रविवार, २८ जून, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            परंतु तिच्या बरोबरीने उभा राहू शकेल असा एकही तुल्यबळ सोबती नसतो. तिला तिच्या उच्च पातळीवरून खाली वाकून सर्वांना सांभाळावे लागते व त्यांच्या आत्म्यांना मातीच्या ममतेने कवटाळावे लागते. ती मात्र अंतरी एकटीच, एकाकी राहते.
 
          हे माझ्या अवस्थेशी तंतोतंत जुळते. या आश्रमात अगदी थोडे लोक आहेत. अत्यल्प व्यक्तींनी माझ्या हाकेला प्रतिसाद दिला. आहे इतर इथे येऊन शकत नाहीत. इथे वास्तव्य करण्यासाठी अनेक आले पण दीर्घकाळ राहू शकले नाहीत. याचे कारण हे स्थळ अतिशय शक्तिशाली आहे. इथे स्वामींचे अवतार कार्य घडत आहे. त्यामुळे इथे वास्तव्य करणे अति कठीण आहे.
 


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा