रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

       " मनुष्यामध्ये असणारी अतृप्त इच्छांची शक्ती त्याच्या बंधाचे मूळकारण आहे . " 

पुष्प २९ पुढे सुरु 

             सत्संगात राहणेही आवश्यक आहे . परमेश्वराविषयी इतरांशी बोलणे हे भक्तांसाठी लाभदायी आहे . सकाळपासून रात्रीपर्यंत मन आणि इंद्रिये वेगवेगळ्या दिशांना धावत असतात . जप, ध्यान आणि सत्संगाद्वारे आपण आपले मन एकाग्र केले पाहिजे . मन दाही दिशांना धावत असते . ते एकाग्र करणे म्हणजेच शिवम् . एक म्हण आहे , " मनाला शिवम् बनवणे हेच तप होय ."
       प्रेम देण्यासाठी आणि घेण्यासाठी वेळ काढा .
             प्रेम ही परमेश्वराची महान देणगी आहे . केवळ कुटुंब , नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्यावर प्रेम करणे असा त्याचा अर्थ नाही तर सर्वांवर प्रेम करा . तथापि सर्वजण केवळ आप्तस्वकीयांवर प्रेम करून प्रेमाला मर्यादा घालतात . म्हणून संतमहात्मे , अवतार पुन्हा पुन्हा सांगतात " सर्वांवर प्रेम करा " आपल्या आप्तस्वकीयांवर केलेले प्रेम म्हणजे निव्वळ आसक्ती होय . ते प्रेम नव्हे . खरे प्रेम म्हणजे निःस्वार्थता . सर्वांवर निःस्वार्थ , निरपेक्ष प्रेम करा . निःस्वार्थ प्रेमाद्वारे आत्मसाक्षात्कार होतो . 
स्वार्थ + प्रेम = आसक्ती 
 निःस्वार्थ प्रेम म्हणजे आत्म साक्षात्कार . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा