ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
'वसंतसाई सत्चरित्र ' या पुस्तकामध्ये मी स्वामींनी दिलेल्या जीवन तरंग सिद्धांताविषयी लिहिले आहे. माझ्या वडिलांनी खूप पूर्वीच म्हणजे 1953 मध्ये हा जीवन तरंग सिद्धांत त्यांच्या डायरीमध्ये लिहिलेला आहे. स्वतःमध्ये परिवर्तन घडवून परमेश्वर प्राप्त करून घेण्याची त्यांची उत्कंठा आणि निर्धार या डायरीमधून आपल्याला दिसून येतो. जो स्वतःमध्ये परिवर्तन घडवतो तोच परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो. या जगामध्ये अनेक लोक गीतेच्या अध्यायांचा अभ्यास करतात आणि त्यावर भाष्य लिहितात. तथापि त्यांनी गीतेच्या शिकवणीचे आचरण केले आहे का? माझ्या वडिलांनी गीतेतील प्रत्येक अध्याय व त्यांचे जीवन याचा तुलनात्मक अभ्यास करून या डायरीमध्ये त्याचे भाव व्यक्त केले आहेत. त्यांनी जे केले आहे तसे जगातील अन्य कोणतीही व्यक्ती करू शकणार नाही. ते म्हणजे एक जिती जागती भगवद्गीताच होते.
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा