सोमवार, २३ मार्च, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            त्यानंतर आम्ही स्वामींचा फोटो व पादुका घेऊन नागरसंकिर्तन करत गावामध्ये मिरवणूक काढली. मी माझी कृष्णाची मूर्ती बरोबर घेतली. दारातच (लहान मुलगा) मणिवन्ननने माझे पाय धरले वरडत रडत 'मी तुला जाऊ देणार नाही' असे म्हणाला. मी म्हणाले," स्वामींनी मला सांगितले आहे मला गेलेच पाहिजे. ही सर्व माया आहे." माझ्या कृष्णाच्या मूर्तीला, श्री मनोहरनना  व मला हार घालण्यात आले. मी माझ्या कृष्णासोबत जीवन प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी पाऊल उचलले. मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या सुवासिनी ध्यान सभागृहात पोहोचल्या. आम्ही श्री गणेशाला प्रदक्षिणा घालून ध्यान सभागृहाच्या पायऱ्या चढलो. एस. व्ही. नी दूधभात कालवला. कोदाईंनी त्याचे तीन उंडे बनवले आणि मला भरवले. ते खाऊन मी श्री मनोहर यांच्या सह सभागृहात प्रवेश केला.
             रंगीत दिव्यांच्या माळा व फुलांनी सभागृह सुशोभित केले होते. सभागृह इंद्राच्या दरबारासारखे भासत होते. लोक दोन्ही बाजूला बसली होती. व्यासपीठावर मध्यभागी स्वामींचा भव्य फोटो लावला होता. या फोटो त्यांचा उजवा हात चिन्मुद्रेत होता. त्यांच्या अनामिकेचा अग्रभाग अंगठ्यावर दाबला होता व बाकीची तीन बोटी मिटलेली होती. एका भक्ताने याचे सुंदर स्पष्टीकरण दिले. जर एखाद्याने तिन्ही गुणांवर नियंत्रण मिळवले तर जीव आणि शिव यांची मिलन होते. हे मुक्ती स्थळ आहे ती महिला भक्त म्हणाली, आम्हा तुम्ही तिन्ही गुणांवर विजय मिळवला आहेत. तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला आहे आणि तुमचा भगवानांची योग झाला आहे.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा