शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
             स्वामी म्हणाले," युधिष्ठिराखेरीज सर्व पांडवांनी स्वर्गाच्या वाटेवरच देह त्यागले. फक्त युधिष्ठिरच सदेह स्वर्गाला गेले. तू ही सदेह स्वर्गाला जाशील. धर्माचरण केल्यामुळेच त्याला हे शक्य झाले तू हे भक्तीने प्राप्त करत आहेस. धर्माचरण केल्याने विपुल प्रमाणात सुजनता प्राप्त होते. युधिष्ठिराने व्यक्तिगत जीवनात खूप दुःख सोसले. त्यांच्या दुःखाच्या तुलनेत आपले दुःख काहीच नाही. ते राजा असूनही त्यांना त्यांच्या बंधू व पत्नीसह वनात पाठवले. त्यांच्या बारा वर्षांचा वनवासानंतर त्यांना अजून एक वर्ष अज्ञातवासात राहावे लागले. जर त्या वर्षात कोणी त्यांना पाहिले असते तर पुन्हा बारा वर्षे त्यांना वनवास भोगाव लागला असता. एवढेच नव्हे तर जेव्हा हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नीची विटंबना करण्यात आली तेव्हाही त्यांनी क्रोध व्यक्त केला नाही. त्यांनी शांतपणे सर्व दुःख सोसली. ते धर्माशी एकनिष्ठ असल्यामुळेच ते सदेह स्वर्गाला जाऊ शकले."


२१ जानेवारी २००१ प्राप्त ध्यान.
             स्वामी आणि मी स्वर्गात गेलो. मी आत गेले. तेथे इंद्र, इंद्राणी व इतर काही देव होते. मी म्हणाले," हे देवांचे अधिपती, मी संन्यास घेणार आहे. मला आशीर्वाद द्या. भगवानांप्रत पोहोचणे हेच माझे एकमात्र ध्येय आहे. केवळ याच कारणासाठी मी संन्यास घेत आहे. मला अन्य काही नको. मला आशीर्वाद द्या." मी सर्वांना वंदन केले इंद्रानी मला आशीर्वाद दिले व म्हणाले," तुमची मनोकामना पूर्ण होईल." सर्व स्वर्गीय देवांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली. मी पुन्हा प्रार्थना केली." सर्वांना मुक्ती मिळायला हवी." स्वामी आले सर्वांनी स्वामींना नमन केले. त्यानंतर स्वामी आणि मी परतलो.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा