रविवार, १ जून, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

       "तुमच्या मुखाने केवळ सत्य वदावे, अन्य काही नाही."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ५७
 
           जो पुरुष भौतिक जगातील शुभाशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही व त्याचा द्वेषही करत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थिर झालेला असतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, या क्षुद्र जीवाला सुखाने आनंदून जाऊ देऊ नकोस आणि दुःखाने हातांश होऊ देऊ नकोस. ज्ञानाने त्याची वृत्ती समतोल बनव. त्याला निरासक्त बनव. त्याला आवडनावडी पासून मुक्त कर. दीनदयाळा, निर्मला, निष्कलंका, नित्यानंदा, तू माझा आश्रयदाता आहेस. शरणो शरणम्. 
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा