गुरुवार, २६ जून, २०२५

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

        " निर्मल हृदय स्वछ आरशासारखे प्रतिबिंबित होते."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६६ 
 
           मला आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. तसेच त्याचे मनही स्थिर नसते. निश्चयात्मक बुद्धी व स्थिर मन याशिवाय शांती प्राप्त होऊ शकत नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल?

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
           हे कान्हा, मला संयमीत मन दे. कुशाग्र बुद्धी प्रदान कर. कर्तव्यदक्ष बनव. शांती दे. अमरत्व दे. देवाधिदेवा, दीनरक्षका दयाळा, हे परमेश्वरा, भक्तरक्षका, तूच माझा आधार. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा