रविवार, २४ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           अरविंदांनी हे सगळं कसं बरं लिहिले ? त्यांनी जे काही लिहिले आहे ते सर्व माझे जीवन दर्शविते. मला याचे अतिशय आश्चर्य वाटते. आमची भविष्यात होऊ घातलेली पहिली भेट सुद्धा त्यांनी सुचित केली आहे. या भूतलावर जन्मास असलेली ही वसंत सरिता अथक धावत राहिली. ती अखेरीस साई सागरास मिळाली. तिचा उगम जेथून झाला तो स्त्रोत तिने प्राप्त केला. ७३ वर्षानंतर स्वामी मला बोलावतील आणि मी कोण आहे हे सर्व जगास दाखवतील.
            आपण पान नं. १२५ पाहूया,
            .....आमच्या आयुष्याचा जन्मच वेदनेतून होतो व रडतच आम्ही जन्मतो. आमच्या ठाईसहारक शक्तींचा वास असतो. आम्ही एखाद्या वेढलेल्या किल्ल्याप्रमाणे असतो. मानव जातीलाच काहीतरी शाप आहे अगदी जन्मापासून त्यांच्यावर द्वंद्वात्मक परिस्थिती लाभलेलीच असते. प्रत्येक पावलावर एक फास असतो. चुका आणि दुःख गुणाकाराने वाढतच असतात.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा