गुरुवार, ७ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

             आमच्या विवाहाच्या वेळी स्वामींना सर्व काही माहीत होते. मला भगवंताशी विवाह करायचा होता. तथापि भूलोकावर हे शक्य नाही असे मला माझ्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी मला तीन मुलगे सुचविले व एकाची पसंती करायला सांगितले. माझ्या नकळत मी स्वामींना पसंत केले. त्यांनी माझ्याशी वेगळ्या रूपात विवाह केला. जरी रूपे बदलली तरी भगवान व शक्ती हे आमची सत्य आहे; आत्मा अपरिवर्तनीय आहे. दोघांमधील अंतर नाहीसे झाले. दोन हृदयांचा संयोग झाला; परंतु माझे मन अशांत होते. अजूनही मला वाटत होते," आम्हा दोघांमध्ये अंतर आहे!"

            २००१ मध्ये स्वामींनी मला ' पुट्टू मांगल्य ' करून ते व्हाईटफील्डच्या वृंदावनला घेऊन यायला सांगितले. स्वामींनी मांगल्य हस्त स्पर्शाने आशीर्वादित केल्यानंतर मी ते गळ्यात घातले. केवळ त्या क्षणी आमच्या मधील अंतर गळून पडले. अंतरीची खून पाठवून माझा जीव त्यांच्या जीवात गाड प्रेमाने विसावला. यानंतरच आमचा खरा प्रवास सुरू झाला.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा