गुरुवार, २३ जानेवारी, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
स्वामी - तू माझी शक्ती  असल्याचेही मांगल्य जगाला दर्शवले हे स्वाक्षरी होऊन अधिक मोठे प्रमाणपत्र नाही का?
वसंता - स्वामी माझ्या मनात शंका आहे. लोक म्हणतील, यात काय विशेष आहे ते अनेकांना मांगल्य देतात.
स्वामी - मी इतरांना मांगल्य देतो जेव्हा त्यांचा विवाह निश्चित होतो. ते त्यांच्यासाठी नवे नाते निर्माण करते. तुला मी जे मांगल्ये दिले ते तुला सर्व बंधातून मुक्त करण्यासाठी, तुझ्या आणि माझ्या मधील बंध दर्शवण्यासाठी आणि तुला अन्य कोणतेही बंध नाहीत हे दर्शवण्यासाठी.
          कोणाचाही जीवनात अशी घटना कधी घडली आहे का? स्वामींनी मला सर्वसंग परित्याग करून संन्यास घेण्यास सांगितला. पुस्तक प्रकाशित करण्यास व परमेश्वराचे मांगल्य घालण्यास सांगितले. माझे आश्रमातील जीवन सुरू  करण्याच्या दृष्टीने स्वामींनी सर्व व्यवस्था केली. सगळं कसं सुसंगत्व परिपूर्ण आहे! हे सगळं लिहून झाल्यानंतरच माझे अश्रू थांबले.
            त्यानंतर मी चार दिवस गुलाब करत होते व प्रार्थना करत होते," जगातील सर्व लोकांना जोपर्यंत दिव्य आनंदाचा लाभ होत नाही तोपर्यंत मलाही दिव्य आनंद नको आहे." पाचव्या दिवशी स्वामींनी मला ध्यानात सांगितले," ब्रम्हरंध्र अवस्थेच्या भगवद् भावातील तुझ्या दिव्य आनंदाची स्पंदने तयार होऊन जगामधील सर्व दुःखांचा नाश करतील. सर्वांना दिव्य आनंद मिळेपर्यंत तुला आनंद नको असे तू म्हणतेस जर तू या अवस्थेत स्थित राहिलीस तर प्रत्येकाला स्पंदनांचा लाभ होईल व त्यांच्या कर्मांचा नाश होईल. तुझी करुणा व त्याग जगामध्ये परिवर्तन घडवेल.
            स्वामींनी जे सांगितले ते मला थोडेफार समजले आणि त्याने माझ्या मनाला शांती लाभली.
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा