गुरुवार, १५ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १६ , श्लोक २१
       
            हे अर्जुना! काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. मनुष्याने  त्यांचा त्याग केला पाहिजे. कारण ही तीन द्वारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, कमलाकांता, काम, क्रोध आणि लोभ या तीन  द्वारांमधून माझी पाठवणी करू नकोस. केवळ तुझी सेवा करण्यासाठीच माझा प्रयत्न ठेव. मी तुला शरण आलो आहे. या अधमाला नरकात ढकलू नकोस. हे श्रीरामा ध्यास घेणाऱ्या जीवांच्या संरक्षका, या श्वानाचे रक्षण कर. मला सद् विचार दे. शरणो शरणम्.  

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा