रविवार, २ नोव्हेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  ६
 
           त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, या पाप्याला तुझ्या परमपदी घेऊन जा. तिथे सूर्य, चंद्र आणि अग्नी अथवा प्रकाश नाही. या सर्व तेजांना प्रकाश देणारी ज्योती तू आहेस. या ह्या नीचाला तुझ्या सुवर्णकमलांवर स्वीकारून मुक्त कर. तुझ्या प्राप्तीसाठी झालेला जन्म, ह्या जन्ममृत्यूच्या रोगातून मला मुक्त कर. हे अजन्मा! या कुकरम्याचा तुझ्याशी योग होवो. याला तुझ्यापाठोपाठ यायला लाव. अजन्मा होण्याचा वर दे. परब्रम्हा! तूच माझा आश्रय. शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा