रविवार, २९ जून, २०२५

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

" खरा आनंद आत्मसाक्षात्कारामध्ये प्रतिबिंबित होते. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६७ 
 
           ज्याप्रमाणे पाण्यात चालणारी नाव वारा ओढून नेतो त्याचप्रमाणे विषयात वावरणारे मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते इंद्रिय या आयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, कमला, कान्हा, कारुण्या, माझे मन इंद्रियांच्या अधीन होऊ देऊ नकोस. वैकुंठवासा, तू माझा आश्रयदाता आहेस. वाऱ्याने भरकटणाऱ्या जहाजाप्रमाणे जर मन इंद्रियांच्या कब्जात गेले तर इंद्रिये माणसाची विवेकबुद्धी नाहीशी करतात. हे परमेश्वरा, मला आत्मज्ञान दे. मला स्थिर आणि खंबीर मन दे. माझ्या शरीराला आणि मनाला विविध शक्ती दे. तू माझा आधार.शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा