रविवार, ११ जानेवारी, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १६ , श्लोक १२
       
            शेकडो आशारुपी पाशांनी बद्ध असलेले हे जीव कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अवैद्य मार्गांनी धनसंचय करतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           परमेशा ! या गुलामाच्या अमर्याद इच्छा नाहीशा कर. शेकडो इच्छांच्या दोरखंडांनी जखडून नकोस. काम क्रोधाच्या आहारी जाऊ देऊ नकोस. कामभोगासाठी गैरमार्गाने संपत्ती गोळा करायची बुद्धी देऊ नकोस. मला अपरिग्रही बनव.  भगवान, हा दास फक्त तुला शरण आला आहे अच्युता! अनंता! आधार देऊन दुवा कर.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा