गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम, वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २६ 
 
          हे अर्जुना! जेवढे म्हणून चर आणि अचर प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात. हे जाण.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा! स्थावर असो वा जंगम, जन्मात येणारा प्रत्येक जीव क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून उत्पन्न झाला आहे. हे ज्ञान तू या मूढमतीला दे. तीन पावलात विश्व व्यापणाऱ्या. बामना गलोलाने मडकी फोडणाऱ्या बालकृष्णा, तू पांडवांचा दूत झालास. पद्मनाभा, करुणामया पाप्याला तुझा चरणपुष्पांवर स्वीकारून दुवा दे. तुझ्याविना मी अगतिक आहे. प्रभू! माय, बाप, गुरु, देव सर्व काही तूच! तुझाच भरवसा केला. कृपा कर कृष्णा.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा