रविवार, १७ एप्रिल, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " जन्माआधी भाव अवकाशामध्ये निराकार अवस्थेमध्ये भरून राहिलेले असतात व ते योग्य पात्र, वेळ, स्थान आणि मातापिता यांचा शोध घेतात. एकदा का भावनांना योग्य ते पात्र मिळाले की आत्मनिवासी परमेश्वर त्यामध्ये प्रवेश करतो."

प्रकरण दोन 

अंकुर

" मी कृष्णाखेरीज अन्य कोणाशीही विवाह करणार नाही."

                 आमच्या गावात फक्त पाचवीपर्यंत शाळा असल्यामुळे दहाव्या वर्षी शिक्षण संपत असे. पुढील शिक्षणासाठी मुलांना शहरात पाठवले जाई. मी पाचवीत गेले तेव्हा माझे वडील तुरुंगात होते. मला मदुराईच्या शाळेत घालण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांना माझ्या आईला मदत करण्यास सांगितले. मी OCPM हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मला होस्टेलमध्ये रहावे लागले. यापूर्वी मी घरापासून दूर कधीच राहिले नव्हते. या नव्या विश्वात मला फार एकाकी वाटू लागले. 
                 ज्युनियर होस्टेलमध्ये मुले, माझ्या जाड्याभरड्या गोणपाट्यासारख्या खादीच्या कपड्यांकडे पाहून मला चिडवत असत. ते म्हणत, " अच्छा, तू त्या पंचा नेसणाऱ्या गांधींची अनुयायी आहेस नाही का !" त्यामुळे माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला. मुलांनी चिडवले की मी रडत असे. धोब्याकडून कपडे आले की मुले माझे कपडे धरून ओरडत, " हा जुना गोणपाट कोणाचा ? अरे हा तर त्या रडूबाईचा !" 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा