रविवार, २५ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

"  सत्याच्या प्राप्तीबरोबरच साधनेची सांगता होते. "

 

कर्मकायदा - ओळख 

           ह्याच्यावर फक्त आमचाच हक्क आहे अस ते म्हणाले नाहीत. शास्त्रज्ञांनी किती औषधांचा शोध आजपर्यंत लावला आहे. जगाला त्याचा किती फायदा झालाय ! हे सर्व शोध सार्वजनिक संपत्ती आहे. अशाप्रकारे वागणे हेच प्रेम आहे. प्रेमाचा विस्तार आहे. 

           आता आपण आध्यात्मिक जगताविषयी पाहू या. आत्मसाक्षात्कार झालेल्या महान आत्म्यांनी अनेक सत्य प्रकट केली. उपनिषदांमध्ये त्या सर्वांच्या नोंदी केल्या, पण  त्यांनी त्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित केला नाही. त्यामुळे सर्व जगाला त्या प्राचीन ज्ञानाचा लाभ झाला. या ज्ञानालाच वेद म्हणतात. प्रेम विस्तारित होते, तेव्हा कर्म नसते. प्रेमरहित कृत्ये आपणाला बंधनात टाकतात, त्याच कर्मात रूपांतर होत. जिथे प्रेम नसते, तिथे मत्सर, अहंकार, द्वेष आणि क्रोध उत्पन्न होतात. त्यांचे संस्कार बनतात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा  

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा