मंगळवार, ९ जून, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            उद्घाटन समारंभाची वेळी भगवानांनी आमच्यावर भरभरून  कृपावृष्टी केली. पूर्ण होती देताना स्वामींच्या खुर्चीवरील कमळ खाली पडले. वेदिकेवर ठेवलेल्या सात पादुकांच्या जोड्यांवर विभूती व तेल साक्षात झाले.  तेलाचे सृजनीकरण कर्मसंहाराचे घटक आहे. जे लोक ह्या ठिकाणी या ध्यान सभागृहात येतील त्यांच्या कर्मांचा नाश होईल व त्यांना मुक्ती प्रदान केली जाईल. हे दर्शविण्यासाठी दोन दिवस तेल सुजित झाले. भगवान म्हणाले जसे पक्षांचे प्राण्यांचे आश्रयस्थान असते तसे साई गीतालयम सभागृह लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे.
             भगवान यांनी या उद्घाटन समारंभासाठी तई पूसम पौर्णिमेचा दिवस निवडला. हा एक शुभ योगच म्हणायचा! ह्या पवित्र दिनी संत वल्लालर सर दिव्य तेजा मध्ये विलीन झाले. अंडाळ आणि वल्लालर  प्रमाणे मलाही लहानपणापासूनच परमेश्वरामध्ये सदेह विलीन व्हायचे आहे. मी नेहमी ह्यासाठी प्रार्थना करते. या आमच्या संयोगासाठी स्वामींनी हाच दिवस निवडल्याचे आताच मला ज्ञात झाले. ते म्हणाले की ह्या तई पूसम दिवशी माझा त्यांच्याशी सदेह संयोग होईल. मी म्हणाले," तई पूसम हा दिवस साई गीतालयमचा उद्घाटन दिन आणि आमचा विवाह दिन म्हणून साजरा केला जाईल."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, ७ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            मी स्वामींच्या एका दृष्टीक्षेपासाठी, एका स्पर्शासाठी, एका शब्दासाठी तळमळते आहे. स्वामींनी लाखो लोकांना दर्शन, स्पर्श, संभाषण दिले आहे; ते मला हे देऊ शकत नव्हते का ? हे अवतार कार्य आहे. हे असंच व्हायला हवे. यामुळे त्यांचे प्रेम व जवळीकीसाठी मी कासावीस आहे. हे मला न मिळाल्यामुळे मी जग बदलण्याची शपथ घेतली. या अवतारकाळात स्वामींनी जे काही केलं ते त्यांना प्रेमावतार काळात आल्यानंतर अनुभवावेच लागेल. आता ते मला हुरहुर लावतात, तेव्हा त्यांना माझ्या प्रेमाचा ध्यास लागून राहील. हा कर्म कायदा आहे भगवान स्वतः या कायद्याची प्रात्यक्षिक करतो.

           द्वैत सर्वांचे मूळ आहे. सर्वाभूती परमेश्वर आहे. जेव्हा मानवाला हे उमजते तेव्हा त्याचे दुःख निवते, दुःख त्याला स्पर्श करू शकत नाही, तू जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम