गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

 

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           ऑपरेशन आणि परमेश्वरावर? पूर्वीच्या युगांमध्ये असं काही घडलेलं आपण ऐकला आहे का? भगवान, जो अवघ्या जगाचा प्रतिपाळ करतो, त्याच्यावर शस्त्रक्रिया केली! हे सर्व कशासाठी? का? हे कसं काय? जगाला सुरक्षित ठेवणाऱ्या भगवंताला या जगाचे दुःख सोसलेच पाहिजे. जगाच्या दुःखात सहभागी व्हायला हवे. हा अवतारकायदा आहे. स्वामी कर्मकायदा बदलू शकत नाहीत.
            अवतरीत अवताराने दुःख भोगलेच पाहिजे. भवसागराची दुःखे पाहून संत महंत भगवंताची प्रार्थना करतात. देव व ऋषीगण त्यांची प्रार्थना ऐकून भगवंताला विनंती करतात. केवळ महाविष्णू संरक्षक देव आहेत, म्हणून ते त्याची प्रार्थना करतात. या कारणासाठीच महाविष्णू अवतार घेतो. तो जेव्हा जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा त्याला अत्यंत क्लेश सोसणे भाग असते. आताचे कार्य खूप व्यापक आहे म्हणून हा महोत्तम अवतार प्रचंड प्रमाणावर कार्य करत आहे. प्रथम शिर्डी बाबा म्हणून येऊन त्याने पायाभरणी केली; नंतर सत्यसाई म्हणून अवतरला. शिर्डी बाबा शिवा अवतार होता; तर सत्यसाई शिवशक्ती अवतार म्हणून त्याने मलाही रूप देऊन आणले. त्यांच्यापासून झालेल्या ताटातुटीने मी अश्रू ढाळत आहे, विलाप करतेय. मी जागतिक कर्माचा भार वाहते व आम्ही दोघं सोसतोय. 



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम