गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

श्री वसंतसाईंचा जन्मदिन संदेश

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

अति बोलणे टाळावे

 स्वामी म्हणतात, " कोणतेही काम करण्या अगोदर विचार करून मग ते काम करा. आवाज न करता, कमीत कमी संभाषण करून आपले कार्य पूर्ण करा.दूर उभे राहून कोणालाही मोठ्याने हाक मारू नका. त्या व्यक्तीच्या जवळ जा किंवा तिला खूण करून बोलवा. मोठा आवाज करणे हे आकाशाच्या शांतीचा भंग करणारे पापकर्म आहे.

जेव्हा आपण पाणी आणि पृथ्वीचा वापर करतो त्यावेळी अशा प्रकारची काही पाप कर्म घडतात.

आपण आपल्या भोवती झालेले जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण प्रत्यक्ष पाहू शकतो. उदा. एका तलावातील पाण्यात अनेक शेळ्या, मेंढया, गाई, गुरे उतरतात. लोकं स्नानासाठी तलावात उतरून तेथेच थुंकतात आणि तलावाचे पाणी प्रदूषित करतात. त्याचप्रमाणे आपण थुंकून आणि लघवी करून पृथ्वीला प्रदूषित करतो. ही सगळी घाण आहे. हे सर्व आपल्या डोळ्यासमोर घडते.

तथापि आपले डोळे आपली वाणी पाहू शकत नाही जी आकाशाला प्रदूषित करते.

जर आपण मोठ्याने बोललो किंवा हाक मारली तर आपला ध्वनी अवकाशात जातो आणि अवकाशात मिसळतो म्हणून स्वामी म्हणतात की हे सुद्धा पाप आहे. भावना फक्त भावना म्हणून राहिल्या, तर ठीक आहे, पण जेव्हा भावना विचारांमध्ये बदलतात आणि विचार शब्दांमध्ये रूपांतरित होतात, तेव्हा त्या शब्दांचा ध्वनी अवकाशाचे प्रदूषण करतो.


आपण त्याला शब्दब्रह्म म्हणतो. त्या शब्दब्रह्माची आपण शांतपणे उपासना केली पाहिजे. मोठ्या आवाजात आणि अनावश्यक बोलणे टाळूनच हे करणे शक्य आहे.

एकदा खूप मुसळधार पाऊस पडला. सर्व बेडुक मोठ्याने ओरडत होते. पाऊस थांबल्यानंतरही बेडकांचे ओरडणे सुरूच राहिले त्यामुळे पक्षी तेथे येऊन बेडकांना आपले भक्ष्य म्हणून घेऊन गेले. तमिळमध्ये एक म्हण आहे - “बेडकाचा त्याच्या तोंडामुळे नाश होतो.”

सूत्र
१)अति बोलणे = काळाचा अपव्यय
२)काळाचा अपव्यय = ऊर्जेचा अपव्यय
३)ऊर्जेचा अपव्यय = शारीरिक दमछाक
४)जेव्हा शरीर थकलेले असते तेव्हा आपल्याला अधिक खावे-प्यावेसे वाटते.
५) त्यामुळे आपली पचन संस्था बिघडते आणि आणि नको त्या भावना उद्दिपित करते.
 
तात्पर्य- अधिक बोलणे टाळा.

कमी बोला अधिक शांती मिळवा.

- श्री वसंत साई अम्मा

 

 


 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा