गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           जर आपण भलाई केली तर आपल्याकडे चांगले येते. आपण बुराई केली तर वाईटच आपला पाठपुरावा करेल. हे आपण स्वतः लिहिलेले व लिहीत असलेले विधिलिखित आहे. आपण आपल्या आचार, विचार व उच्चारातून फक्त चांगलेच केले पाहिजे. स्वामींनी सातत्याने ८४ वर्षे याची शिकवण दिली. आता महर्षी अरविंदांनी नाविन्यपूर्ण रीतीने हे लिहिले आहे. पुस्तकात सर्व काही स्वामींनी अधोरेखित केले व मला लिहायला सांगितले. सर्व सारखेच आहे. अरविंदांनी स्वामींच्या अवतार कार्याबद्दल आधीच लिहिले आहे. मानवाची गहिरे ठसे त्याला कुमारगांवर घेऊन जातात. अखेरीस, मनुष्य यावर मात करतो. म्हणूनच खरा शत्रू कोण हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. प्रत्येक माणसाने या गुप्त शत्रूवर ताबा मिळवून त्याचा पराजय करायला हवा.
          परमात्म सत् चरित्र भाग १४ या पुस्तकातील आत्म सोबती या नव्या अध्यायाच्या शेवटच्या उतारातून खालील भाग घेतला आहे.
           स्वामींनी अरविंदांच्या सावित्री पुस्तकातील पान १०३ वर काही लिहिले व काही भाग सुचविला. 
           पृथ्वीची सुज्ञता सावित्रीच्या स्थिर मनाशी हितगुज करते. तिचे मन विचारांचा पलीकडे उडी घेते व मानवासाठी अज्ञात आणि अनंत असणाऱ्या नव्या क्षितिजाचे दरवाजे उघडते.
           ती सभावतालच्या सर्वांना आपल्या कवित घेते व त्यांना दिव्यत्वाकडे नेण्यासाठी सिद्ध होते.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा