गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक ७
 
           या देहात हा जीवात्मा म्हणजे  माझाच सनातन अंश आहे आणि तोच भौतिक प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           हे कान्हा! तुझा अंश असलेल्या या जीवाला तुझे चरण प्राप्त होऊ दे. तू माझा आधार ! हे प्रभू! या दासाच्या मनात तू स्त्री आणि भूतल यांचा मोह का निर्माण करतोस? या जीवाला तू चाचपडायला का लावतो आहेस? गोपाला, क्रोध म्हणजे पापच नाही का? क्रोध नष्ट कर, गोविंदा तू माझा आश्रय आहेस. माझी इंद्रिय आणि मन तुझ्याजवळ ठेव. हे प्रभू! या दीनाला तुझ्याखेरीज दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही. तूच त्याचा एकमेव आसरा आहेस. शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा