गुरुवार, ३ एप्रिल, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         " तुमच्या चांगल्या वाईट दोन्ही कर्मांची कार्मिक खात्यात नोंद केली जाते. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

            भगवद्गीतेचे श्लोक माझ्या वडिलांचे अनुभव पूर्ण भावविश्व झाले होते. ते स्वतःच अर्जुन होऊन सुटकेसाठी त्यांनी कृष्णाचा धावा केला. प्रत्येक श्लोकाशी, युद्धक्षेत्रावरील अर्जुनाच्या भावभावनांशी ते इतके तद्रूप झाले होते की ते अर्जुनाशी एक झाले. ते अर्जुन झाले. अशा रितीने त्यांनी त्यांच्या भावविश्वाद्वारे गीतेचे आचरण केले. मी त्यांच्यापोटी जन्माला आल्यामुळे त्यांचे भावविश्व माझे भावविश्व झाले. ते सामान्य व्यक्ती नव्हते हे त्यांच्या जीवनशैलीमधून स्वामींनी मला दाखवून दिले. ते मानवरूपधारीदेव आहेत, माझे सर्व कुटुंबीय भगवंतासाठी व्याकुळ होऊन अखंड अश्रू गाळत. त्यांना भौतिक जगात जगणे अशक्य होते. माझे आजोबा, वडील, आई, आजी, काका, मामा अगदी सगळेजण संसारात रमू शकले नाहीत. त्यांना परमेश्वराची आस लागून राहिली होती. आम्ही सर्व परमेश्वरापासून विभक्त होऊन इथे आल्यामुळे, विरह असह्य होऊन आम्ही अश्रू ढाळत होतो.

 

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा