गुरुवार, १६ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            पृथ्वीवरील सुखांमुळे तुला परमेश्वरी आनंदाचा लाभ होत नाही. म्हणून दुःख आणि वेदनांची गरज निर्माण होते. दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय या अज्ञानी जगात आनंद मिळू शकत नाही. मानवाच्या हृदयात असलेल्या विरोधाचा भंग करण्यासाठी देव दुःखाचा हातोडा वापरतो. या दबावाशिवाय मानवाचा आत्मा सुखातच संतुष्ट राहील. माणूस जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत दुःख आणि वारी आहे. ज्याला जगाचा उद्धार करावयाचा आहे, त्याला दुःख भोगलेच पाहिजे. देव जेव्हा मनुष्य रूपात पृथ्वीवर अवतार घेतो तेव्हा त्यालाही हाच नियम लागू होतो.

              जग म्हणजे हाल अपेष्टा. जगात हे स्वाभाविक आहे. मानवाला हे उमजलं की तो दुःख व यातनांमधून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधू लागतो. माणूस सहजपणे दुःख, यातनांचा स्वीकार करतो व दुसऱ्यांना उपदेश करतो," जग हे असंच असतं! संसारी जीवन असच असणार!" अशा तऱ्हेने बोलून, त्यांनी स्वतःच्या सहजपणे सर्व स्वीकारले तसं दुसऱ्यानेही स्वीकारावी म्हणून त्याला समजावून सांगतो! हजारांत एखादा चिंतन करतो. त्या हजारात अगदी एकच त्याला उमजलेले आचरण आणतो! तो म्हणतो,' मला हे यातनामय संसारी जीवन नको! माझे दुःख दूर करण्याचा मार्ग कोणता? यातून मुक्त कसे व्हावे?"


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा