गुरुवार, २३ जानेवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " मनुष्याच्या प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यामधून त्याच्यातील देवत्व प्रतिबिंबित झाले पाहिजे. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १, श्लोक - १२
 
           नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी दुर्योधनास आनंदित करत सिंहाप्रमाणे गर्जना करून शंख फुंकला.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
            कान्हा! या क्षुद्र जिवामधील चांगले आणि वाईट गुण युद्धास सज्ज होऊन या गुणांच्या सेना कवायत करत शंख फुंकत आहेत. सर्वेशा! ये! येऊन माझ्या बाजूने तू तुझ्या दिव्य पांचजन्य शंखाचा नाद कर. तू दूत झालास, खांबातून प्रकट झालास! या क्षुल्लक काटकीला रक्षण देऊन उद्धार कर. कान्हा, कृष्णा  जलकिरिटी! मेघ:शामा! तूच माझा आसरा आहेस. शरणो शरणम्

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा