रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

 

 

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           ज्या स्वामींनी देह सोडला ते माझ्या अश्रूंमुळे व विलापाद्वारे परत येतील. त्यांना हे कार्य एकाच देहाद्वारे सिद्धीस नेता येणार नाही का? पुन्हा देह कशासाठी? पहिला देह, त्यांनी जागतिक कर्मांसाठी सोडलेला देह आहे हे सूचित करतात. इतक्या टोकापर्यंत त्यांनी सहन करायला हवे! आता स्वामी नूतन देहांत येतात. सत्ययुगात प्रेम साई अवतरेल. हे खूप मोठे, प्रचंड कार्य आहे. हे कार्य एका अवताराच्या काळात पूर्ण होणारे नाही. म्हणून भगवान एका मागोमाग एक चार अवतार घेतो. हे पूर्वी कधी घडलेले नाही. परमेश्वराची पूर्ण शक्ती, ताकद पृथ्वी सहन करू शकणार नाही. म्हणून तो एक अवतार धारण करून अवतरीत होऊ शकत नाही म्हणून तो स्वतःच चारात विभागून अवतरतो. तो अवतार कार्याचे उल्लंघन करू शकत नाही व कर्मकायद्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तो परिपूर्ण स्वरूपात येऊ शकत नाही. म्हणून त्याने चार अवतार धारण करून अवतरण्याची योजना आखली.
             स्वामींनी परत त्याच पानावर अधोरेखित केले.....
या पृथ्वीच्या अस्तित्वातच एक दडलेली अंधारी विरोधी शक्ती आहे व ती जगाच्या प्रत्येक पावलागणिक विरोध करते. शेकडो ठिकाणी शेकडो वेळा संघर्ष करून मानवाला या विरोधी शक्तीला हरवावे लागते. ही शक्ती चुकीच्या मार्गाने नेते, विकृत बनते व मानवाचा पाडावा करते. या दडलेल्या शत्रूवर मानवाला विजय मिळवायलाच हवा.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा