गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक १० 
 
           हे भारता! कधी रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाचे प्राबल्य वाढते. कधी सत्वगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून रजोगुणाचे प्राबल्य वाढते तर कधी सत्वगुण आणि रजोगुणाचा पाडाव करून तमोगुणाचे प्राबल्य वाढते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा, तू त्रीगुणातीत आहेस. तू मलाही गुणातीत कर. या त्रिगुणांच्या आसक्तीमुळे कधी तमोगुण वाढतो, तर कधी रजोगुण पण सत्वगुण क्वचितच असतो. ह्या दुबळ्या दासावर या तीन गुणांचा हल्ला झाल्यामुळे तो धडपडतो आहे. महासागरात निद्रिस्त ईश्वरा, अच्युत, मला गुणातीत कर. मला तुझे दिव्य चरण प्राप्त होऊ दे.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा