्गाचे पदार्पण होईल.....
           या ओळीच्या बाजूला समासात स्वामींनी लिहिले,"वैकुंठ!" त्याच पानावर स्वामींनी खालील उतारा उद्घृत केला.
            मी तुझा आक्रोश ऐकला आहे. होय! आत्मिक शक्तीने कलिचा कायदा तोडून प्रकृतिचा अधःपत थांबविणारा अवतरणार आहे. मृत्युच्या महाभयंकर घटकेच्या वेळी बीजारोपण होईल. स्वर्गाच्या शाखेचे मानवी मातीवर आरोपण होईल. प्रकृती तिच्या मरते पायरीवरून (अमृतत्वाकडे) झेप घेईल.




संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २ एप्रिल, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
प्रस्तावना 

             एकेक चक्र पार करत गेल्यानेच मनुष्य परमेश्वर प्राप्ती करू शकतो. एक व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत भगवान प्राप्ती कशी करते. सत्यवान् - सावित्री कथेमधून शब्दबद्ध केले आहे. आणि अमृतत्वास कशी प्राप्त होते हे श्री. अरविंद सत्यवान्- सावित्री या कहाणी मधून दर्शवितात. अरविंदांनी या पुस्तकात जे काही लिहिले आहे त्या सर्वांचे प्रात्यक्षिक मी व स्वामी या स्थूल जगात करीत आहोत. तथापि एखादी गोष्ट वाचणे आणि स्वामी व माझ्या जीवनामध्ये घडणारे सर्वांनी. चक्षुर्वेसत्यं पाहणे यामध्ये खूप फरक आहे. हे पुस्तक वाचून सर्वांनी अंतर्गत अध्यात्मिक प्रवासासाठी स्वतःस तयार करायला हवे.
             सावित्री तिच्या पतीचे विधीलिखित बदलते. स्वामी व मी एका युगाचे विधीलिखित बदलतो! आम्ही कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करतो.
             पुष्कळ वर्षांपूर्वी स्वामींनी मला सांगितले होते की, नारदाचा अंश अवतरून आपली कथा लिहील. त्यावेळी मला या पुस्तकाची माहिती नव्हती. नारदाचा कोणता अंश आमची जीवनगाथा लिहावयास येईल हे पाच वर्षानंतर आत्ता स्वामींनी दाखविले. हे आहेत श्री. अरविंद. अवतार म्हणून अवतरलेल्या स्वामींच्या जीवन कार्याचे त्यांनी या पुस्तकात वर्णन केले आहे.

* एम्.पी. पंडितांच्या 'संक्षिप्त सावित्री' पुस्तकामधून.
टीप : यापुढे ढळक अक्षरातील उतारे हे योगी अरविंदांच्या ' सावित्री ' या मूळ पुस्तकातील आहेत.
  

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




रविवार, २९ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
प्रस्तावना 

            श्री अरविंदच्या 'सावित्री' या  पुस्तकातील पुष्कळ भाग अधोरेखित करून स्वामींनी दिव्य संदेश म्हणून मला दिले. मी स्वामींना विचारता स्वामी म्हणाले," मी या पुस्तकात अधोरेखित केलेल्या भागांवर आधारित तू तुझ्या जीवनाची तुलना सावित्रीच्या जीवनाशी कर."
           पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर मी अचंबित झाले; कारण माझी व सावित्रीची जीवनशैली समांतर आहे. मी विचार केला," श्री अरविंदना माझ्याबाबत कसे बरे ठाऊक झाले?" या पुस्तकात त्यांनी जीवात्म्याचा अंतर्गत प्रवास व सत्यप्राप्तीच्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांचा करावा लागणारा सामना याविषयी लिहिले आहे. कुंडलिनीचे एकेक चक्रपार करून जात असता जे बदल घडतात ते अरविंद आणि सविस्तर लिहिले आहेत.

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २६ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
आभार 

            श्री अरविंद यांचे 'सावित्री' हे काव्य, त्यांची दूरदर्शी व स्फूर्तीदायक सत्य दृष्टी यांची, श्री वसंतसाई व वसंतसाई बुक्स अँड पब्लिकेशन ट्रस्ट कृतज्ञता व्यक्त करतात. आज हे पुस्तक त्यांच्या सावित्री मुळे अस्तित्वात आले.

          'संक्षिप्त सावित्री' हे पुस्तक लिहिणाऱ्या एम.पी. पंडितांना शतशः धन्यवाद. वसंतसाई अम्मांच्या लेखनास मार्गदर्शन करून स्फूर्ती देणाऱ्यासाठी भगवान सत्यसाईबाबांनी या पुस्तकातील काही भाग अधोरेखित केले.

           प्रिय वाचक ....
          या पुस्तकातील श्री वसंतसाई, श्री सत्यसाईबाबांचा उल्लेख स्वामी असा करतात.

  
संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, २३ मार्च, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            त्यानंतर आम्ही स्वामींचा फोटो व पादुका घेऊन नागरसंकिर्तन करत गावामध्ये मिरवणूक काढली. मी माझी कृष्णाची मूर्ती बरोबर घेतली. दारातच (लहान मुलगा) मणिवन्ननने माझे पाय धरले वरडत रडत 'मी तुला जाऊ देणार नाही' असे म्हणाला. मी म्हणाले," स्वामींनी मला सांगितले आहे मला गेलेच पाहिजे. ही सर्व माया आहे." माझ्या कृष्णाच्या मूर्तीला, श्री मनोहरनना  व मला हार घालण्यात आले. मी माझ्या कृष्णासोबत जीवन प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी पाऊल उचलले. मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या सुवासिनी ध्यान सभागृहात पोहोचल्या. आम्ही श्री गणेशाला प्रदक्षिणा घालून ध्यान सभागृहाच्या पायऱ्या चढलो. एस. व्ही. नी दूधभात कालवला. कोदाईंनी त्याचे तीन उंडे बनवले आणि मला भरवले. ते खाऊन मी श्री मनोहर यांच्या सह सभागृहात प्रवेश केला.
             रंगीत दिव्यांच्या माळा व फुलांनी सभागृह सुशोभित केले होते. सभागृह इंद्राच्या दरबारासारखे भासत होते. लोक दोन्ही बाजूला बसली होती. व्यासपीठावर मध्यभागी स्वामींचा भव्य फोटो लावला होता. या फोटो त्यांचा उजवा हात चिन्मुद्रेत होता. त्यांच्या अनामिकेचा अग्रभाग अंगठ्यावर दाबला होता व बाकीची तीन बोटी मिटलेली होती. एका भक्ताने याचे सुंदर स्पष्टीकरण दिले. जर एखाद्याने तिन्ही गुणांवर नियंत्रण मिळवले तर जीव आणि शिव यांची मिलन होते. हे मुक्ती स्थळ आहे ती महिला भक्त म्हणाली, आम्हा तुम्ही तिन्ही गुणांवर विजय मिळवला आहेत. तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला आहे आणि तुमचा भगवानांची योग झाला आहे.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, २२ मार्च, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अनुक्रम
प्रस्तावना
१.मानवतेचा इतिहास
२.कर्मकायदा - अवतार कायदा 
३.विधिलिखित बदलते
४.काळ अन् मृत्यूवर विजय
५.सुईच्या अग्रा इतका अहंकार
६.बृहत योजनेनुसार भगवत रूपाचा साचा
७.आत्म्याची तीन मुखे 
८.स्तूपाचा जन्मदिन
९.जुनी कहानी अर्थ नवा
१०.एप्रिल नॉट होतोॲप्रिकॉट (जरदाळू)
११.कायद्याचे सिंहासन 
१२.अध्यात्मिक सूत्र मर्यादित 
१३.काहीही नाही हेच सर्व काही
१४.चुडामणी 
१५.यम कोण आहे ?
१६.दैवी न्यायाधीश
१७.माझ्याद्वारे जगाचा यमावर विजय
१८.देव माझ्या प्रेमाचा भुकेला 
१९.सुवर्णयोग - सोनेरी परिवर्तन
  

संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
             या सर्वोत्तम अवताराची रहस्य योगी अरविंदना कसे बरे ज्ञान झाले? ह्या सर्वश्रेष्ठ अवताराची कुशल योजना त्यांना कशी काय अवगत झाली? 'सत्यवान- सावित्री' या काव्यामधील अंतर्भूत आध्यात्मिक महत्त्व व्यक्त करून, खरे तर त्यांनी सत्य साई अन् वसंता यांची (जीवनशैली) प्रकट केली आहे. सावित्री तिच्या पतीचे विधीलिखित बदलते. स्वामी व मी युगाचे विधीलिखित बदलतो. आम्ही कलियुगाची सत्ययुगात परिवर्तन करतो. ही 'सत्यवान सावित्रीची' कहाणी आहे की ' सत्यसाई - वसंता' साईची गाथा?
VS

समर्पण
प्रिय भगवान,

          हे पुस्तक मी आपल्या चरणी अर्पण करते. हे तुम्ही लिहिले. सर्व काही तुम्हीच केले. अव्याहत प्रतीक्षेत माझे हृदय छिन्नभिन्न होत आहे. कृपा करून या आणि सर्वांवर कृपेचा वर्षाव करा.
आपली पादधूलिका
VS  

संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
             मी कधीही माझ्या वडिलांच्या डायऱ्या वाचल्या नाहीत. स्वामींनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिल्यानंतर आणि मला त्यावर लिहिण्यास सांगितल्यानंतरच मी त्यांच्या डायऱ्या वाचल्या. अजूनही वडक्कमपट्टीमध्ये तिजोरी त्यांच्या सर्व डायऱ्या जतन करून ठेवलेल्या आहेत. मणिवन्नननी  त्या डायऱ्या आश्रमात आल्यानंतरच आम्हाला त्यांच्या मनातील भावभावनांच्या गहनतेची जाणीव झाली. हे काही एखाद्या सर्वसामान्य मनुष्याचे भाव विश्व नाही. याद्वारे स्वामी मला आणि जगाला, ते कोण आहेत हे ज्ञात करून देत आहेत.
 
*     *     *
 
           माझे वडील कट्टर वैष्णवभक्त, गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक व भगवद्गीतेचे महाअनुयायी होते. त्यांच्या परमेश्वरावरील अतिव प्रेमातून अत्यंत उत्कट भक्ती निर्माण झाली. अशी भक्ती क्वचितच पाहायला मिळते. त्यांनी न चुकता गीतेतील मार्गाचे काटेकोरपणे पालन केले. त्यांच्या डायऱ्यांमधून त्यांची परमेश्वर प्राप्त तिकडे जाणारी जीवन यात्रा प्रतीत होते. भगवान श्री सत्य साईबाबांनी जर हे निदर्शनास आणून दिले नसते तर ते  सर्व अप्रकाशित राहिले असते. हे पुस्तक त्यांच्या मार्गदर्शनाची परिणती आहे. सर्वधर्माच्या लोकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी होवो.
वसंत साई 

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
             माझ्या वडिलांच्या डायरीच्या शेवटच्या पानावर त्यांनी एक आकृती काढली आहे. जी स्वामींनी माझ्या डायरीत काढलेल्या जीवन तरंग सिद्धांताशी मिळतीजुळती आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवनाची मीमांसा करताना याचा कसा वापर केला आहे ते आपण पाहूया.
 
 
 
            आ. वा. वा. मधुरकवी आळ्वार जन्म.
            आनंद (वर्ष) वैकाशी महिना २२ दि. गुरुवार  ४-६-१९१४ एकादशी सिद्धीयोग
             माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवनातील चढउतारांची मीमांसा करताना, त्यांना गीतेतून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग केला आहे. त्यांच्या या जीवन तरंग सिद्धांतात ते सांगतात की त्यांच्या जन्मापासून म्हणजे १९१४ ते १९१८ त्यांचे जीवनसत्व गुणांनी युक्त होते. तरुणपणी ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. त्यादरम्यान त्यांच्या मनात गांधीविषयी, देशाविषयी व परमेश्वराविषयी अपार पूज्य भाव निर्माण झाला. हा कालखंड सत्वगुणांचा कळसाध्याय होता असे त्यांनी लिहिले आहे. या काळात माझ्या वडिलांनी अनेकदा तुरुंगवास भोगला व तेथेच त्यांनी आत्मपरीक्षणाची सवय लावून घेतली. दररोज ते भावपरीक्षण करत. त्यांच्या मनात उमलणाऱ्या सर्व विचारांचे आणि भावांचे निरीक्षण करत. या आत्मपरीक्षणातून त्यांना आत्मभान आले व त्यातून आत्मसाक्षात्कार झाला. अशा तऱ्हेने सर्वांनीच आत्मपरीक्षण करायला हवे. 
               ' वसंतसाई सत्चरित्र ' या पुस्तकांमध्ये मी स्वामींनी दिलेल्या जीवन तरंग सिद्धांताविषयी लिहिले आहे. माझ्या वडिलांनी खूप पूर्वीच म्हणजे १९५३ मध्ये हा जीवन तरंग सिद्धांत त्यांच्या डायरीमध्ये लिहिलेला आहे. स्वतःमध्ये परिवर्तन घडवून परमेश्वर प्राप्ती करून घेण्याची त्यांची उत्कंठा आणि निराधार या डायरीमधून आपल्याला दिसून येते. जो स्वतःमध्ये परिवर्तन घडवतो तोच परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो. या जगामध्ये अनेक लोक गीतेच्या अध्यायांचा अभ्यास करतात आणि त्यावर भाष्य लिहितात. तथापि त्यांनी गीतेच्या शिकवणीचे आचरण केले आहे का? माझ्या वडिलांनी गीतेतील प्रत्येक अध्याय व त्यांचे जीवन याचा तुलनात्मक अभ्यास करून या डायरीमध्ये त्यांचे भाव व्यक्त केले आहेत. त्यांनी जे केले आहे तसे जगातील अन्य कोणतीही व्यक्ती करू शकणार नाही. ते म्हणजे एक जिती जागती भगवद्गीताच होते.

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

 🕉️महाशिवरात्री संदेश🕉️


प्रत्येक मनुष्याने प्रत्येक पवित्र उत्सवाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे परंतु सर्व सणांमध्ये महाशिवरात्र हा सण विशेष का मानला जातो?

या दिवशी परमेश्वर तुमच्या अत्यंत जवळ असतो. माघ शुक्ल चतुर्दशीच्या मध्यरात्री दैवी स्पंदने मानवाच्या भोवती, अत्यंत समीप असतात. आपण हा दिवस अत्यंत पवित्र भावनेने व्यतीत केला तर दैवी शक्ती आपल्याला आकर्षित करते.

या जगात दैवी तत्त्वाइतके जवळचे काहीही नाही. कधी कधी आईदेखील काहीशी दूर असू शकते पण दैवी तत्त्व सदैव आपल्या जवळ असते. 

शिवरात्री म्हणजे रुद्रांवर विजय मिळवण्याची रात्र

‘रुद्र’ म्हणजे भयानक. अकरा रुद्रांची रूपं भयप्रद आहेत. ही भयप्रद तत्त्वं मानवामध्ये प्रवेश करून सर्व दुःख, क्लेश आणि चिंता यांस कारणीभूत ठरतात. या रुद्रांना वश करण्यासाठी महाशिवरात्रीची योजना करण्यात आली आहे.

रुद्रांवर नियंत्रण म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. इंद्रिय निग्रह सोपा नाही. आंतरिक आसक्तीमुळे मनुष्य स्वतःच्या दुःखाला स्वतःच कारणीभूत ठरतो.

जर रुद्रांच्या बाह्य प्रभावांवर नियंत्रण ठेवले नाही, तर अंतर्गत रुद्रांच्या प्रभावांवरही नियंत्रण ठेवता येत नाही. ही अंतर्गत प्रवृत्तीच सर्व क्लेशांचे कारण ठरते. म्हणून इंद्रिय निग्रह साधणे अत्यंत कठीण आहे.

३६५ दिवसांपैकी किमान एक दिवस तरी मनुष्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्या एका दिवसातील निग्रहामुळे मानसिक शांती प्राप्त होते आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न सुलभ होतात कारण एका दिवसाचेही इंद्रियसंयमन मनुष्याला मुक्तीच्या साम्राज्याकडे नेऊ शकते. म्हणूनच महाशिवरात्रीची योजना करण्यात आली आहे.

म्हणूनच, जेव्हा आपण संपूर्ण रात्र प्रभूचे नामस्मरण करतो, तेव्हा आपली दृष्टी, श्रवण, वाणी आणि सर्व इंद्रिये परमेश्वरामध्ये लीन होतात.

— सत्य साई बाबांनी ११ मार्च १९९४ दिवशी महाशिवरात्री निमित्त दिलेल्या दिव्य सत्संगातून....

  

 जय साईराम 



    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७८
       
             जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धारण करणारा अर्जुन आहे तेथेच श्री, विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
              कान्हा! तू आणि मी जेथे कुठे एकत्र (बरोबर) असू तिथे उत्कर्ष, विजयश्री, नावलौकिक आणि सदाचरण राहील. तू ये, येऊन माझ्या मनात रहा. गोविंदा, काळोखे मन प्रकाशित होऊ दे. आदिनारायणा, अनंतशयना! भगवान वासुदेवा! कान्हा! प्रभू! या निराधाराने केवळ तुझा आसरा शोधला, आदर करून आशीर्वाद दे. कान्हा! कान्हा! शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७७
       
           हे राजन! श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही पुन्हा पुन्हा आठवण माझ्या मनाला अत्यंत विस्मय वाटतो आहे आणि मी अत्यंत आनंदित होत आहे आणि पुलकित होत आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
             कान्हा! तुझ्या प्रचंड, अतिअद्भुत रूपाचा विचार करकरून हा दिन अति आश्चर्यचकित होईल असे कर. पुन्हा पुन्हा चक्कीत होईल असे कर. श्रीनिवासा! जगदीशा! दिनरक्षका! दयाळा! दयासिंधू प्रभू! या निराधाराचा तू आधार. शरणो शरणम्. कान्हा, कमलनयना तुझ्या  सुवर्णचरणांवर या दुबळ्याला धडकन घालून आशीर्वाद दे. सदा सर्वकाळ केवळ तुझाच विचार करायला लाव. कान्हा! केशवा!

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

 


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            स्वामी म्हणाले," ते स्वतःच दुर्गेला मंगळसूत्र समर्पित करतील." आज ते खरं ठरलं आहे रात्रीतून सर्व तयारी करण्यात आली.

७ फेब्रुवारी २००१ पहाटे ४ वा.

            घड्याळाचा गजर झाला.' ॐ साई श्री साई जय जय साई.' ध्यान व अभिषेक झाल्यानंतर मी, स्वामींनी कुंकवाने आशीर्वादित केलेले त्यांचे पदक घातले. नवीन साडी व नवीन जोडवी घातली. मी माझ्या तिन्ही मुलांना व सुनांना आज घडणाऱ्या घटनेचा संदर्भात सांगितले. संन्यास घेण्यासाठी त्यांनी मला मुक्त करावे असेही मी त्यांना म्हणाले. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. ते म्हणाले," नाही आम्ही तुलाही नाही करू देणार. " ते रडत होते, माझी अर्ज करत होते माझी सून, मनो म्हणाली," तुम्हाला जे हवे ते तुम्ही करा, परंतु मंगळसूत्र काढू नका." मी म्हणाले," ही परमेश्वराची आज्ञा आहे मला ती शिरंसावंद्य मानलीच पाहिजे. केवळ तुम्ही माझी मुले नसून समस्त विश्वातील लोकं माझी मुलं आहेत. इथून पुढे मला त्यांच्यासाठी जगले पाहिजे. तुम्हाला माहित आहे दररोज मला त्यासाठी असंख्य फोन व पत्रे येतात. अनेक लोकं माझा शोध घेत येथे येतात. मला त्या सर्वांसाठी प्रार्थना करायला नको का? मी त्यांना मदत केली पाहिजे. भगवान तुम्हाला मंगल आशीर्वाद देतील जग तुमच्या त्यागाची प्रशंसा करेल. संन्यास घेण्यासाठी मला मनापासून व आनंदाने निरोप द्या.
             एस. व्ही.नी जमलेल्या सर्व लोकांना आजच्या घटने विषयी थोडक्यात सांगितले ते म्हणाले," जगाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णक्षराने लिहिला जाईल. आम्हा संन्यास घेत आहेत. आजचा दिवस विशेष आहे. आज पौर्णिमेचा पवित्र दिन आहे. अम्मांबरोबर बरोबर श्री मनोहरनही संन्यास घेत आहेत. याला आत्मसंन्यास म्हणतात. आत्मसंन्यास म्हणजे जंगलात जाणे व भगवी वस्त्र धारण करणे नव्हे. स्वामींनी त्या दोघांना पती पत्नीच्या वैवाहिक नात्याचा त्याग करण्यास सांगितला आहे. अम्मा त्यांचे मंगळसूत्र काढतील व श्री मनोहर अन ते दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करतील. जगामध्ये असे कधीही घडले नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७५
       
           श्री व्यासांच्या कृपेने हे परमगृह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
             कान्हा, योगेश्वरा मला योगी बनव, संन्यासी बनव. तुझा भक्त बनव. मुमुक्षू बनव. माझ्या हातून केवळ तुझीच कर्म घडू देत. तू मला कर्मसंन्यासी बनव. या पाप्याला पवित्र कर. मला तुझ्या चरणकमलांशी घेऊन जा. मला सदैव तुझ्या गीतामृताचे रसपान करू दे, तुझा उपदेशाचे अमृतपान करू दे. माझ्यामध्ये सद्गुण जोपासले जाऊ देत. हे पद्मनाभा, शेषशयना, माझा आश्रय. शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम