गुरुवार, २९ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २६ 
       
           'सत्' परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्थ! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! या निरुपायी जीवाला तुझा उत्तम गीतोपदेश असा 'सत्' हा शब्द तसेच त्यातील सत्य आणि चांगलं ह्यांच्या अर्थाची जाणीव करून दे.  माझ्याकडून प्रशंसनीय कृत्ये करून घेऊन मला सत् नाम प्राप्त करून दे. वासुदेवा! ये नं! माझ्या मनात येऊन राहा. माझी काळोखे मन उजळू दे. कान्हा! ईसा! ये, येऊन मला तुझ्या चरणी स्वीकारून माझा उद्धार कर. तूच स्वामी! प्रभू!

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा