रविवार, १ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २७ 
       
           यज्ञ तप आणि ज्ञान यामध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत् असे म्हटले जाते आणि परब्रम्हाच्या संतुष्टी प्रीत्यर्थ केलेल्या कर्मानाही सत् असे म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
              
           कान्हा! या हीनाला यज्ञ, तप आणि दान यामध्ये दृढश्चित्त कर. तुझ्यासाठी सत्कर्म करायला लाव. वैकुंठवासुदेवा! वराहवतारा! वामना! याला तुझ्या चरणी स्वीकारून त्याची कल्याण कर. कान्हा! तूच आधार प्रभू! शरणो शरणम्. नीचाला त्वरेने तुझ्या चरणी घे. प्रभू! शरणम्

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा