गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           आता आपण यासंबंधी पाहुयात. जन्मल्या क्षणापासून मानवास विरोधाला तोंड द्यावे लागते. विरोधाला सुरुवात होते व तो वाढत जातो. हा विरोध आणि झगडा किती शेकडो वाटांनी व ठिकाणाहून बंड करतो! कोण आहे हा शत्रू? म्हणून चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ते आपलेच वाईट विचार आहेत. आपण जन्मल्याबरोबर ते येतात व आपल्या विरोधात उभे ठाकतात. आपली संस्कारात आपले शत्रू आहेत. कोणतेही नवीन शत्रू उड्या मारून आपल्यासमोर उभे ठाकत नाहीत. सर्व काही आपलेच भावविश्व आहे. आपण शरीर धारण करून जन्मल्याक्षणी ते आपला पाठपुरावा करू लागतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे महान संतांनी घोषित केले आहे व स्वामींनी याची शिकवण दिली.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा