गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक ८
 
           हे अर्जुना! सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे, असे समज. तो या जीवाला प्रमाद, आळस, आणि निद्रा यांनी बांधतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा! तमोगुण हा अज्ञानातून उत्पन्न होत असल्यामुळे या दुबळ्या दासाचे अज्ञान दूर कर. याला तमोगुणांची भुरळ पडू देऊ नकोस. यद्यापित तुझ्या सुंदर रूपाची मोहिनी पडू दे. हे मधुसूदना, मला मायेने संभ्रमित होऊ देऊ नकोस, परंतु तुझ्या दैवी लीलांनी संभ्रमित होऊ दे. माझ्यामधील आळस, सुस्ती आणि निद्रा दूर कर.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा