रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " यद भावं तद भवति."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  ४  
 
           त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, तू आदीपुरुष आहेस. मी तुझ्या चरणी आसरा शोधतो आहे. तू परमध्येय आहेस. या ध्येयाप्रत गेले पाहिजे. तू मला आश्रय दे.
           हे प्रभू! माझ्यावर कृपा कर. या दासाला तू आपला समज. हे परमपुरुषा, अच्युता! हरितवर्णा ! भूमी मापणाऱ्या वामना! मुखात विश्व दाखवणाऱ्या! अनंतशयना! परमपद्वासा ! पापविमोचना! या पाप्याच्या सर्व पापांचा संहार कर आणि त्याला तुझ्या चरणी घे. कान्हा, तू मला आश्रय दे. मी तुला शरण आलो आहे. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा