रविवार, ३० मार्च, २०२५

 


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " प्रवाहाबरोबर जाऊन आनंदाची प्राप्ती करून घ्या. परमेश्वराला त्याच्या इच्छेनुसार तुमचे जीवन नियंत्रित करू द्या. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक -११

 
          श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना! ज्याचा शोक करू नये, अशा माणसांसाठी तू शोक करतो आहेस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतो आहेस. ज्ञानीजन जीवित्ताबद्दल वा मृतांबद्दल शोक करत नाहीत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
          
          हे पांडवांच्या दुता, तू कर्माचा तराजू समतोल करतोस. हे निरंजना, नृसिंहा, मला सन्मार्गावर घेऊन जा. कावेरीतटवासी श्रीरंगा, तू करुणामय आहेस. श्री रामाने तुझी भक्ती केली. तू मला तुझ्या चरणीकमली घे, हे कान्हा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम् ! जरी इतरांनी माझ्याविषयी अनास्था दाखवली तरी मला त्यांच्याविषयी आस्था वाटते. याचा मला मनस्ताप होतो. तू माझे सर्व दुःख दूर कर. मी अजाण आहे, अज्ञानी आहे. मला आत्मज्ञान दे आणि मृत व जीवित व्यक्तींकडून मला होणारे दुःख दूर कर. ज्ञान मिळाल्यानंतर मी त्यांची चिंता करणार नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू निश्चित असतो. माझ्या मृत्यूनंतर तू मला तुझ्या चरणकमलांशी घेऊन जा.

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २७ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " तुम्हाला परमेश्वरापासून दूर करणारी प्रत्येक गोष्ट माया आहे. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक -९

 
          संजय म्हणाला, हे राजन! निद्रेला जिंकलेल्या अर्जुनाने ऋषिकेशला ' मी युद्ध करणार नाही' असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प बसला.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे कृष्णा! मला युद्ध करायचे नाही. मी एक अतिक्षुद्र जीव आहे. मला योग्य मार्ग दाखव. मला हात पाय नाहीत मी अपंग आहे. माझा स्वीकार कर आणि माझ्यावर कृपेचा वर्षाव कर. मी लुळापांगळा आहे. तुझ्याविना मी काहीही करू शकत नाही. तू मला तुझ्या छत्रछायेखाली घे. मला आसरा दे. शरणो शरणम्. तुझ्या चरणकमली स्वीकार कर. मला तुझा भक्त बनव. कान्हा, वासुदेवा, मला विवेक आणि वैराग्य प्रदान कर.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २३ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " प्रथम भाव निर्माण होतात, त्यानंतर त्याचे विचार बनतात. त्यावर कृती करण्या अगोदर विवेकाचा वापर करा. विचार करा, हे सत् कृत्य आहे का ? परमेश्वर प्राप्तीसाठी मला हे सहाय्य करेल का ? "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक - ८

 
          जरी मला पृथ्वीवरील वैभवशाली राज्य वा सार्वभौमत्व प्राप्त झाले किंवा देवांचे स्वामित्व प्राप्त झाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल, असा उपाय मला दिसत नाही.
         कर्माचे कोणतेही फळ असो माझ्या वडिलांप्रमाणेच मलाही ते नको असायचे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे प्रभू, तू माझे प्राप्तव्य आहेस. तरीही जर मला या सृष्टीतील वस्तूंची इच्छा असेल तर माझ्या इंद्रियांची भूक कधीच मिटणार नाही. देवाधिदेवा, हे कृष्णा, या जन्मात मला तुझी भक्ती दे. माझ्या मनाला सतत तुझाच विचार करण्याची बुद्धी दे.
          आपल्या पंचंद्रियांची तृप्ती कधीही होत नसते हे माझ्या वडिलांनी यामधून दर्शवले आहे.

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २० मार्च, २०२५

 


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

" परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक -४७

 
          संजय म्हणाला, रणांगणावर दुःखाने उद्विग्र झालेला अर्जुन एवढे बोलून धनुष्यबाण खाली टाकून रथाच्या मागील भागात जाऊन बसला.

          हा श्लोक वाचल्यानंतर------
          माझ्या वडिलांनी सांगितले की ते जिथे दृष्टी फिरवतील तिथे सर्वत्र अंधःकार होता. त्यांना मार्गही माहित नव्हता. त्यांनी वामनाला भगवंताच्या चरणकमलांशी घेऊन जाण्याची विनंती केली. अर्जुनाच्या बाबतीत जे घडले ते सर्व त्यांच्या बाबतीत घडते आहे असे त्यांना वाटले. जर आपण माझ्या वडिलांचे आणि अर्जुनाचे शब्द यांची तुलना केली तर ते स्वतःच अर्जुन बनल्याचे आपल्याला आढळेल. अशा तऱ्हेने ते गीतेतील प्रत्येक श्लोक वाचत व स्वतःच अर्जुन बनत. ते अर्जुनाप्रमाणे अश्रू ढाळत. हे दर्शवणारी एक गोष्ट पुढे देत आहे.

           कुलशेखर आळ्वार हा एक महान राजा होऊन गेला. त्याच्या दरबारात एक धर्मगुरू रामायणाचे वाचन व कीर्तन करीत. एक दिवस त्या धर्मगुरूंनी राम रावण युद्धाचा प्रसंग सांगण्यात सुरुवात केली. ते ऐकताक्षणीच त्या राजाने मंत्र्यांना बोलावून आपले सैन्य युद्धासाठी सज्ज करण्यास सांगितले. त्या कथेशी एकरूप झालेला राजा आपले सैन्य घेऊन रामेश्वर येथे गेला व तेथून तो लंकेत जाण्याच्या तयारीत होता. सर्वांनी त्याला वास्तवाचे भान करून दिले. कथा ऐकताना, कथेतील सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर जिवंत झाले. राम आणि रावण युद्ध साठी सज्ज झालेले त्याला दिसत होते. त्याचप्रमाणे माझे वडील अर्जुनाचे शब्द वाचून त्याच्या भावभावनांशी तन्मय झाले तद्रूप झाले. त्यांनी साश्रू नयनांनी त्यांचे त्रिविध ताप नष्ट करण्यासाठी परमेश्वराकडे विनवण्या केल्या. हे आहे ' यद् भावम् तद् भवति '  ते  जो श्लोक वाचत त्याचा भावानुभव घेत.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, १६ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

" जसे भाव तसे जीवन. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक -४२

 
          वर्णसंकर हा कुळघातक्यांना आणि कुळाला नरकाप्रत घेऊन जातो कारण श्राद्ध आणि जलतपर्ण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           कान्हा, प्रभू, का याला गोंधळात ढकलत आहेस? भक्तांना सुलभ प्राप्त होणाऱ्या, अच्युता!  दीनाला तुझ्या चरणी घेऊन उद्धार कर. पितरांना पिंडदान व पाणी देईल असे कर. पूर्वजांच्या पूर्वजा, या भोग्याच्या चुका पोटात घाल. वेणूगोपाला ! वासुदेवा! या दासाची वृद्धी कर. तुझ्या भक्ताला तुझाच विचार करत असता मृत्यू दे. सर्वेशा!
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १३ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         " सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - ४१

 
          हे कृष्णा ! कुळामध्ये जेव्हा पापाचे प्राबल्य वाढते तेव्हा कुळातील स्त्रिया पतित होतात आणि या स्त्रियांच्या पतनामुळे हे वार्ष्णेया, वृष्णीवंशजा! अवांछित वर्णसंकर संतती उत्पन्न होते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे वैकुंठवासा, जर स्त्रियांमध्ये नीतीमत्ता नसेल तर सर्व जातीच अनैतिक व दुराचारी बनतात. माधवा, या मूर्खाला एकपत्नीव्रती  कर. तुझा अनन्य भक्त बनव. मला सन्मार्गावरून ढळू देऊ नकोस. आदिनारायणा, मला तुझा दास बनव. हे हरितवर्णा! अच्युता! तू करुणेचा स्रोत आहेस. माझ्यावर दयेचा वर्षाव कर. कान्हा, माझ्या आधारा,शरणो शरणम्.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ९ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         " सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका."

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - ४०

 
          हे कृष्णा कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात पापाचे प्राबल्य वाढते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
          कान्हा या अतिक्षुद्र जीवाचा बेडा पार कर. कुळ व कुळधर्म नष्ट होईल अशी मला आशंका वाटत आहे. प्रभू, ही भीती निरर्थक आहे याची मला जाणीव करून दे. हे आदिपुरुषा मला सदैव तुझ्यावरच विसंबून राहू दे. आधी अंत  ज्योती, आपतबांधवा, अच्युता, हरितवर्णा, तू माझा आश्रय.शरणो शरणम्.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ६ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         मधुर बोला, मधुर वागा. केवळ तोंडाने नव्हे तर अंतःकरणापासून ! "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - ३८ - ३९

 
          हे जनार्दना, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी वैर धरण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या पापाची जाण असताना आम्ही या पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे ?

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
          कान्हा ! प्रभू ! लोभाने ग्रासल्यामुळे दुष्कर्मांमध्ये फसलेल्या, पापाच्या मोठ्या खड्यात पडू पाहणाऱ्या, या पाप्याला तुझ्या पादारविंदांवर आणून टाक. पद्मनाभा! परमदयाळ ! पृथ्वी भक्षण करणाऱ्या परमज्योती ! परमपदनाथा! पापकर्मे भक्षण करणाऱ्या या पाप्यावर तुझी कृपादृष्टी ठेव. रक्षण कर. कान्हा ! कृपा कर. कृष्णा! किरीट ! गोपाळा! गोविंदा! तूच आधार.  शरणो शरणम्.
           कान्हा! निःशक्त करू पाहणाऱ्या मोठ्या पापापासून मला वाचव. क्षीराब्धी कान्हा! गरुडवाहना कान्हा ! याला सत्यचक्षू दे, ज्ञानचक्षु  दे. नारायणा ! या श्वानाने फक्त तुझ्यावर विश्वास ठेवला. स्वामी ! नित्य अनित्य विवेक दे. तूच आधार, प्रभू ! तुझ्या भक्ताला केवळ तुझे कर्म करायला लाव. तुझे गुणचिंतन करायला लाव.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २ मार्च, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - १, श्लोक - ३७

 
           हे माधवा, या धृतराष्ट्रपुत्रांची, आमच्या बांधवांची हत्या करण्याचे पाप कर्म आम्ही करणे योग्य नाही. आमच्याच नातलगांना मारून आम्ही कसे सुखी होऊ?

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
          कान्हा, या मूर्खाची संसारात बुद्धी भ्रष्ट झालीय. आप्तस्वकीयांत गुरफटून त्यांना सोडायचे मन होत नाहीये. यशोदेला मुखात विश्वदर्शन देणाऱ्या! तीन पावलात विश्व व्यापणाऱ्या! पांडवांचा दूत होणाऱ्या! खांबामधून प्रकटणाऱ्या! दीनदुबळ्या जणांचे दुःख निवारण करणाऱ्या! कान्हा माझी काळजी दूर कर. सर्वसंगपरित्याग करून तुझे चरणकमळ धरून जगू दे. वासुदेवा! वैकुंठवासा! रामा! कान्हा! कान्हा! तुझाच आधार. शरणो शरणम्.
*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम