गुरुवार, १४ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           आता पान ११७,
           .....सावित्री त्याला वाकून नमस्कार करते वहात जोडून त्याच्या पाया पडते.
           त्याच्या गळ्यात माळ घातल्यानंतर ती हे करते. पुन्हा स्वामींनी अधोरेखित केले,
           ....सत्यवान आणि तिला आपल्या कवेत घेतले. नदी जशी महासागरात विलीन व्हावी त्याप्रमाणे तिचे अस्तित्व त्याच्यात विलीन झाले हे सावित्रीला जाणवते.
             या ओळींच्या आधी पुस्तकात लिहिले आहे,' सावित्री गाडीतून खाली उतरते, फुले गोळा करते त्वरित एक माळ गुंफते व सत्यवानाच्या गळ्यात घालते. नंतर ती त्याच्या पाया पडते.' हे माझ्या जीवनात घडेल. स्वामी येतील, मला बोलावतील. आम्ही त्यांच्याकडे गाडीने जाऊ. कारमधून उतरू. स्वामी आमची स्वागत करतील. विलात करीत, अश्रू ढाळत मी त्यांच्या पवित्र चरणांवर नतमस्तक  होईन. स्वामी मला उचलतील आणि आलिंगन देतील. त्यावेळी मला जाणवेल, ' नदी जशी सागराला जाऊन मिळते त्याप्रमाणे माझ अस्तित्व "त्या' च्या मध्ये वाहून गेले. ७३ वर्षांनी ही तळमळ आहे! किती दुःख? किती यातना? विभक्त करताना येणारे जुळे. आम्ही विभक्त झालो, हे यातून दिसून येते. वियोगानंतर आमच्या मिलनाचा हा पहिला दिवस असेल. आम्ही जागतिक करणे वाहत आहोत आणि विश्वमुक्तीसाठी दीर्घकाळ वियोग सहन करीत आहोत. केवळ त्या दिवशी आम्ही आमची पूर्णम् अवस्था प्राप्त करू. आदी पुरुषापासून दूर गेलेल्या शक्तीचे ' त्या' च्याशी मिलन होईल.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा