गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

        
" परमेश्वर सत्यस्वरूप आहे. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
              भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात २४ श्लोक आहेत. २४ व्या श्लोकात पुरुष आणि प्रकृती यांचे गुणवर्णन केले आहे आणि जो हे जाणतो त्याला पुनर्जन्म नाही. माझे वडील त्यांच्या डायरीमध्ये ते ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात. स्वामींनी हा श्लोक का सुचित केला ? माझ्या वडिलांच्या डायरीमध्ये गीतेतील प्रत्येक श्लोक असताना हाच का सुचित केला. स्वामी आणि मी पुरुष आणि प्रकृती म्हणून अवतरलो आहोत आणि ती प्रकृती माझ्या वडिलांच्या पोटी जन्माला येऊन सर्वांना मुक्ती प्रदान करणार आहे. माझ्या वडिलांनी वयाच्या ३९ व्या वर्षीच हे डायरीमध्ये लिहिले. आम्ही त्यांची अगोदरची कोणतीही डायरी पाहिली नाही. तसेच आमच्या कुटुंबातील कोणीही त्यांच्या व माझ्या डायऱ्या वाचल्या नाहीत. आता प्रथमच मला स्वामींनी त्यांच्या डायऱ्या वाचून त्यांच्या लिखाणावर सविस्तर लिहिण्यास सांगितले. मी आधी काही मजकूर लिहिला व त्यानंतर मणिवन्ननने अजून काही डायऱ्या आणून दिल्या. इथे मी जे लिखाण केले आहे ते स्वामींनी सुचित केलेल्या १९५३ च्या डायरीत आहे. माझ्या डायरीतील नोंदी हाच माझ्या पुस्तकातील मजकूर असतो. आतापर्यंत सुमारे ६० पुस्तके लिहून झाली आहेत. स्वामींनी मला आता वडिलांच्या डायरी विषयी लिहिण्यास सांगितले आहे.

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
१४ जानेवारी २००१
           मी देवीचे दर्शन घेण्यासाठी कन्याकुमारीला गेले. (भारताच्या दक्षिणेकडील टोकावर या देवीचे मंदिर आहे.) मंदिरामधील ध्यान.
वसंता: स्वामी! तुम्ही मला कन्याकुमारीला येण्यास का सांगितले?
स्वामी: ये, मी तुला दाखवतो.

           त्यावेळी बारा वर्षाची एक लहान मुलगी माझ्याकडे आली. तिने लाल रंगाचा, व निळ्या रंगाची लेस लावलेला परकर व पिवळी अर्धी साडी नेसली होती. ती साक्षात कन्याकुमारी असल्याचे मी जाणले. ती म्हणाली," मी माझी शक्ती तुला प्रदान करेन." असे म्हणून ती मला समुद्रामध्ये घेऊन गेली. मी मनाशी विचार करत होते ती मला समुद्रामध्ये घेऊन जात आहे... ती मला शक्ती कशी देईल? ती एका पाषाणावर बसली, मी ही तिच्याबरोबर बसले. तिने मला दूध भाताचे तीन घास (उंडे /गोळे) दिले. ते मी खाल्ले. त्यानंतर ती अदृश्य झाली.
           मी मोठ्याने म्हणत होते केवढी ही करुणा दृश्यमधील देवाचे ते बाल रूप अत्यंत विलोभनीय होते तिच्या या कृपेची मी कशी उतराई होऊ?
          त्यानंतर आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो. सूर्यास्त दर्शन केले. आकाशामध्ये सूर्य सुंदर सोन्याच्या गोळ्यासारखा दिसत होता. थोड्याच वेळात रंगछटा बदलून भगवी झाली. त्या भगव्या गोळ्याच्या वरती मला भगवान बाबा दिसले. हळूहळू तो नारंगी सूर्य क्षितिजापर्यंत आला आणि दृष्टीआड झाला.
            स्वामींनी आपल्याला अगोदरच सांगितले आहे की काही वर्षांनी आपल्याला ते भगव्या ठिपक्यासारखे दिसतील. मी इतरांना  म्हणाले," हा सूर्यास्त मला त्यांच्या त्या विधानाची आठवण करून देतो."


 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, २० एप्रिल, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक - २८

 
         कान्हा! जिवाची मधलीच अवस्था स्पष्टपणे कळते आहे जीवनाचा आरंभ व अंत दिसत नाहीय. असे असूनही मी दुःखी आहे. हे नृसिंहा! दुःखाचा बिमोड कर. दूत बनून चालणाऱ्या कृष्णा, मला तुझ्या चरणांशी घे. सर्वत्र फक्त तुलाच पाहण्याची दृष्टी देऊन कृपा कर आत्मा आणि अनात मा याचे ज्ञान देऊन या दासावर दया कर गोपाला तूच माझा निवारा! शरणो शरणम्.

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " तुम्ही कुठेही असा आणि काहीही करीत असा, त्यावेळचं तुमच्या हातातील कार्य भक्तिभावानं  करा."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक - २७

 
          जो जन्मला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयी तू शोक करणे योग्य नाही.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           हे कान्हा मृत्यूची अनिवार्यता मला उमजु दे. या देहाचा त्याग करताना अंड्यातून बाहेर पडणाऱ्या कोंबडीच्या पिलासारखे मी अश्रू न सांडता तुझ्या चरणकमलांशी धाव घ्यायला हवी. आदिनारायणा, परब्रम्हा ह्या पाप्याला शुद्ध कर. तू सर्वगुणसंपन्न आहेस. मला तुझ्या चरणकमली घे. पुरे! पुरे! आता हा जन्म! या जन्मात काय प्राप्त झाले? पुरे! पुरे!

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १३ एप्रिल, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " मेणबत्ती जशी प्रकाश देण्यासाठी स्वतः जळते, तसे तुम्ही जगातील सर्वांना प्रेम द्या."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक - २४

 
          हा आत्मा कापता न येणारा, जळता न येणारा, भिजवता न येणारा, सुकवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर, राहणारा आणि सनातन आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           तू सर्वव्यापी आहेस. सनातन आहेस. तू अचल आहेस. अनंत आहेस, सर्वसाक्षी आहेस. या दिनाला तू या वास्तवाची जाणीव करून दे. प्रलयकाळी तुझी अस्तित्व असते. तू या देहाचा नाश कर या देहाचे तुकडे तुकडे कर आणि आत्म्याचे अविनाशित्व सिद्ध कर.

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

 


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " परमेश्वरावर केंद्रित असणारे भक्ताचे प्रेम विस्तार पावते आणि जीवात्मा परमात्मा बनतो. प्रेम ईश्वर आहे. ईश्वर प्रेम आहे. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक - २३

 
          या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           कान्हा, या यःकश्चित जिवाला आत्मज्ञान दे. तद्नंतरच जो शस्त्रानी कापला जात नाही, पाण्याने भिजत नाही, अग्नीने जळत नाही अथवा वाऱ्याने सुकत नाही अशा आत्म्याचे ज्ञान मला होईल. हे विश्वव्यापक वामना, केवळ तुझ्यावरच माझा भरवसा आहे. या भक्षकभिंत देहाचा नाश कर. मला शाश्वत देह बहाल कर. मला तुझ्या चरणकमलांशी घे. हे आदितेजा, अनाथनाथा मृत्युसमयी मी तुझा विचार करेन असा वर तू मला दे.  

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

बुधवार, ९ एप्रिल, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            भगवान शिवाशी विवाह करण्यासाठी देवी कन्याकुमारीने कठोर तप केले. अखेरीस परमेश्वराने तिचा स्वीकार केला व तिच्याशी विवाह करण्यासाठी ते सूर्योदय समयी येतील असे त्यांनी तिला सांगितले. कन्याकुमारीने विवाहाची सर्व व्यवस्था केली. दरम्यान काही असूरांचा वध करण्यासाठी नारद मुनींना तिची मदत हवी होती परंतु ती अविवाहित राहिली तरच हे घडणे शक्य होते. म्हणून नारदांनी तो विवाह रोखण्यासाठी एक अभिनव योजना आखली. त्यांनी कोंबड्याला सूर्योदयाच्या अगोदर बांग द्यायला लावली. कन्याकुमारीशी विवाह करण्यासाठी निघालेले भगवान शिव कोंबड्याची बांग ऐकून सुसीनथरम्  नावाच्या गावीच थांबले. त्यांनी सांगितल्या वेळी ते तेथे पोहोचू न शकल्यामुळे रागाच्या भरात कन्याकुमारीने सर्व अन्न व विवाहाची सर्व आभूषणे समुद्रात फेकून दिली आणि संन्यासी बनून पुन्हा तप सुरु केले.
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ६ एप्रिल, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         "मृत्युसमयी तुमच्या मनात असणारे विचार, तुमच्या पुढील जन्मासाठी बीज निर्मिती करतात. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक -२२

 
          ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो. त्याप्रमाणे आत्माही जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           भगवान! हा दास मारतेवेळी जुनी वस्त्रे काढून टाकल्यासारखे हा आत्मा हे शरीर सोडून देऊन नवीन परिधान करेल असे कर. माझ्या भगवंता! या निराधाराला कुणाचा आधार! सदोदित तुझं चिंतन करायला लाव. कान्हा! कान्हा! या अगतिकाची तूच गती.

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ३ एप्रिल, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " तुमच्या चांगल्या वाईट दोन्ही कर्मांची कार्मिक खात्यात नोंद केली जाते. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

            भगवद्गीतेचे श्लोक माझ्या वडिलांचे अनुभव पूर्ण भावविश्व झाले होते. ते स्वतःच अर्जुन होऊन सुटकेसाठी त्यांनी कृष्णाचा धावा केला. प्रत्येक श्लोकाशी, युद्धक्षेत्रावरील अर्जुनाच्या भावभावनांशी ते इतके तद्रूप झाले होते की ते अर्जुनाशी एक झाले. ते अर्जुन झाले. अशा रितीने त्यांनी त्यांच्या भावविश्वाद्वारे गीतेचे आचरण केले. मी त्यांच्यापोटी जन्माला आल्यामुळे त्यांचे भावविश्व माझे भावविश्व झाले. ते सामान्य व्यक्ती नव्हते हे त्यांच्या जीवनशैलीमधून स्वामींनी मला दाखवून दिले. ते मानवरूपधारीदेव आहेत, माझे सर्व कुटुंबीय भगवंतासाठी व्याकुळ होऊन अखंड अश्रू गाळत. त्यांना भौतिक जगात जगणे अशक्य होते. माझे आजोबा, वडील, आई, आजी, काका, मामा अगदी सगळेजण संसारात रमू शकले नाहीत. त्यांना परमेश्वराची आस लागून राहिली होती. आम्ही सर्व परमेश्वरापासून विभक्त होऊन इथे आल्यामुळे, विरह असह्य होऊन आम्ही अश्रू ढाळत होतो.

 

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम