रविवार, ४ जानेवारी, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १९
       
            हे भारता! जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय आणि तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे सलग्न होतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, या पाप्याचे अज्ञान दूर कर तू परमपुरुष आहेस याचा मला बोध होऊ दे. हे प्रभू, मला ज्ञानी बनव. या दीनावर तुझी करुणा दृष्टी राहू दे. षट्गुणसंपन्न वैकुंठाधिपतीची भक्ती करण्याची मला बुद्धी दे. हे वासुदेवा, वराहअवतारा! वामना! परशुरामा! भीमा, बलरामा! नरसिंह! मत्स्य होणाऱ्या, कुर्मा होणाऱ्या, अखिलांड अच्युता! कान्हा, मला तुझ्या चरणांशी घेऊन माझे कल्याण कर.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा