रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम, वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २५ 
 
          अध्यात्मिक ज्ञानाविषयी अनभिज्ञ असणारे काहीजण तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकून तद्नुसार उपासना करतात. ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग खात्रीने पार करतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, मला वेद माहित नाहीत. मी ते इतरांकडून ऐकले आहेत. तरीही त्यांची भक्ती भावाने आराधना करून मी मृत्यूवर विजय मिळवेन. हे सप्तगिरींच्या पल्याड वास करणाऱ्या व्यंकटेशा, तू नित्य नर्तन करतोस. मला क्षणोक्षणी तुझी भक्ती करावीशी वाटते. ती भावना माझ्यामध्ये निर्माण कर. हे ईश्वरा, मला तुझा भक्त बनव. या पाप्याच्या पापांचा संहार कर. प्रभू, कान्हा, परमेश्वरा, परमदयाळा, तू माझा आश्रयदाता आहेस.शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा