ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" निर्मल हृदय स्वछ आरशासारखे प्रतिबिंबित होते."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक ६४,६५
परंतु आत्मसंयमी योगी आपल्या अधीन ठेवलेल्या व रागद्वेषरहित इंद्रियांना विषयोपभोग घेत असूनही अंत: करण्याची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखी नाहीशी होतात आणि मग प्रसन्नचित्त कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ परमात्म्यामध्ये स्थिर होते.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
हे कान्हा, माझ्या मनाला परम शांती प्राप्त होऊ दे. मला आकर्षण वा तिटकारा या दोन्ही गोष्टींपासून मुक्त कर. मला माझ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू देत. हे प्रभू, वामना, हे परमश्रेष्ठा, हे सत्या, तू माझे आश्रयस्थान आहेस. मी तुला शरण आलो आहे. मला या क्षणी तुझ्या चरणी घे. कान्हा, मनीवण्णा, मला शांत चित्त कर. माझ्या दुःखांचा अंत होऊ दे. तू माझा आश्रयदाता आहेस. शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा