रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७८
       
             जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धारण करणारा अर्जुन आहे तेथेच श्री, विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
              कान्हा! तू आणि मी जेथे कुठे एकत्र (बरोबर) असू तिथे उत्कर्ष, विजयश्री, नावलौकिक आणि सदाचरण राहील. तू ये, येऊन माझ्या मनात रहा. गोविंदा, काळोखे मन प्रकाशित होऊ दे. आदिनारायणा, अनंतशयना! भगवान वासुदेवा! कान्हा! प्रभू! या निराधाराने केवळ तुझा आसरा शोधला, आदर करून आशीर्वाद दे. कान्हा! कान्हा! शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा