रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७५
       
           श्री व्यासांच्या कृपेने हे परमगृह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
             कान्हा, योगेश्वरा मला योगी बनव, संन्यासी बनव. तुझा भक्त बनव. मुमुक्षू बनव. माझ्या हातून केवळ तुझीच कर्म घडू देत. तू मला कर्मसंन्यासी बनव. या पाप्याला पवित्र कर. मला तुझ्या चरणकमलांशी घेऊन जा. मला सदैव तुझ्या गीतामृताचे रसपान करू दे, तुझा उपदेशाचे अमृतपान करू दे. माझ्यामध्ये सद्गुण जोपासले जाऊ देत. हे पद्मनाभा, शेषशयना, माझा आश्रय. शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा