गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

          परमेश्वराला आपण काय समर्पित करतो हे महत्वाचे नसून कसे समर्पित करतो हे महत्वाचे आहे. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - १६

 
          कुंतीपुत्र राजा युधिष्टिराने आपला अनंतविजय नामक शंख फुंखला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख फुंकले.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे पद्मनाभा, या पाप्याला शुद्ध आणि पवित्र बनव. त्याला सत्याचा अनुयायी बनव. त्याला अहिंसेचा पुजारी बनव. तुझ्याशिवाय या अनाथाचा नाथ कोण ? माझ्यावर तुझी सदैव दृष्टी राहू दे. तुझ्या कृपेचा वर्षाव कर. माझ्या मनातील सामान्य विचारांचा विध्वंस होऊन तिथे उच्च विचार जागृत होऊ देत. गोविंदा, तूच माझा आश्रय! शरणो शरणम्
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा