गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
             माझ्या वडिलांच्या डायरीच्या शेवटच्या पानावर त्यांनी एक आकृती काढली आहे. जी स्वामींनी माझ्या डायरीत काढलेल्या जीवन तरंग सिद्धांताशी मिळतीजुळती आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवनाची मीमांसा करताना याचा कसा वापर केला आहे ते आपण पाहूया.
 
 
 
            आ. वा. वा. मधुरकवी आळ्वार जन्म.
            आनंद (वर्ष) वैकाशी महिना २२ दि. गुरुवार  ४-६-१९१४ एकादशी सिद्धीयोग
             माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवनातील चढउतारांची मीमांसा करताना, त्यांना गीतेतून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग केला आहे. त्यांच्या या जीवन तरंग सिद्धांतात ते सांगतात की त्यांच्या जन्मापासून म्हणजे १९१४ ते १९१८ त्यांचे जीवनसत्व गुणांनी युक्त होते. तरुणपणी ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. त्यादरम्यान त्यांच्या मनात गांधीविषयी, देशाविषयी व परमेश्वराविषयी अपार पूज्य भाव निर्माण झाला. हा कालखंड सत्वगुणांचा कळसाध्याय होता असे त्यांनी लिहिले आहे. या काळात माझ्या वडिलांनी अनेकदा तुरुंगवास भोगला व तेथेच त्यांनी आत्मपरीक्षणाची सवय लावून घेतली. दररोज ते भावपरीक्षण करत. त्यांच्या मनात उमलणाऱ्या सर्व विचारांचे आणि भावांचे निरीक्षण करत. या आत्मपरीक्षणातून त्यांना आत्मभान आले व त्यातून आत्मसाक्षात्कार झाला. अशा तऱ्हेने सर्वांनीच आत्मपरीक्षण करायला हवे. 


संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा