रविवार, १८ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २२ 
       
           अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलना पूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! या दिन जीवाला तामसिक दान करणारा करू नकोस. अनुचित स्थळी, अनुचित काळी, अनुचित व्यक्तीला, असभ्य दान करायला देऊ नकोस. सात्विक दान करायला लाव. सर्वेशा! सर्वलोकशरण्या परमधामा, परमदयाळा, शेषशयना, पद्मनाभा, गोविंदा, गोपाला, सप्तवृषभ नियंत्रका, कृष्णा! तूच आधार. शरणो शरणम्.   

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा