गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  ३  
 
           या वृक्षाचे वास्तविक रूप या जगात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत, आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रुपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, इथे आदी, अंत अथवा मध्यही नाही असं तू म्हणतोस. ह्या विषयी मला सुजाण कर. अनासक्ती दे. पांडुरंगा! पंढरीनाथा! परमदयाळा! परमपुरुषा! तूच आधार ! शरणो शरणम्. केशी संहारका! ! गरुड वाहना ! अब्धिनीरवर्वा ! या पाप्याचा तुझ्या पादपुष्पांवर स्वीकार करून उद्धार कर. या निराधाराच्या आधारा, शरणो शरणम्. काम व क्रोध याला सोडून जाऊ देत. यामुळे मी खूप सहन केले आता पुरे. हे राजा ! अच्युता ! माझा एकमेव सहारा. शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा