गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १०
       
            देह सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा उपभोग घेत असता किंवा त्रिगुणांनी युक्त असतानाही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखू शकत नाहीत. केवळ ज्ञानदृष्टी असलेले ज्ञानीच हे सर्व पाहू शकतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, या शुद्राला ज्ञानचक्षू दे. मी हा देह सोडताना, या देहात असताना, विषयोपभोग घेत असता किंवा त्रिगुणयुक्त असता मला आत्मदर्शन होऊ दे. मला मूर्ख बनवू नकोस. जरी बनवलेस तरी तुझा महिमा गाणारा मूर्ख बनव. तुझ्यासाठी वेडा बनव. तुझा भक्त कर. वामना! उत्तमा! सत्या! तूच माझा आधार. लवकरात लवकर मला तुझ्या चरणी घे, कान्हा.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा